शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
4
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
5
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
6
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
7
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
8
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
10
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
11
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
12
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
13
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
14
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
15
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
16
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
17
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
18
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
19
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
20
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज

१० हजार फुटावरून पाण्याची व्यवस्था करून कमावली चार एकर जमीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 19:54 IST

यशकथा : गटशेतीवर भर असल्याने सोबतच्या जवळपास दहा शेतकऱ्यांचीही प्रगती होत आहे़

- हरी मोकाशे ( लातूर )

सुरुवातीला दहा वर्षे कोरडवाहू शेती केली़ परंतु ती परवडत नसल्याने राजकुमार बिरादार यांनी नातेवाईकांना सोबत घेऊन १० हजार फूट लांब असलेल्या मांजरा नदीवरून जलवाहिनी टाकली़ शेतीत पाणी उपलब्ध झाल्याने वेगवेगळे नवनवीन प्रयोग करीत आलेल्या उत्पन्नातून चार एकर शेती कमावली आहे़ विशेष म्हणजे त्यांचा गटशेतीवर भर असल्याने सोबतच्या जवळपास दहा शेतकऱ्यांचीही प्रगती होत आहे़

लातूर जिल्ह्यातील विजयनगर (गौंडगाव) ता. देवणी येथील राजकुमार धोंडिराम बिरादार यांचे शिक्षण केवळ सातवीपर्यंत़ आई, वडील, दोन भावांसह कुटुंबात १८ जण़ लहान भाऊ दशरथ यांचे शिक्षण १२ वीपर्यंत झालेले. कुटुंबास वडिलोपार्जित १६ एकर शेती़ राजकुमार बिरादार यांनी १९८५ पासून कोरडवाहू शेती करण्यास सुरुवात केली़ १० वर्षे उलटली तरी शेती उत्पन्न पोटापुरतेच निघत असे़ शेती पाण्याखाली आणल्याशिवाय प्रगती होऊ शकत नाही हे जाणून त्यांनी २००० मध्ये चुलत भाऊ व गावातील नातेवाईकांना सोबत घेऊन मांजरा नदीवरून १० हजार फूट लांबीची शेतापर्यंत पाईपलाईन केली़ त्या पाण्यात चुलत भाऊ व नातेवाईकांनाही हिस्सा दिला़ 

यानंतर त्यांनी ६ फुटांच्या पट्टा पद्धतीने दोन एकर ऊस लागवड केली़ एकरी ६९ टनापर्यंत उत्पादन घेतले़ त्यामुळे आर्थिक प्रगती होऊ लागली़ सातत्याने एकच पीक घेतल्याने जमिनीचा पोत घसरतो हे जाणून त्यांनी २०११ मध्ये नजीकच्या सात शेतकऱ्यांना सोबत घेऊन एक एकरवर भेंडी, वांगे लागवड तर दोन एकरवर पपईची लागवड केली़ त्यांची भेंडी कुवेतच्या बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाली़ जागेवरच त्यांना ३१ रुपये प्रतिकिलो असा भाव मिळाला होता़ खर्च वगळता तीन महिन्यांत लाखाचे उत्पादन मिळाले़ तसेच पपईला दिल्ली, नागपूर, मुंबईची बाजारपेठ मिळाल्याने खर्च वगळता चार लाखांचे उत्पन्न मिळाले़

दरम्यान, पपईवर रोगराई येऊ लागल्याने त्यांनी २०१७-१८ पासून मनरेगांतर्गत एक एकरवर तुतीची लागवड केली आहे़ पंधरा दिवसांपूर्वी एक क्विंटल रेशीमची बेंगलोरच्या बाजारपेठेत विक्री झाली असून, त्यास २९ हजार रुपये असा दर मिळाल्याचे राजकुमार बिरादार यांनी सांगितले़ शेतीतील वेगवेगळ्या प्रयोगाबरोबरच गटशेतीवर भर असल्याने त्यांना राज्य शासनाच्या वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले आहे़

शेतीला जोड म्हणून छोटासा दुग्ध व्यवसायही करतो, असे सांगून राजकुमार बिरादार म्हणाले, सासुरवाडीने देवणी गावरान जातीची एक वर्षाची कारवड आंदण दिली होती़ तिचा व्यवस्थित सांभाळ केल्याने आतापर्यंत तिने १८ पारड आणि २ कारवडी दिल्या आहेत़ प्रत्येक पारडास २५ हजारापर्यंत किंमत मिळाली आहे़ इतर शेतकऱ्यांनीही नवनवीनवन प्रयोग करावेत यासाठी मी प्रयत्न करतो़ त्यामुळे आजघडीला जवळपास १० शेतकरी असे प्रयत्न करीत असल्याचे बिरादार यांनी सांगितले.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी