शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

ना शाळा, ना परीक्षा; तरीही साडेपाच लाख विद्यार्थी पास !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:14 IST

जिल्ह्यात जि.प.च्या १ हजार २८४, माध्यमिक ५७० तर कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या २९८ आहे. कोरोनाच्या संकटामुळे गेल्या दीड वर्षापासून शाळा ...

जिल्ह्यात जि.प.च्या १ हजार २८४, माध्यमिक ५७० तर कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या २९८ आहे. कोरोनाच्या संकटामुळे गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद आहेत. मध्यंतरी दहावी आणि बारावीचे वर्ग सुरु करण्यात आले होते; मात्र रुग्णसंख्या वाढत असल्याने सदरील वर्ग बंद करण्यात आले. सध्या अनलॉक होत असले तरी शाळा सुरु करण्याबाबत निर्णय झालेला नाही. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात पहिली ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न देताच पुढील वर्गात प्रवेश देण्यात येणार आहे. त्यातच दहावी आणि बारावीच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ५ लाख ५० हजार २३४ विद्यार्थी परीक्षा न देताच उत्तीर्ण होत असल्याचे जिल्ह्यातील चित्र आहे.

वर्गनिहाय विद्यार्थी...

पहिली - ४६७७८

दुसरी - ४६७३३

तिसरी - ४६६२१

चौथी - ४७६९९

पाचवी - ४९२१५

सहावी - ४८४८८

सातवी - ४९६३७

आठवी - ४९२९३

नववी - ४८४६५

दहावी - ४७२९४

अकरावी - ३३५९३

बारावी - ३६४१८

जि.प.शाळा - १२८४

माध्यमिक शाळा - ५७०

कनिष्ठ महाविद्यालये - २९८

ऑनलाईन शिक्षण...

फायदे - कोरोनाच्या प्रादुर्भाव काळात विद्यार्थ्यांचे आराेग्यहित लक्षात घेता ऑनलाईन अभ्यासक्रम राबविण्यात आला.

घरच्या घरीच मुलांचा अभ्यास होत आहे. सोबतच शाळांच्या वतीने नियमित तासिकांचे नियोजन करण्यात येत आहे.

शाळेत गेल्यास अनेकांशी विद्यार्थ्यांचा संपर्क येऊ शकतो. त्यामुळे कोरोनाच्या काळात ऑनलाईनचा पर्याय चांगला वाटतो.

तोटे - जिल्ह्यात अनेक बालके मोबाईलची सुविधा नसल्याने ऑनलाईन अभ्यासापासून वंचित आहेत. त्यांच्यापर्यंत अद्यापही शिक्षण पोहोचले नाही.

अनेक गावात नेटवर्कचा अडथळा असल्याने ऑनलाईन अभ्यासात अडथळा येत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पालकांतून नाराजी आहे.

ऑनलाईन शिक्षणांत विद्यार्थ्यांच्या शंकाचे निरसन होत नाही. त्यामुळे ऑफलाईन शिक्षणच बरे असा पालकांचा आग्रह आहे.

शहरे - शहरात ऑनलाईन अभ्यासक्रमाला गती मिळालेली आहे. विद्यार्थ्यांचा चांगला सहभाग आहे. शाळांच्या वतीनेही अभ्यासावर भर दिला जात आहे.

ऑनलाईनच्या माध्यमातून शंकाचे निरसन होत नसल्याची ओरड आहे. खासगी शाळांच्या वतीने विद्यार्थ्यांची परिपूर्ण तयारी करुन घेतली जात आहे.

कोरोनामुळे शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अध्यापनाचे धडे दिले जात आहेत.

खेडेगाव - कोरोनामुळे गेल्या अनेक दिवसांपासून शाळा बंद आहेत. त्यामुळे पहिली ते चौथी तसेच आठवीपर्यंतची मुले आर्थिक अडचणीमुळे ऑनलाईन शिक्षणापासून वंचित आहेत.

गावात नेटवर्किंगचा अडथळा तसेच सोयी-सुविधा नसल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. शाळा सुरु होतील तेव्हाच मुले अभ्यास करायला लागतील अशी पालकांना आशा आहे.