शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

रेणापूर तालुक्याला २६ हजार क्विंटल बियाण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:15 IST

रेणापूर : खरीप हंगाम तोंडावर आल्याने शेतकरी बी-बियाणे, खतांची जुळवाजुळव करत आहेत. त्यामुळे बाजारपेठेत रेलचेल वाढली आहे. यंदाच्या हंगामात ...

रेणापूर : खरीप हंगाम तोंडावर आल्याने शेतकरी बी-बियाणे, खतांची जुळवाजुळव करत आहेत. त्यामुळे बाजारपेठेत रेलचेल वाढली आहे. यंदाच्या हंगामात रेणापूर तालुक्यात जवळपास ४३ हजार हेक्टरवर पेरा अपेक्षित असून, त्यासाठी २६ हजार ६४० क्विंटल बियाण्याची आवश्यकता आहे.

रेणापूर तालुक्यात सर्वसाधारण क्षेत्र ४६ हजार ३२ हेक्टर असून, त्यापैकी यंदा ४३ हजार २७५ हेक्टरवर पेरा होईल, असा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. त्यात सर्वधिक पेरा सोयाबीनचा होणार असून, ४० हजार ५०० हेक्टरवर पेरणी अपेक्षित आहे. ज्वारी ७००, भात १०, बाजरी २०, मका ४५०, तूर १ हजार २५०, उडीद ५०, तीळ ५०, भुईमुगाची १० हेक्‍टरवर पेरणी होईल. कापसाची ७५ हेक्टरवर लागवड होईल.

तालुक्याला सोयाबीन बियाणे २६ हजार ३२५ क्विंटल, ज्वारी ५३, भात ६, बाजरी १, मका ६८, तूर १५०, मूग १८, उडीद ६, तीळ १, भुईमुगाच्या १० क्विंटल बियाण्याची तर २ क्विंटल कापूस बियाण्याची आवश्यकता आहे. एकूण २६ हजार ६४० क्विंटल बियाण्याची गरज आहे.

दरम्यान, ‘महाबीज’कडे सोयाबीन, तूर, बाजरी, मका, मूग, उडीद आणि कापसासाठी ५ हजार ४०८ क्विंटल, खासगी कंपन्यांकडे ४ हजार ८२ क्विंटल बियाण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांकडे १७ हजार २७६ क्विंटल बियाणे उपलब्ध आहे.

बियाण्याची अडचण नाही...

तालुक्यात यंदा जवळपास ४३ हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर खरिपाचा पेरा होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यासाठी लागणारे बियाणे उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचण येणार नाही. शेतकऱ्यांनी घरगुती बियाण्याचा वापर करावा. त्यासाठी उगवण क्षमता तपासावी आणि बीज प्रक्रिया करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी हरिराम नागरगोजे यांनी केले आहे.