शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

लातूर जिल्ह्यात वर्षभरात ८४९ अपघातात ३८४ जणांचा मृत्यू; हेल्मेट, सिटबेलचा वापर केला असता, तर अनेकांचे वाचले असते प्राण !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 15:30 IST

केवळ दुचाकी चालवतानाच नाही, तर मागे बसणाऱ्या सहप्रवाशानेही हेल्मेट वापरणे तितकेच गरजेचे

लातूर : लातूर जिल्ह्यात २०२५ मध्ये झालेल्या रस्ते अपघातांची आकडेवारी केवळ आकडा नसून, ती अनेक कुटुंबांच्या वेदनांची कहाणी आहे. जिल्हा पोलीस दलाने केलेल्या विश्लेषणातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. जर वाहनचालकांनी हेल्मेट आणि सीटबेल्टचा वापर केला असता, तर अपघातात मृत्यू झालेल्या ३८४ व्यक्तींपैकी बहुतेकांचे प्राण वाचवता आले असते.

जिल्ह्यात झालेल्या २९७ दुचाकी अपघातांमध्ये तब्बल २४० जणांनी आपला जीव गमावला. पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी केलेल्या विश्लेषणानुसार, या मृतांपैकी बहुतांश जणांनी हेल्मेट घातलेले नव्हते. डोक्याला झालेली गंभीर दुखापत हेच या मृत्यूंचे मुख्य कारण ठरले आहे. केवळ दुचाकी चालवतानाच नाही, तर मागे बसणाऱ्या सहप्रवाशानेही हेल्मेट वापरणे तितकेच गरजेचे आहे, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

अपघातांचे दाहक वास्तव..!
एकूण अपघात : ८४९
झालेले मृत्यू : ३८४
दुचाकी अपघातातील मृत्यू : २४०

डोक्याला झालेली दुखापत मृत्यूंचे मुख्य कारण

चारचाकी वाहनातील सहप्रवाशांनी सीटबेल्ट न लावल्यामुळे आणि दुचाकीस्वारांनी हेल्मेट टाळल्यामुळे किरकोळ अपघातांचे रूपांतरही 'प्राणांतिक' अपघातात झाले आहे. डोक्याला झालेली गंभीर दुखापत हेच या मृत्यूंचे मुख्य कारण ठरले आहे
-अमोल तांबे, जिल्हा पोलिस अधीक्षक, लातूर.

सीटबेल्ट : सुरक्षित प्रवासाचा 'पासपोर्ट'
केवळ दुचाकीच नव्हे, तर चारचाकी वाहनांच्या बाबतीतही निष्काळजीपणा दिसून येत आहे. महामार्गावर किंवा अंतर्गत रस्त्यांवर वाहन चालवताना सीटबेल्ट न लावल्यामुळे अपघाताच्या वेळी व्यक्ती वाहनाबाहेर फेकली जाते किंवा स्टिअरिंगवर आदळते. एअरबॅग्ज असूनही, सीटबेल्ट नसेल, तर त्या अनेकदा उघडत नाहीत. यामुळेच गंभीर जखमी होण्याचे आणि जीव गमवावे लागण्याचे प्रमाण वाढले आहे.

जिल्हा पोलिस प्रशासनाचे आवाहन !
घराबाहेर दुचाकीवर निघताना आयएसआय मार्क असलेले हेल्मेट डोक्यावर असल्याची खात्री करा.
चारचाकीत बसताच सर्वात आधी सीटबेल्ट लावा.
लक्षात ठेवा, तुमची सुरक्षा हीच तुमच्या कुटुंबाची सुख-शांती आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Latur: Lack of Helmets, Seatbelts Led to 384 Fatalities

Web Summary : Latur accidents claimed 384 lives in a year. Helmets and seatbelts could have prevented many deaths. Head injuries were the main cause. Police urge safety measures.
टॅग्स :Accidentअपघातlaturलातूर