शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 1 मे रोजी अयोध्या दौऱ्यावर, रामललांचं दंर्शन, हनुमानगढी मंदिरात आरती अन्...; असा असेल संपूर्ण कार्यक्रम!
2
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
3
KL Rahul च्या नेतृत्वासमोर मुंबई इंडियन्स ढेपाळले; रोहित ४, तर हार्दिक गोल्डन डकवर आऊट 
4
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
5
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मेसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
6
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
7
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
8
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
9
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
10
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
11
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
12
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
13
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
14
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
15
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
16
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
17
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
18
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
19
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
20
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर सोयाबीनची केली होळी

By हरी मोकाशे | Published: September 23, 2022 5:46 PM

सरसकट पंचनामे करून नुकसानभरपाई देण्यात यावी

रेणापूर (जि. लातूर) : तालुक्यातील कारेपूर महसूल मंडळात अतिवृष्टी आणि गोगलगायींच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे नुकसान झाले. त्यामुळे नुकसानीचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी, या मागणीसाठी शुक्रवारी येथील तहसील कार्यालयासमोर खराब झालेल्या सोयाबीनची होळी करण्यात आली. यावेळी रास्ता रोको आंदोलन करण्याचा प्रयत्नही करण्यात आला. मात्र, पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना रोखले.

किसान सेनेचे अध्यक्ष गजानन बोळंगे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात नवनाथ गाडे, अनंत बरुरे, महादेव बरुरे, लहू गाडे, विजय आरदवाड, हबीब शेख, अजय दाडगे, अविनाश पाटील, राजकुमार हारडे, प्रकाश साबदे, रामकिसन सोमवंशी यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.

रेणापूर तालुक्यात खरीप हंगामात सोयाबीनची पेरणी झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात गोगलगायींचा प्रादुर्भाव होऊन पिकाचे नुकसान झाले. गोगलगायींच्या प्रादुर्भावामुळे तालुक्यातील काही भागांतील शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणी करावी लागली होती. शिवाय, मागील एक-दीड महिन्यापासून सतत पाऊस झाला. कारेपूर महसूल मंडळात सर्वाधिक पाऊस झाला. त्यामुळे शिल्लक राहिलेल्या सोयाबीनला फटका बसला. काही ठिकाणच्या सोयाबीनला शेंगाच लागल्या नाहीत. त्यामुळे कारेपूर मंडळातील शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे जवळपास ८० ते ९० टक्के नुकसान झाले आहे. बाधित झालेल्या सोयाबीन पिकाची पाहणी करून सरसकट पंचनामे करावेत म्हणून किसान सेनेचे अध्यक्ष गजानन बोळंगे यांनी जिल्हाधिकारी व तहसीलदारांना निवेदन दिले होते.

मात्र, प्रशासनाकडून दखल घेतली गेली नसल्याने शुक्रवारी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी जोरदार घोषणा दिल्या. यावेळी शेतकऱ्यांनी सोबत आणलेल्या सोयाबीनची होळी करून संताप व्यक्त केला. शासनाच्या कारभारावर संताप व्यक्त करण्यात आला.

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरी