शहरं
Join us  
Trending Stories
1
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
2
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
3
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
4
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
5
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
6
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
7
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
8
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
9
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
10
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
11
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
12
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
13
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
14
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
15
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
16
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
17
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
18
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
19
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
20
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
Daily Top 2Weekly Top 5

कारखान्यावर आरोप करणाऱ्यांनाच १३ कोटींच्या वसुलीची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:14 IST

येथील राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात बोलताना आमदार बाबासाहेब पाटील म्हणाले, विरोधकांचे आरोप वास्तवाला धरून नाहीत. कुठलाही पुरावा नाही. अवसायनात निघालेल्या ...

येथील राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात बोलताना आमदार बाबासाहेब पाटील म्हणाले, विरोधकांचे आरोप वास्तवाला धरून नाहीत. कुठलाही पुरावा नाही. अवसायनात निघालेल्या कारखान्याची १० वर्षांत प्रगती केली. २५० मेट्रिक टन क्षमतेच्या कारखान्यात सध्या ४ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले जाते. पाच लाख ७५ हजार क्विंटल साखर उत्पादित होते. ७०० पेक्षा अधिक कर्मचारी काम करीत आहेत. कारखाना दररोज ३० हजार लिटर स्पिरीट अल्कोहोल तत्सम पदार्थाचे उत्पादन करीत आहे. त्यामुळे कारखान्याच्या उत्पन्नात भर पडली आहे. तसेच शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे.

२०११ मध्ये केवळ एक लाख मेट्रिक टन उत्पन्न होणाऱ्या तालुक्यात आज ८ लाख मेट्रिक टन उसाचे उत्पादन घेतले जाते. त्यासाठी आवश्यक सिंचन व्यवस्था माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांच्या प्रयत्नातून झाली आहे. ज्यांना कारखाना चालविण्यास दिला होता, त्यांनी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे १३ कोटी ४१ लाख ३१ हजारांचे कर्ज काढून ठेवले. त्याच्या वसुलीची नोटीस संबंधितांना मिळाली आहे. चांगल्या कारखान्याला बदनाम करण्याचे षड्यंत्र विरोधकांनी चालविले आहे, असेही आ. बाबासाहेब पाटील म्हणाले.

यावेळी सिद्धी शुगरचे व्यवस्थापक प्रफुल्लचंद्र होनराव, बाजार समितीचे सभापती शिवानंद हेंगणे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, जिल्हा परिषद सदस्य मंचकराव पाटील, माधव जाधव, प्रशांत देवकते, नगरसेवक फुजैल जागीरदार, अभय मिरकले, मुन्ना सय्यद, सरवरलाल सय्यद, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत भोसले, दयानंद पाटील, अझर बागवान, गोपीनाथ जायेभाये, शेतकरी अनिल बेंबडे, ईश्वर कारनाळे, गणेश जाधव उपस्थित होते.

जुन्या बालाघाटचे संचालक जबाबदार...

बालाघाट कारखान्याने १० वर्षांत केवळ ५ लाख मे. टन उसाचे गाळप केले. बारदाणा ज्यादा दराने घेतला. ऊसतोड करार केले नाहीत. त्यास तत्कालीन संचालक जबाबदार होते. त्यामुळे कारखाना दिवाळखोरीत निघाला, असा आरोपही आ. बाबासाहेब पाटील यांनी केला.

ईडीला घाबरत नाही...

कारखान्यात कुठलीही अनियमितता नाही. असेल तर इतकी वर्षे विरोधक गप्प का राहिले, त्याचे उत्तर त्यांनीच द्यावे. विनाकारण ईडी चौकशीच्या धमक्या देऊ नये. आपण घाबरत नाही, असेही आ. पाटील यांनी सांगितले.