शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

२ ते ६ रुपये किलोचा भाव...कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मुळावर लॉकडाऊन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 16:11 IST

लॉकडाऊनपूर्वी लातूरच्या बाजारात कांद्याला प्रति क्विंटल ८०० ते ९०० रुपये दर मिळत होता. आता मात्र ग्राहक नाही. आवक वाढली, त्यामुळे कांदा प्रति क्विंटल २०० ते ६०० रुपयांप्रमाणे विकत आहे.

ठळक मुद्देलातूरच्या बाजारात कांद्याची उच्चांकी आवक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही पदरी पडेना

- आशपाक पठाण 

लातूर : लॉकडाऊनमुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले असून, देशातील विविध ठिकाणच्या नामांकित बाजारपेठा बंद असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची फरफट होत आहे. हैदराबाद, सोलापूर, लासलगाव आदी भागांत जाणारा कांदा  लातूरच्या बाजारात येत आहे. त्यामुळे महात्मा फुले भाजीपाला मार्केटमध्ये इतिहासात पहिल्यांदाच कांद्याची विक्रमी आवक झाली आहे.

लातूरचा आडत बाजार रोखीच्या व्यवहारात प्रसिद्ध असला तरी बाजार समितीअंतर्गत असलेल्या महात्मा फुले भाजीपाला मार्केटमध्ये मात्र स्थानिक शेतकऱ्यांव्यतिरिक्त बाहेरून येणारी फारशी आवक नव्हती. येथील बाजारात ५०० ते ६०० क्विंटलच्या वर कांद्याची आवक कधीही पोहोचलेली नव्हती. लॉकडाऊनमुळे  मात्र भाजीपाला बाजारात कांद्याची आवक दुप्पट नव्हे तर तिप्पट झाली आहे. इतिहासात पहिल्यांदाच दीड हजार क्विंटलनहून अधिक आवक झाल्याची नोंद झाली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर असलेल्या महात्मा फुले भाजी मार्केटमध्ये लॉकडाऊन काळात मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची आवक सुरू झाल्याने जागा पुरत नव्हती. परिणामी, फिजीकल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडाला होता. गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाकडून भाजीपाला बाजार रिंगरोड लगत असलेल्या पशुधनाच्या बाजारात सुरू करण्यात आल्याने महात्मा फुले भाजी मार्केटमध्ये आता बाहेरच्या शेतकऱ्यांची अधिक वर्दळ आहे.

हैदराबाद, सोलापूरकडे जाणारा कांदा लातूरला...लातूर, उस्मानाबाद, बीड, नगर जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी हैदराबाद, सोलापूर, लासलगाव येथील बाजारात कांदा विक्री करीत होते. लॉकडाऊनमुळे तेथील बाजारपेठ सध्या बंद आहे. त्यामुळे बीड, केज, परळी, उस्मानाबाद, तुळजापूर आदी भागांतील शेतकरी लातूरच्या भाजीपाला बाजारात कांदा घेऊन येत आहेत. सोमवारी १ हजार ५५० क्विंटलची आवक असून, इथल्या बाजारातील उच्चांकी आवक आहे, असे महात्मा फुले भाजीपाला मार्केटचे प्रमुख वसंत पवार यांनी सांगितले.

२ ते ६ रुपये किलोचा भाव...उन्हाळी हंगामात पाण्याचे प्रमाण कमी असते. उन्हाची तीव्रताही अधिक असल्याने मेहनत अधिक करावी लागते. यावर्षी उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले असले तरी लॉकडाऊनमुळे जिथे अधिक भाव मिळतो, अशा बाजारपेठा बंद आहेत. शिवाय, आठवडी बाजारही बंद आहे. त्यामुळे अनेक शेतकरी मिळेल तो दर पदरी पाडून घेत कांद्याची विक्री करीत आहेत. लातूरच्या बाजारात २ रुपयांपासून ६ रुपयापर्यंत प्रति किलो दर शेतकऱ्यांच्या पदरी पडला. त्यातही वाहनभाडे, काढणीचा खर्च, आडतीवरील खर्च  असे एकूण गणित केल्यास पदरी निराशेशिवाय काहीच नाही, अशी भावना कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली. लॉकडाऊनपूर्वी लातूरच्या बाजारात कांद्याला प्रति क्विंटल ८०० ते ९०० रुपये दर मिळत होता. आता मात्र ग्राहक नाही. आवक वाढली, त्यामुळे कांदा प्रति क्विंटल २०० ते ६०० रुपयांप्रमाणे विकत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीonionकांदाlaturलातूर