शहरं
Join us  
Trending Stories
1
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
2
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
3
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
4
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
5
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
6
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
7
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
8
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
9
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
10
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
11
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
12
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
13
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
14
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
15
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
16
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
17
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
18
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
19
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
20
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट

घनकचरा व्यवस्थापनात लातूर मनपा अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 18:26 IST

देशभरात लातूर मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन मूल्यमापनात अव्वल ठरली.

ठळक मुद्देस्वच्छ सर्वेक्षण २०१९ राष्ट्रीय स्तरावरील प्रथम पारितोषिक

लातूर : स्वच्छ सर्वेक्षण २०१९ अंतर्गत उत्कृष्ट घनकचरा व्यवस्थापनात लातूर मनपा देशात अव्वल ठरली असून, राष्ट्रीय स्तरावरील प्रथम पारितोषिक पटकाविले आहे. ३ ते १० लाख लोकसंख्या असणाऱ्या शहरामधून झालेल्या मूल्यांकनात सदर पारितोषिक मिळाले आहे.

केंद्र शासनाच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबविण्यात आले होते. या अभियानाअंतर्गत असलेल्या केंद्रीय पथकाने लातूर मनपाच्या घनकचरा व्यवस्थापनाचे मूल्यमापन केले. या मूल्यमापनात लातूर मनपा अव्वल ठरली. सुका व ओला कचऱ्याचे वर्गीकरण करून संकलन करणे व त्याची विल्हेवाट लावण्यात लातूर मनपाला यश आले असून, प्रभाग क्र. ५, १८ तसेच शासकीय कॉलनी, फ्रुट मार्केट, विवेकानंद चौक, भाजीपाला मार्केट या ठिकाणी ओला कचऱ्यापासून खत निर्मितीचे प्रकल्प उभारले आहेत. त्याचबरोबर शासकीय कॉलनी येथे सुका कचऱ्याच्या विघटीकरणाचा प्रकल्प उभारला आहे. वरवंटी येथील कचरा डेपो येथे मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा ढिग असून, तेथे दररोज हजार टन कचऱ्यावर प्रक्रिया करणारी मोठी यंत्रणा उभी केली आहे. शहरातील सार्वजनिक भिंती रंगविणे, रात्रझडवई, १०० टक्के घंटागाडीद्वारे कचरा संकलन लातूर मनपाने अत्यंत चोख पद्धतीने केले आहे. प्रभाग क्र. ५ मध्ये पहिल्यांदा लातूर मनपाने ओला कचऱ्यापासून खत निर्मितीचा प्रकल्प उभारला आहे.

टाकाऊ प्लास्टिकपासून डांबरी रस्ता विकसीत करण्यात आला असून, सॅनिटरी नॅपकीनवरही प्रक्रिया प्रकल्प उभारला आहे. या प्रभागात जवळपास २० कुटुंब घरातच कचरा कुजवून खत बनवितात. कन्हैना नागरी सोसायटीत आणि भाजीपाला मार्केट येथेही तिसरा खत प्रकल्प उभारला आहे. या सर्व कामाचे मूल्यमापन केंद्रीय पथकाकडून झाले असून, त्याचा निकाल नुकताच जाहीर झाला होता. मात्र कोणत्या गटात पारितोषिक लातूर मनपाला मिळाले हे बुधवारी दिल्ली येथे जाहीर करण्यात आले असून, त्यात कचरा व्यवस्थापनात लातूर मनपाला राष्ट्रीय स्तरावरील देशात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. मनपाचे तत्कालीन आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर, सहायक आयुक्त वसुधा फड, सतीश शिवणे यांच्या नेतृत्वाखाली सफाई विभागातील कर्मचाऱ्यांनी अहोरात्र घेतलेल्या मेहनतीला राष्ट्रीय स्तरावरील पारितोषिक मिळाले आहे. 

राष्ट्रीयस्तरावरील सन्मान...लातूर शहरामध्ये ११ हजारांपेक्षा अधिक पथदिवे बसवून शहर उजळविले असून, सुका कचरा वर्गीकरण केंद्राची उभारणी तसेच शहरात पाच ठिकाणी खत प्रकल्प उभारले गेले. या खत प्रकल्पातून अनेक शेतकऱ्यांनी तसेच नर्सरी चालकांनी खतत विकत घेतला आहे. त्याचा मनपाला आर्थिक फायदा झाला आहे. विशेष म्हणजे कचरा डेपोवर गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा ढिग पडलेला होता. त्या ठिकाणी दररोज हजार टन प्रक्रिया करण्याची यंत्रणा उभारल्याने ढिग जमिनी स्तरावर आला आहे. याच कामाला राष्ट्रीय स्तरावरील सन्मान मिळाला आहे.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानGarbage Disposal Issueकचरा प्रश्नgovernment schemeसरकारी योजनाlaturलातूर