शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

शेतकरी ते ग्राहक थेट शेतमाल विक्री केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 4:20 AM

लातूर :- राज्य शासनाच्या उत्पादक ते थेट ग्राहक विक्री बाबतच्या विकेल ते पिकेल या संकल्पनेअंतर्गत श्री. संत शिरोमणी ...

लातूर :- राज्य शासनाच्या उत्पादक ते थेट ग्राहक विक्री बाबतच्या विकेल ते पिकेल या संकल्पनेअंतर्गत श्री. संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार या अभियानाची सुरुवात होत आहे. शेतकरी ते थेट ग्राहक विक्री केंद्र सुरु होत आहे त्याचा प्रारंभ २६ जानेवारी रोजी पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.

उत्पादक शेतकऱ्यांची ताजी भाजी फळे फुले अन्नधान्य इत्यादी वाजवी दरात विक्री होण्याच्या दृष्टीने लातूर, उदगीर,अहमदपूर, औसा व निलंगा या शहरात शेतकरी /रयत बाजार अभियानाचा शेतकरी गट या व्यवस्थेव्दारे थेट ग्राहकापर्यंत जोडण्यासाठी तसेच उत्पादक शेतकऱ्यांना रोडच्या कडेला विक्री न करता शासनाच्या मदतीने तात्पुरत्या स्वरूपात जागा उपलब्ध करून दिली जात आहे. या अभियानाअंतर्गत लातूर येथे रयत बाजाराचे उद्घाटन विवेकानंद चौक, नांदेड रोड, पाण्याच्या टाकी जवळ महानगरपालिकेच्या खुल्या जागेत २६ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते होणार आहे. तरी इच्छुक फळे व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांच्या उत्पादित शेतमाल थेट ग्राहकांना विक्री व्यवस्थापनाचे नियोजन करून देण्यात येणार आहे. तरी इच्छुक शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांनी आपला शेतमाल विक्रीसाठी घेऊन यावे. तसेच या परिसरातील नागरिकांना विनंती करण्यात येते की, सदर विक्री केंद्रास भेट देऊन ताजा व स्वस्त भाजीपाला फळे-फुले, अन्नधान्य व इत्यादी वाजवी दरात खरेदी करण्यासाठी जास्तीत जास्त सहभाग नोंदविण्याचे आवाहन प्रकल्प संचालक आत्मा डी. एस. गावसाने यांनी केले आहे. सहभाग नोंदविण्यासाठी तसेच लातूर येथे विक्री व्यवस्थापनेसाठी प्रकल्प संचालक आत्मा कार्यालयात विशाल जगताप मोबाईल नंबर ९०२८४७५०१७ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.