शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
3
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
4
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
6
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
7
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
8
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
9
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
10
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
11
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
12
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
13
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
14
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
15
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
16
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
17
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
18
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
19
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
20
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले

महावितरणच्या उजनी कार्यालयात शेतक-याने केले विष प्राशन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2018 7:14 PM

कृषीपंपाचे ६० हजार रुपये आलेले वीजबिल कमी करून दिले नसल्याच्या कारणाने एकंबी तांडा येथील एका शेतक-याने उजनी महावितरण कार्यालयात मंगळवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास विषारी द्रव प्राशन केले

उजनी (लातूर) : कृषीपंपाचे ६० हजार रुपये आलेले वीजबिल कमी करून दिले नसल्याच्या कारणाने एकंबी तांडा येथील एका शेतक-याने उजनी महावितरण कार्यालयात मंगळवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास विषारी द्रव प्राशन केले. दरम्यान, शेतक-याची प्रकृती चिंताजनक असून, लातूरच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. औसा तालुक्यातील एकंबी तांडा येथील शेतकरी शहाजी धिरु राठोड (४२) यांना ६० हजार रुपयांचे कृषी पंपाचे वीजबिल आले आहे. सदर बिल कमी करून द्यावे म्हणून त्यांनी उजनी येथील महावितरण कार्यालयात अनेकदा खेटे मारले. मात्र संबंधित अभियंत्यांकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे शहाजी राठोड पुन्हा मंगळवारी उजनी येथील महावितरणच्या कार्यालयात आले. मला वीजबिल कमी करून दिले नाही, अनेकवेळा मागणी केली तरी ते कमी केले जात नाही, असे म्हणत विषारी द्रव असलेली बाटली काढून द्रव प्राशन केले. यावेळी महावितरणच्या कार्यालयात कर्मचारी उपस्थित नव्हते. दरम्यान, एकंबी तांडा येथील सरपंच शिवराज राठोड यांनी त्यांना उजनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून लातूरच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. दरम्यान, बेलकुंड येथील पोलीस चौकीचे अंमलदार एन.टी. कोडे यांनी घटनास्थळी भेट दिली असून, सदर शेतकºयाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सरपंच शिवराज राठोड यांनी सांगितले. उजनी येथील महावितरणचे शाखा अभियंता किरण क्षीरसागर म्हणाले, मंगळवारी मी कार्यालयात नव्हतो. कामानिमित्त आशिवला होतो. विषारी द्रव कोणत्या शेतकºयाने घेतले याची माहिती आपणाला नाही. शिवाय, आपल्याकडे बिलासंदर्भात कसलीही तक्रार आलेली नाही. ज्या शेतकºयांचे जास्त बिल आहे, त्यांना आपण हप्ते पाडून देतच असतो, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Suicideआत्महत्या