शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

ना कॉल, ना ओटीपी, तरीही बँकेतून पैसे गायब ! फ्री गम, अनोळखी ॲपची परमिशन टाळा !!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:14 IST

लातूर : सोशल मीडियाच्या माध्यमातून सायबर गुन्हेगारीचा टक्का अलिकडे वाढला आहे. वेगवेगळे आमिष दाखवत अनेकांना लाखो रुपयांचा गंडा ऑनलाइन ...

लातूर : सोशल मीडियाच्या माध्यमातून सायबर गुन्हेगारीचा टक्का अलिकडे वाढला आहे. वेगवेगळे आमिष दाखवत अनेकांना लाखो रुपयांचा गंडा ऑनलाइन पद्धतीने घातला जातो. ना कॉल, ना ओटीपी तरीही बँकेतून पैसे गायब होण्याचे प्रकार अलिकडे वाढले आहेत. फ्री गेमच्या नादी लागून अनोळखी ॲप डाऊनलोड करणे आता अनेकांना महागात पडू शकते. यासाठी जागरुक राहणे गरजेचे आहे.

बनावट मोबाइल कॉलच्या माध्यमातून अनोळखी व्यक्ती संपर्क साधते. त्यातून बोलत बोलत माहिती विचारते. अशावेळी माहिती देणे टाळले पाहिजे. ओटीपी आणि ॲप डाऊनलोड करणे महागात पडू शकते. ओटीपीनंबर समोरील व्यक्तीला सांगितल्याबरोबर बँक खात्यावरील पैसे परस्पर गायब होतात. अलिकडे ऑनलाइनचा गोरखधंदा जोरात सुरू आहे. बँकेतून अधिकारी बोलतोय, अशी बतावणी करून ज्येष्ठ नागरिकांसह महिलांनाही गंडविण्याचे प्रकार पोलीस दप्तरी नोंद आहेत.

पैसे परत मिळण्याची शक्यता कमीच

उत्तर भारतातून हिंदी भाषेत बोलणाऱ्या व्यक्तींचे कॉल्स प्रामुख्याने महाराष्ट्रातील बँक ग्राहकांना येतात. फेक कंपनीच्या नावे आमिष दाखविले जाते.

सोशल मीडियातील वेगवेगळ्या ॲपच्या माध्यमातून जाहिराती केल्या जातात. या जाहिरातीला बळी पडलेल्या नागरिकांना लाखो रुपयांना गंडविले जाते. तर बनावट प्रोफाईलवरूनही फसविले जाते.

गोड बोलून गोपनीय माहिती विचारून घेतली जाते. त्यानंतर फसवणूक होते. अशा घटना अलिकडे वाढल्या आहेत. अश्लील फोटो शेअर करण्याच्या नावाखालीही फसविण्यात आल्याचे समोर आले आहे.

अनोळखी ॲप नकोच

सध्याचा डिजिटल जमाना आहे. सोशल मीडियात अनेक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली नवनवे ॲप्लिकेशन्स आले आहेत. हे ॲप्लिकेशन्स डाऊनलोड करण्याच्या मोहात फसवणूक होते.

अनोळखी ॲप डाऊनलोड केल्याने फसवणुकीचे प्रकार समोर आले आहेत. यासाठी नागरिकांनी जागरुक राहण्याची गरज आहे. अनोळखी ॲप डाऊनलोड करणेच महागात पडू शकते.

सोशल मीडियातून फसगत होत असेल तर सावध झाले पाहिजे. तातडीने पोलिसांशी संपर्क साधून रितसर तक्रार दाखल करावी. दक्षता हाच उत्तम उपाय आहे.

दरवर्षी लाखो रुपयांना होतेय फसवणूक

लातूर जिल्ह्यात दरवर्षी जवळपास १५ ते २० लाख रुपयांना फसवणूक होत आहे.

यामध्ये बँक खात्यातील रक्कम परस्पर गायब करण्याचे प्रकार वाढले आहेत.

तक्रार दाखल झाल्यानंतर सायबरच्या तपासात लाखो रुपयांना गंडविल्याचे समोर आले आहे.

नागरिकांनी काळजी घ्यावी

सोशल मीडियातून फसवणूक होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. मोबाइलसह इतर तंत्रज्ञान वापरताना काळजी घेण्याची गरज आहे. सायबर गुन्हेगारी टाळायची असेल तर प्रत्येक नागरिकाने दक्ष राहिले पाहिजे. - निखिल पिंगळे, पोलीस अधीक्षक लातूर.