शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मतदारांचा उत्साह; सकाळपासूनच लांब रांगा
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
5
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
6
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
7
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
8
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
9
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
10
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
11
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
12
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन
13
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
14
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
15
बिल्डरच्या १७ वर्षीय मुलाने घेतला दाेघांचा बळी
16
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
17
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
18
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
19
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
20
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 

Nagraj Manjule: "विचारवंत असतानाही लोकं झोपलेली आहेत, म्हणजे काहीतरी गंडलंय"

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 1:27 PM

नागराज मंजुळे यांनीही साहित्य संमेलनात येऊन कविता, साहित्य, चित्रपट आणि समाज या विषयावर परखड भाष्य केलं. 

लातूर - सध्याच्या कळात प्रेम करणं म्हणजेच विद्रोह होय. आजचं वातावरण पाहिलं असता, भांडणं करायची गरजच नाही, कारण आपल्या आजुबाजूला सगळं तेच आहे. आरे ला कारे म्हणायला धाडस लागत नाही. प्रेम करायला, आरे म्हणणाऱ्यांसमोर नम्रता दाखवायला हिंमत लागते, असे म्हणत सैराट फेम दिग्दर्शक नागरा मंजुळे यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात विद्रोही या शब्दाची त्यांच्या नजरेतून बदलेली वाख्या मांडली. तसेच, झोपलेल्या समाजाला जागं करण्याचं काम साहित्य संमेलनातून होतं, असेही ते म्हणाले.

उदगीर येथील उदयगिरी महाविद्यालयाच्या स्वरसम्राज्ञी लता मंगशेकर नगरीत भरलेल्या ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले होते. त्यानंतर, अनेक दिग्गजांनी या साहित्य संमेलनात उपस्थिती लावली. नागराज मंजुळे यांनीही साहित्य संमेलनात येऊन कविता, साहित्य, चित्रपट आणि समाज या विषयावर परखड भाष्य केलं. 

आम्ही लहान असताना गावात झोपलेल्या लोकांना जागं करायला, जागता पहारा द्यायला गुरखा येत होती. म्हणजे आपल्या घरात चोरी होऊ नये, दरोडा पडू नये म्हणून झापलेल्या लोकांना जागं ठेवण्यात हे गुरखा महत्त्वाची भूमिका पार पाडत होती. आता, समाजात झोपलेल्या लोकांना जागं करण्याचं काम या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून होत आहे. मात्र, विचारवंत असतानाही लोकं झोपलेली आहेत, म्हणजे काहीतरी गंडलंय, असे म्हणत नागराज मंजुळे यांनी झोपलेल्या लोकांना जागं करायला पाहिजे, असे मत मांडले. 

मला वाटतं की, साहित्यिक, कलाकार आणि यांच्या कलेतील दरी कमी व्हायला पाहिजे. कारण, साहित्यिक हेही कलाकारच असतात. म्हणूनच, साहित्यिक आणि कलाकार यांच्यातील अंतर कमी करणारं हे साहित्य संमेलन आहे. कलात्मक पातळीवर माझं साहित्य, कविता, कला किती यशस्वी ठरते यात मला घेणंदेणं नाही. आपली कला, साहित्य, चित्रपट हे माणसाच्या आयुष्यात उतरतं की नाही, हे पाहणं मला अधिक महत्त्वाचं वाटतं. साहित्य संमेलनातून सर्वसामान्यांचा विचार व्हायला हवा, त्यांच्या जगण्यातील गोष्टींचा विचार व्हावा. ते जर माणसांच्या उपयोगाला आलं नाही, जगण्याला आलं नाही, तर ते किती थोरं होतं याचं मला काहीही घेणंदेणं वाटत नाही, अशा शब्दात नागराज मंजुळेंनी साहित्य संमेलनाच्या मंचावरुन साहित्य आणि संमेलनावर परखड भाष्य केलं. 

टॅग्स :Nagraj Manjuleनागराज मंजुळेakhil bharatiya marathi sahitya mahamandalअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळlaturलातूरcinemaसिनेमा