शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
6
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
8
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
9
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
10
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
11
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
12
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
13
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
14
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
15
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
16
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
17
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
18
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
19
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
20
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?

१० हजार फुटावरून पाण्याची व्यवस्था करून कमावली चार एकर जमीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 19:54 IST

यशकथा : गटशेतीवर भर असल्याने सोबतच्या जवळपास दहा शेतकऱ्यांचीही प्रगती होत आहे़

- हरी मोकाशे ( लातूर )

सुरुवातीला दहा वर्षे कोरडवाहू शेती केली़ परंतु ती परवडत नसल्याने राजकुमार बिरादार यांनी नातेवाईकांना सोबत घेऊन १० हजार फूट लांब असलेल्या मांजरा नदीवरून जलवाहिनी टाकली़ शेतीत पाणी उपलब्ध झाल्याने वेगवेगळे नवनवीन प्रयोग करीत आलेल्या उत्पन्नातून चार एकर शेती कमावली आहे़ विशेष म्हणजे त्यांचा गटशेतीवर भर असल्याने सोबतच्या जवळपास दहा शेतकऱ्यांचीही प्रगती होत आहे़

लातूर जिल्ह्यातील विजयनगर (गौंडगाव) ता. देवणी येथील राजकुमार धोंडिराम बिरादार यांचे शिक्षण केवळ सातवीपर्यंत़ आई, वडील, दोन भावांसह कुटुंबात १८ जण़ लहान भाऊ दशरथ यांचे शिक्षण १२ वीपर्यंत झालेले. कुटुंबास वडिलोपार्जित १६ एकर शेती़ राजकुमार बिरादार यांनी १९८५ पासून कोरडवाहू शेती करण्यास सुरुवात केली़ १० वर्षे उलटली तरी शेती उत्पन्न पोटापुरतेच निघत असे़ शेती पाण्याखाली आणल्याशिवाय प्रगती होऊ शकत नाही हे जाणून त्यांनी २००० मध्ये चुलत भाऊ व गावातील नातेवाईकांना सोबत घेऊन मांजरा नदीवरून १० हजार फूट लांबीची शेतापर्यंत पाईपलाईन केली़ त्या पाण्यात चुलत भाऊ व नातेवाईकांनाही हिस्सा दिला़ 

यानंतर त्यांनी ६ फुटांच्या पट्टा पद्धतीने दोन एकर ऊस लागवड केली़ एकरी ६९ टनापर्यंत उत्पादन घेतले़ त्यामुळे आर्थिक प्रगती होऊ लागली़ सातत्याने एकच पीक घेतल्याने जमिनीचा पोत घसरतो हे जाणून त्यांनी २०११ मध्ये नजीकच्या सात शेतकऱ्यांना सोबत घेऊन एक एकरवर भेंडी, वांगे लागवड तर दोन एकरवर पपईची लागवड केली़ त्यांची भेंडी कुवेतच्या बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाली़ जागेवरच त्यांना ३१ रुपये प्रतिकिलो असा भाव मिळाला होता़ खर्च वगळता तीन महिन्यांत लाखाचे उत्पादन मिळाले़ तसेच पपईला दिल्ली, नागपूर, मुंबईची बाजारपेठ मिळाल्याने खर्च वगळता चार लाखांचे उत्पन्न मिळाले़

दरम्यान, पपईवर रोगराई येऊ लागल्याने त्यांनी २०१७-१८ पासून मनरेगांतर्गत एक एकरवर तुतीची लागवड केली आहे़ पंधरा दिवसांपूर्वी एक क्विंटल रेशीमची बेंगलोरच्या बाजारपेठेत विक्री झाली असून, त्यास २९ हजार रुपये असा दर मिळाल्याचे राजकुमार बिरादार यांनी सांगितले़ शेतीतील वेगवेगळ्या प्रयोगाबरोबरच गटशेतीवर भर असल्याने त्यांना राज्य शासनाच्या वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले आहे़

शेतीला जोड म्हणून छोटासा दुग्ध व्यवसायही करतो, असे सांगून राजकुमार बिरादार म्हणाले, सासुरवाडीने देवणी गावरान जातीची एक वर्षाची कारवड आंदण दिली होती़ तिचा व्यवस्थित सांभाळ केल्याने आतापर्यंत तिने १८ पारड आणि २ कारवडी दिल्या आहेत़ प्रत्येक पारडास २५ हजारापर्यंत किंमत मिळाली आहे़ इतर शेतकऱ्यांनीही नवनवीनवन प्रयोग करावेत यासाठी मी प्रयत्न करतो़ त्यामुळे आजघडीला जवळपास १० शेतकरी असे प्रयत्न करीत असल्याचे बिरादार यांनी सांगितले.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी