शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

घनकचरा व्यवस्थापनात लातूर मनपा अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 18:26 IST

देशभरात लातूर मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन मूल्यमापनात अव्वल ठरली.

ठळक मुद्देस्वच्छ सर्वेक्षण २०१९ राष्ट्रीय स्तरावरील प्रथम पारितोषिक

लातूर : स्वच्छ सर्वेक्षण २०१९ अंतर्गत उत्कृष्ट घनकचरा व्यवस्थापनात लातूर मनपा देशात अव्वल ठरली असून, राष्ट्रीय स्तरावरील प्रथम पारितोषिक पटकाविले आहे. ३ ते १० लाख लोकसंख्या असणाऱ्या शहरामधून झालेल्या मूल्यांकनात सदर पारितोषिक मिळाले आहे.

केंद्र शासनाच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबविण्यात आले होते. या अभियानाअंतर्गत असलेल्या केंद्रीय पथकाने लातूर मनपाच्या घनकचरा व्यवस्थापनाचे मूल्यमापन केले. या मूल्यमापनात लातूर मनपा अव्वल ठरली. सुका व ओला कचऱ्याचे वर्गीकरण करून संकलन करणे व त्याची विल्हेवाट लावण्यात लातूर मनपाला यश आले असून, प्रभाग क्र. ५, १८ तसेच शासकीय कॉलनी, फ्रुट मार्केट, विवेकानंद चौक, भाजीपाला मार्केट या ठिकाणी ओला कचऱ्यापासून खत निर्मितीचे प्रकल्प उभारले आहेत. त्याचबरोबर शासकीय कॉलनी येथे सुका कचऱ्याच्या विघटीकरणाचा प्रकल्प उभारला आहे. वरवंटी येथील कचरा डेपो येथे मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा ढिग असून, तेथे दररोज हजार टन कचऱ्यावर प्रक्रिया करणारी मोठी यंत्रणा उभी केली आहे. शहरातील सार्वजनिक भिंती रंगविणे, रात्रझडवई, १०० टक्के घंटागाडीद्वारे कचरा संकलन लातूर मनपाने अत्यंत चोख पद्धतीने केले आहे. प्रभाग क्र. ५ मध्ये पहिल्यांदा लातूर मनपाने ओला कचऱ्यापासून खत निर्मितीचा प्रकल्प उभारला आहे.

टाकाऊ प्लास्टिकपासून डांबरी रस्ता विकसीत करण्यात आला असून, सॅनिटरी नॅपकीनवरही प्रक्रिया प्रकल्प उभारला आहे. या प्रभागात जवळपास २० कुटुंब घरातच कचरा कुजवून खत बनवितात. कन्हैना नागरी सोसायटीत आणि भाजीपाला मार्केट येथेही तिसरा खत प्रकल्प उभारला आहे. या सर्व कामाचे मूल्यमापन केंद्रीय पथकाकडून झाले असून, त्याचा निकाल नुकताच जाहीर झाला होता. मात्र कोणत्या गटात पारितोषिक लातूर मनपाला मिळाले हे बुधवारी दिल्ली येथे जाहीर करण्यात आले असून, त्यात कचरा व्यवस्थापनात लातूर मनपाला राष्ट्रीय स्तरावरील देशात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. मनपाचे तत्कालीन आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर, सहायक आयुक्त वसुधा फड, सतीश शिवणे यांच्या नेतृत्वाखाली सफाई विभागातील कर्मचाऱ्यांनी अहोरात्र घेतलेल्या मेहनतीला राष्ट्रीय स्तरावरील पारितोषिक मिळाले आहे. 

राष्ट्रीयस्तरावरील सन्मान...लातूर शहरामध्ये ११ हजारांपेक्षा अधिक पथदिवे बसवून शहर उजळविले असून, सुका कचरा वर्गीकरण केंद्राची उभारणी तसेच शहरात पाच ठिकाणी खत प्रकल्प उभारले गेले. या खत प्रकल्पातून अनेक शेतकऱ्यांनी तसेच नर्सरी चालकांनी खतत विकत घेतला आहे. त्याचा मनपाला आर्थिक फायदा झाला आहे. विशेष म्हणजे कचरा डेपोवर गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा ढिग पडलेला होता. त्या ठिकाणी दररोज हजार टन प्रक्रिया करण्याची यंत्रणा उभारल्याने ढिग जमिनी स्तरावर आला आहे. याच कामाला राष्ट्रीय स्तरावरील सन्मान मिळाला आहे.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानGarbage Disposal Issueकचरा प्रश्नgovernment schemeसरकारी योजनाlaturलातूर