शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

'सुपर ४०' विद्यार्थी घडविणाऱ्या विद्यानिकेतनच्या धोरणावर शासनाची उदासीनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 12:18 IST

राज्यातील शासकीय विद्यानिकेतनच्या ५० टक्के जागा रिक्त

ठळक मुद्देमोफत शिक्षणाकडे पाठ  नवोदयची प्रेरणा घेतली विद्यानिकेतनमधून

- धर्मराज हल्लाळे  

लातूर :  इयत्ता पाचवीत शिष्यवृत्ती परीक्षेद्वारे राज्यभरातील हजारो विद्यार्थ्यांमधून दरवर्षी सुपर ४० विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना दहावीपर्यंतचे शिक्षण सर्व सुविधांसह ५ शासकीय विद्यानिकेतनमधून मोफत दिले जाते़ मात्र गेल्या काही वर्षात प्रतिविद्यार्थ्यामागे केवळ ५०० रुपये  तुटपुंजे अनुदान आणि विद्यानिकेतनच्या ५० टक्के रिक्त असलेल्या जागांमुळे शासनाची उदासीनता समोर आली असून मोफत शिक्षणाला हरताळ फासला जात आहे. 

ग्रामीण भागातील गुणवान विद्यार्थ्यांना सर्वसुविधांसह मोफत शिक्षण मिळावे या हेतूने तत्कालीन शिक्षणमंत्री डॉ़ मधुकरराव चौधरी यांनी १९६६ मध्ये अमरावती, औरंगाबाद, धुळे, पुसेगाव (सातारा), केळापूर (यवतमाळ) येथे शासकीय विद्यानिकेतने सुरू केली़. येथे इयत्ता ६  वी ते १० वीपर्यंत मोफत शिक्षण मिळते. याच विद्यानिकेतनमध्ये ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ वि़वि़ चिपळूणकर यांनी प्राचार्यपद सांभाळले होते. येथून अनेक प्राचार्य  राज्याचे शिक्षण संचालकही झाले़ आहेत. या विद्यानिकेतमध्ये प्रत्येक वर्गात ४० याप्रमाणे २०० विद्यार्थी क्षमता आहे़ मात्र, सद्यस्थितीत अमरावतीच्या विद्यानिकेतनमध्ये १५० विद्यार्थी आहेत़ तर धुळ्यात ७३, औरंगाबाद १०८, पुसेगाव ६७, केळापूरला ११४ विद्यार्थीच प्रवेशित आहेत़

सुपर ४० चे गणित बिघडलेशासनाच्या उदासिनतेने विद्यानिकेतनांच्या अनुदानात काही केल्या बदल झाला नाही. आज  प्रतिविद्यार्थ्यांमागे मिळणाऱ्या ५०० रुपयांच्या अनुदानात निवास, भोजन खर्च भागविणे अत्यंत कठिण असल्याने सर्वच गणित बिघडले आहे. शासनाने आश्रमशाळा अनुदानात जशी वाढ केली, तशीच तरतुद विद्यानिकेतनसाठी करणे गरजेचे आहे.

ना शिक्षक, ना सुविधाधुळ्यात १२ शिक्षक मंजूर असताना, केवळ चारच शिक्षक आहेत.  विद्यार्थ्यांसाठी असलेल्या १६ शौचालयांपैकी एकच सुरू़ आहे. विद्यार्थ्यांना गरम पाणीही मिळत नाही. औरंगाबादमध्ये आठच शिक्षक आहेत. पुसेगाव (सातारा) येथे माजी विद्यार्थ्यांनीच शाळेला रंगरंगोटी केली़ शासन मात्र,उदासिन आहे.

नवोदयची प्रेरणा घेतली विद्यानिकेतनमधून१९६६ ला सुरू झालेल्या औरंगाबादच्या विद्यानिकेतनला दिवंगत पंतप्रधान पी़व्ही़ नरसिंहराव यांनी ते केंद्रात मंत्री असताना भेट दिली होती़ राज्य शासनाची सुपर ४० ची संकल्पना त्यांना आवडली़ त्यानंतर देशभर जवाहर नवोदय विद्यालये स्थापन झाली़ जेथून प्रेरणा मिळाली ती विद्यानिकेतने मात्र आज मोडकळीला आली आहेत़ विशेष म्हणजे विद्यानिकेतन मुलींसाठी शासन सुरू करू शकले नाही.

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थीAurangabadऔरंगाबादState Governmentराज्य सरकार