शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
3
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
4
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
5
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
6
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
7
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
8
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
9
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
10
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
11
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
12
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
13
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
14
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
15
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
16
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
17
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
18
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
19
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
20
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण

Latur: दोघांनी जीवन संपवले, पण आरक्षणासाठीच्या चिठ्ठ्या बोगस आढळल्या; लिहिणाऱ्यांवर गुन्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 17:36 IST

तीन विविध समाजाची प्रकरणे; मयताची सुसाईड नोट लिहिणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल

लातूर : आरक्षण, सरकारी नोकरी व आर्थिक लाभाच्या उद्देशाने दोन मयतांच्या नावे सुसाईड नोट, तर आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या एका व्यक्तीच्या नावे लिहिलेली चिठ्ठी भलत्याच्याच अक्षरात निघाली. अखेर तपासात बिंग फुटले अन् तीन वेगवेगळ्या समाजातील प्रकरणांत पोलिसांनी मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे.

निलंगा तालुक्यातील दादगी येथे शिवाजी वाल्मीक मेळ्ळे (वय ३२) यांचा १३ सप्टेंबर २०२५ रोजी इलेक्ट्रिक शेगडीतून विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाला. त्यावेळी मरणोत्तर पंचनाम्यात पोलिसांना कोणतीही चिठ्ठी मिळाली नव्हती. तथापि, नंतर त्यांच्या घरात शर्टाच्या खिश्यातून एक चिठ्ठी मिळाली. ज्यामध्ये महादेव कोळी समाजाला जातीचे प्रमाणपत्र मिळत नाही, असा उल्लेख होता. तसेच १४ सप्टेंबर रोजी अनिल बळीराम राठोड (२७, रा. हणमंतवाडी तांडा, ता. चाकूर) यांचाही घराचे बांधकामासाठी पाणी मारताना विद्युत पंपातून विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाला. तिथेही पंचनाम्यादरम्यान चिठ्ठी नव्हती. नंतर शिवाजी फत्तू जाधव याने पोलिसांकडे चिठ्ठी सादर करून ती मृत व्यक्तीने लिहिल्याचा दावा केला. त्यात बंजारा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आत्महत्या करीत असल्याचा मजकूर होता. २६ ऑगस्ट रोजी बळीराम श्रीपती मुळे (वय ३६, रा. शिंदगी ता. अहमदपूर) यांनी विषारी द्रव पिले. त्यांना उपचारासाठी लातूरच्या प्लॅनेट रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, एका नातेवाइकाने आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी सादर केली. ज्यामध्ये मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख होता.

प्रकरणाचा उलगडा कसा झाला?अहमदपूर, निलंगा आणि चाकूर ठाण्यांमध्ये दाखल तिन्ही प्रकरणांमध्ये मृत व्यक्ती तसेच आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या व्यक्तीचे मूळ हस्ताक्षर आणि सादर झालेल्या चिठ्ठ्यांवरील हस्ताक्षर जुळले नाही. त्यानंतर चाकूर पोलिसांनी हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही तपासले. त्यामध्ये चिठ्ठी लिहिणारी संशयित व्यक्ती निष्पन्न झाली. याच पद्धतीने तीनही प्रकरणांतील संशयितांचे हस्ताक्षर नमुने तपासल्यानंतर शासकीय दस्तऐवज परीक्षण विभागाकडे पाठविण्यात आले. त्याच्या अहवालामध्ये हस्ताक्षर जुळत नसल्याचे निष्पन्न झाले.

कोणी लिहिल्या चिठ्ठ्या?यासंदर्भात जिल्हा पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी पत्रकारांना सांगितले, आत्महत्येचा प्रयत्न केलेला बळीराम मुळे यांची चिठ्ठी त्यांचा चुलत भाऊ संभाजी ऊर्फ धनाजी भिवाजी मुळे याने लिहिली. मयत शिवाजी मेळे प्रकरणातील चिठ्ठी माधव रामराव पिटले याने लिहिल्याचे समोर आले. तर अनिल राठोड प्रकरणातील चिठ्ठी शिवाजी फत्तू जाधव याने नरेंद्र विठ्ठल जक्कलवाड व तानाजी मधुकर जाधव यांच्याशी संगनमत करून नरेंद्र जक्कलवाड यांच्याकडून लिहून घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले. जिल्हा पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण आणि संबंधित पोलिस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांनी तिन्ही प्रकरणे संवेदनशीलपणे हाताळत बेकायदेशीर कृत्य समोर आणले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Latur: Suicide notes for reservation found fake; cases filed.

Web Summary : Three suicide notes, purportedly for reservation benefits, were discovered to be forged in Latur. Police investigations revealed discrepancies in handwriting, leading to charges against those who wrote the fake notes.
टॅग्स :laturलातूरCrime Newsगुन्हेगारीreservationआरक्षण