शहरं
Join us  
Trending Stories
1
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
2
भारतानं 'असं' कोणतं सीक्रेट ऑपरेशन राबवलं?; बांगलादेशवर धुराचा लोट दिसला, सरकारनं मौन बाळगलं
3
मातृदिन विशेष: हंबरून वासराले, चाटते जवा गाय; तिच्यामंदी दिसते मले, तवा माही माय
4
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
5
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
6
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
7
नवं समीकरण! डिजिटल वॉरियर्स, डॉक्टर्स अन् युवा चेहरे; टीम विजय यांच्या कॅबिनेटमध्ये कुणाला संधी?
8
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
9
लग्नाच्या वाढदिवशीच गरोदर महिलेची हत्या; हुंड्यात 'बुलेट' न मिळाल्याने सासरच्यांनी घेतला जीव
10
‘पालखी निघाली राजाची…’, लालबागच्या राजावरील लोकप्रिय गीताचे संगीतकार नितीन मोरजकर यांचं निधन
11
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
12
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
13
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
14
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
15
ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या, प्रशासनाला दिला अल्टिमेटम; पुण्यात नेमकं काय घडलं प्रकरण?
16
'आधार'मधील बायोमेट्रिक 'त्रुटीभार' नागरिकांवर नको; मुंबई उच्च न्यायालयाने दिले 'यूआयडीएआय'ला निर्देश
17
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
18
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
19
विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?
20
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
Daily Top 2Weekly Top 5

उदगीरच्या माल धक्क्यातून रेल्वेला लाखोंचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:18 IST

उदगीर : येथील रेल्वेच्या मालधक्क्यावरून २४ बोगीतून भालकेश्वर साखर कारखान्याची ३१ हजार बॅग साखर सोमवारी मुंबईला रवाना झाली आहे. ...

उदगीर : येथील रेल्वेच्या मालधक्क्यावरून २४ बोगीतून भालकेश्वर साखर कारखान्याची ३१ हजार बॅग साखर सोमवारी मुंबईला रवाना झाली आहे. या मालवाहतुकीच्या भाड्यापोटी रेल्वेला १० लाख रुपये प्राप्त झाले आहेत. यापूर्वी येथून दोनदा सोयाबीनची वाहतूक झाली होती.

यावेळी वाणिज्य निरीक्षक संतोष चिगळे, स्टेशन उपअधीक्षक दीपक जोशी, उदगीर रेल्वे संघर्ष समितीचे सचिव मोतीलाल डोईजोडे, महादेव रोडगे, विक्रम हलकीकर आदी उपस्थित होते. उदगीरला पूर्वी मालधक्का होता. कालांतराने तो नामशेष झाला. हा मालधक्का पूर्ववत होण्यासाठी उदगीर रेल्वे संघर्ष समितीने सातत्याने पाठपुरावा केला. परिणामी, यंदा मालवाहतुकीसाठी रेल्वे प्रशासनाने परवानगी दिली. या संधीचे सोने करीत उदगीर येथील व्यापाऱ्यांनी सोयाबीनची वाहतूक करीत पहिल्या टप्प्यात ३८ लाख रुपयांचे भाडे देणारे बुकिंग पूर्ण केले. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातही ३८ लाखांचे भाडे देणाऱ्या सोयाबीनची वाहतूक करण्यात आली. या टप्प्यात आतापर्यंत एकूण ८६ लाख रुपये उत्पन्न रेल्वेला मिळाले आहे.

तिसऱ्या टप्प्यात सोमवारी बीदर जिल्ह्यातील भालकेश्वर साखर कारखान्याची साखर मुंबई येथे पाठविण्यात आली. या वाहतुकीमुळे उदगीर रेल्वेस्थानकातून होणाऱ्या नफ्यात मोठी भर पडली आहे. भविष्यात सोयी- सुविधा तसेच विविध मंजुरीसाठी लाभ होणार आहे. दरम्यान, उदगीर रेल्वे संघर्ष समितीचे सचिव मोतीलाल डोईजोडे व स्टेशन उपअधीक्षक दीपक जोशी यांनी विविध व्यापारी व कारखान्यांना भेट देऊन या वाहतुकीचे महत्त्व, सुरक्षितता व फायदा जाणीव करून दिल्यानंतर आता नाेंदणी वाढत आहे. उदगीर व परिसरातील व्यापारी आणि कारखान्यांनी स्वस्त व सुरक्षित वाहतूक असणाऱ्या रेल्वे वाहतुकीचा लाभ घ्यावा, असे आवाहन उदगीर रेल्वे संघर्ष समिती सचिव मोतीलाल डोईजोडे यांनी केले आहे.