घरफाेडीतील आराेपी जाळ्यात; चाैकशीत नऊ गुन्ह्यांचा उलगडा
By राजकुमार जोंधळे | Updated: June 28, 2025 21:41 IST2025-06-28T21:40:53+5:302025-06-28T21:41:29+5:30
स्थागुशाची कारवाई : दाेन लाखांचा मुद्देमाल जप्त

घरफाेडीतील आराेपी जाळ्यात; चाैकशीत नऊ गुन्ह्यांचा उलगडा
राजकुमार जाेंधळे, लातूर: घरफोडीतील एका आराेपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी अटक केली असून, त्याच्याकडून १ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पाेलिसांनी केलेल्या चाैकशीमध्ये एकूण नऊ गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.
पाेलिसांनी सांगितले, काही दिवसांपासून लातूर शहरात वेगवेगळ्या दुकानांचे रात्री पत्रे कापून, कडीकोंडा तोडून रोकड, मोबाईल पळविल्याल्या घटना घडल्या हाेत्या. दरम्यान, याबाबत शिवाजीनगर आणि एमआयडीसी ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले होते. यातील आराेपींच्या मुसक्या आवळण्याचे आदेश जिल्हा पाेलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी आदेश दिले. अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या पथकाने आराेपीचा शाेध सुरू केला. आराेपींचा माग काढताना खबऱ्याने माहिती दिली. याची खातरजमा केली असता, रेणापूर नाका परिसरात पाेलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले. त्याची झाडाझडती घेत कसून चाैकशी केली असता, दिनेश महादेव टेकाळे उर्फ शंकर दत्तात्रय पांचाळ (वय २९ रा. हरिभाऊनगर, कृपासदनरोड, लातूर) असे त्याने नाव सांगितले.
माेबाइल, राेकड, पक्कड, कटर जप्त...
लातूर शहरातील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत चाेरलेले मोबाइल, रोख रक्कम, हॅन्डग्लोज, पक्कड, कटर, लोखंडी टामी असे साहित्य त्याच्याकडून जप्त केले. शिवाय, स्थागुशाच्या पथकाने उदगीर येथे कारवाई करत गुन्ह्यात चोरलेले दोन मोबाइलही जप्त केले. चाैकशीमध्ये घरफोडी, चोरीच्या ९ गुन्ह्यांचा उलगडा करून, पाेलिसांनी १ लाख ८० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
लातूरसह उदगीर शहरामध्ये घरफाेडी, चाेरी केल्याचे उघड...
अटक केलेल्या चाेरट्याने लातूर शहरासह जिल्ह्यातील उदगीरमध्येही घरफाेड्यासह इतर चाेऱ्या केल्याचे उघड झाले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर, पोउपनि. राजाभाऊ घाडगे, पोलिस अमलदार युवराज गिरी, राहुल सोनकांबळे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, सिद्धेश्वर मदने, जमीर शेख, राहुल कांबळे, गणेश साठे, साहेबराव हाके, रियाज सौदागर, मनोज खोसे, नितीन कठारे, शैलेश सुडे, अंजली गायकवाड यांच्या पथकाने केली आहे.