शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

२ ते ६ रुपये किलोचा भाव...कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मुळावर लॉकडाऊन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 16:11 IST

लॉकडाऊनपूर्वी लातूरच्या बाजारात कांद्याला प्रति क्विंटल ८०० ते ९०० रुपये दर मिळत होता. आता मात्र ग्राहक नाही. आवक वाढली, त्यामुळे कांदा प्रति क्विंटल २०० ते ६०० रुपयांप्रमाणे विकत आहे.

ठळक मुद्देलातूरच्या बाजारात कांद्याची उच्चांकी आवक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही पदरी पडेना

- आशपाक पठाण 

लातूर : लॉकडाऊनमुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले असून, देशातील विविध ठिकाणच्या नामांकित बाजारपेठा बंद असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची फरफट होत आहे. हैदराबाद, सोलापूर, लासलगाव आदी भागांत जाणारा कांदा  लातूरच्या बाजारात येत आहे. त्यामुळे महात्मा फुले भाजीपाला मार्केटमध्ये इतिहासात पहिल्यांदाच कांद्याची विक्रमी आवक झाली आहे.

लातूरचा आडत बाजार रोखीच्या व्यवहारात प्रसिद्ध असला तरी बाजार समितीअंतर्गत असलेल्या महात्मा फुले भाजीपाला मार्केटमध्ये मात्र स्थानिक शेतकऱ्यांव्यतिरिक्त बाहेरून येणारी फारशी आवक नव्हती. येथील बाजारात ५०० ते ६०० क्विंटलच्या वर कांद्याची आवक कधीही पोहोचलेली नव्हती. लॉकडाऊनमुळे  मात्र भाजीपाला बाजारात कांद्याची आवक दुप्पट नव्हे तर तिप्पट झाली आहे. इतिहासात पहिल्यांदाच दीड हजार क्विंटलनहून अधिक आवक झाल्याची नोंद झाली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर असलेल्या महात्मा फुले भाजी मार्केटमध्ये लॉकडाऊन काळात मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची आवक सुरू झाल्याने जागा पुरत नव्हती. परिणामी, फिजीकल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडाला होता. गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाकडून भाजीपाला बाजार रिंगरोड लगत असलेल्या पशुधनाच्या बाजारात सुरू करण्यात आल्याने महात्मा फुले भाजी मार्केटमध्ये आता बाहेरच्या शेतकऱ्यांची अधिक वर्दळ आहे.

हैदराबाद, सोलापूरकडे जाणारा कांदा लातूरला...लातूर, उस्मानाबाद, बीड, नगर जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी हैदराबाद, सोलापूर, लासलगाव येथील बाजारात कांदा विक्री करीत होते. लॉकडाऊनमुळे तेथील बाजारपेठ सध्या बंद आहे. त्यामुळे बीड, केज, परळी, उस्मानाबाद, तुळजापूर आदी भागांतील शेतकरी लातूरच्या भाजीपाला बाजारात कांदा घेऊन येत आहेत. सोमवारी १ हजार ५५० क्विंटलची आवक असून, इथल्या बाजारातील उच्चांकी आवक आहे, असे महात्मा फुले भाजीपाला मार्केटचे प्रमुख वसंत पवार यांनी सांगितले.

२ ते ६ रुपये किलोचा भाव...उन्हाळी हंगामात पाण्याचे प्रमाण कमी असते. उन्हाची तीव्रताही अधिक असल्याने मेहनत अधिक करावी लागते. यावर्षी उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले असले तरी लॉकडाऊनमुळे जिथे अधिक भाव मिळतो, अशा बाजारपेठा बंद आहेत. शिवाय, आठवडी बाजारही बंद आहे. त्यामुळे अनेक शेतकरी मिळेल तो दर पदरी पाडून घेत कांद्याची विक्री करीत आहेत. लातूरच्या बाजारात २ रुपयांपासून ६ रुपयापर्यंत प्रति किलो दर शेतकऱ्यांच्या पदरी पडला. त्यातही वाहनभाडे, काढणीचा खर्च, आडतीवरील खर्च  असे एकूण गणित केल्यास पदरी निराशेशिवाय काहीच नाही, अशी भावना कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली. लॉकडाऊनपूर्वी लातूरच्या बाजारात कांद्याला प्रति क्विंटल ८०० ते ९०० रुपये दर मिळत होता. आता मात्र ग्राहक नाही. आवक वाढली, त्यामुळे कांदा प्रति क्विंटल २०० ते ६०० रुपयांप्रमाणे विकत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीonionकांदाlaturलातूर