शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकट; KL राहुलनं एक कॅच सोडला
4
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
5
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
6
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
7
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
8
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
9
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
10
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
11
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
12
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
13
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
14
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
15
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
16
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
17
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
18
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
19
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल

'सुपर ४०' विद्यार्थी घडविणाऱ्या विद्यानिकेतनच्या धोरणावर शासनाची उदासीनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 12:18 IST

राज्यातील शासकीय विद्यानिकेतनच्या ५० टक्के जागा रिक्त

ठळक मुद्देमोफत शिक्षणाकडे पाठ  नवोदयची प्रेरणा घेतली विद्यानिकेतनमधून

- धर्मराज हल्लाळे  

लातूर :  इयत्ता पाचवीत शिष्यवृत्ती परीक्षेद्वारे राज्यभरातील हजारो विद्यार्थ्यांमधून दरवर्षी सुपर ४० विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना दहावीपर्यंतचे शिक्षण सर्व सुविधांसह ५ शासकीय विद्यानिकेतनमधून मोफत दिले जाते़ मात्र गेल्या काही वर्षात प्रतिविद्यार्थ्यामागे केवळ ५०० रुपये  तुटपुंजे अनुदान आणि विद्यानिकेतनच्या ५० टक्के रिक्त असलेल्या जागांमुळे शासनाची उदासीनता समोर आली असून मोफत शिक्षणाला हरताळ फासला जात आहे. 

ग्रामीण भागातील गुणवान विद्यार्थ्यांना सर्वसुविधांसह मोफत शिक्षण मिळावे या हेतूने तत्कालीन शिक्षणमंत्री डॉ़ मधुकरराव चौधरी यांनी १९६६ मध्ये अमरावती, औरंगाबाद, धुळे, पुसेगाव (सातारा), केळापूर (यवतमाळ) येथे शासकीय विद्यानिकेतने सुरू केली़. येथे इयत्ता ६  वी ते १० वीपर्यंत मोफत शिक्षण मिळते. याच विद्यानिकेतनमध्ये ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ वि़वि़ चिपळूणकर यांनी प्राचार्यपद सांभाळले होते. येथून अनेक प्राचार्य  राज्याचे शिक्षण संचालकही झाले़ आहेत. या विद्यानिकेतमध्ये प्रत्येक वर्गात ४० याप्रमाणे २०० विद्यार्थी क्षमता आहे़ मात्र, सद्यस्थितीत अमरावतीच्या विद्यानिकेतनमध्ये १५० विद्यार्थी आहेत़ तर धुळ्यात ७३, औरंगाबाद १०८, पुसेगाव ६७, केळापूरला ११४ विद्यार्थीच प्रवेशित आहेत़

सुपर ४० चे गणित बिघडलेशासनाच्या उदासिनतेने विद्यानिकेतनांच्या अनुदानात काही केल्या बदल झाला नाही. आज  प्रतिविद्यार्थ्यांमागे मिळणाऱ्या ५०० रुपयांच्या अनुदानात निवास, भोजन खर्च भागविणे अत्यंत कठिण असल्याने सर्वच गणित बिघडले आहे. शासनाने आश्रमशाळा अनुदानात जशी वाढ केली, तशीच तरतुद विद्यानिकेतनसाठी करणे गरजेचे आहे.

ना शिक्षक, ना सुविधाधुळ्यात १२ शिक्षक मंजूर असताना, केवळ चारच शिक्षक आहेत.  विद्यार्थ्यांसाठी असलेल्या १६ शौचालयांपैकी एकच सुरू़ आहे. विद्यार्थ्यांना गरम पाणीही मिळत नाही. औरंगाबादमध्ये आठच शिक्षक आहेत. पुसेगाव (सातारा) येथे माजी विद्यार्थ्यांनीच शाळेला रंगरंगोटी केली़ शासन मात्र,उदासिन आहे.

नवोदयची प्रेरणा घेतली विद्यानिकेतनमधून१९६६ ला सुरू झालेल्या औरंगाबादच्या विद्यानिकेतनला दिवंगत पंतप्रधान पी़व्ही़ नरसिंहराव यांनी ते केंद्रात मंत्री असताना भेट दिली होती़ राज्य शासनाची सुपर ४० ची संकल्पना त्यांना आवडली़ त्यानंतर देशभर जवाहर नवोदय विद्यालये स्थापन झाली़ जेथून प्रेरणा मिळाली ती विद्यानिकेतने मात्र आज मोडकळीला आली आहेत़ विशेष म्हणजे विद्यानिकेतन मुलींसाठी शासन सुरू करू शकले नाही.

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थीAurangabadऔरंगाबादState Governmentराज्य सरकार