शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवकांच्या उदासीनतेमुळे ग्राम कृषी विकास समित्या रखडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:09 IST

चापोली : ग्रामीण भागातील शेतीच्या सर्वांगीण विकासासाठी गावातील नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करून विविध योजना व प्रकल्प हाती घेण्याच्या कामास ...

चापोली : ग्रामीण भागातील शेतीच्या सर्वांगीण विकासासाठी गावातील नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करून विविध योजना व प्रकल्प हाती घेण्याच्या कामास प्राधान्यक्रम निश्चित करण्यासाठी ग्रामपंचायतीत ग्राम कृषी विकास समितीची स्थापन करणे अनिवार्य आहे. मात्र, चाकूर तालुक्यातील ग्रामपंचायत क्षेत्रात ग्रामसेवकांच्या उदासीनतेमुळे या समित्या स्थापन झाल्या नाहीत. परिणामी, शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेला खीळ बसली आहे.

शासनाच्या कृषीविषयक सर्व योजना ग्रामपंचायत स्तरावर प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रचार व प्रसार आवश्यक आहे. विविध योजनांचा नियमित आढावा घेऊन त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. स्थानिक स्तरावरील हवामान, पाऊस, पाण्याची उपलब्धता, जमिनीचा पोत आदी बाबी लक्षात घेऊन ग्रामपंचायत क्षेत्रात विविध प्रकारच्या पीक लागवडीसंबंधी नियोजन करणे तसेच शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे महत्त्वाचे आहे. समितीच्या कार्यक्षेत्रातील जलसंधारणाच्या मर्यादा लक्षात घेऊन कमी पर्जन्यमान असलेल्या ठिकाणी अधिक उत्पन्न कसे घेता येईल, याबाबत कार्य करण्याचा या समितीचा मुख्य उद्देश आहे.

तसेच समितीमार्फत कृषी व इतर कृषी निविष्ठा, एकात्मिक कीड, एकात्मिक पोषण यांचा प्रचार, नियमित शेती, फळबाग लागवडीचा आढावा घेणे, शेतीपूरक योजनांबद्दल मार्गदर्शन महत्त्वाचे आहे. शासनाकडून अशा प्रकारची समिती स्थापन करून शेतकऱ्यांचे हित जोपासण्याचा प्रयत्न आहे. मात्र, ग्रामसेवकांच्या उदासीनतेमुळे चाकूर तालुक्यातील एकूण ७१ ग्रामपंचायतींपैकी एकाही ग्रामपंचायतीने आपल्या गावात ग्राम कृषी विकास समित्या स्थापनच झाल्या नाहीत.

समितीचे सरपंच अध्यक्ष...

सदरील समितीचे पदसिद्ध अध्यक्ष हे सरपंच असून ग्रामसेवक सदस्य सचिव आहेत. उपसरपंच सदस्य असून प्रगतशील शेतकरी, विविध कार्यकारी संस्थेचे अध्यक्ष, शेतकरी उत्पादन कंपनी / शेतकरी गटाचे प्रतिनिधी, महिला बचत गट प्रतिनिधी, कृषीपूरक व्यावसायिक शेतकरी, तलाठी, कृषी सहायक हे या समितीचे सहसचिव आहेत. या समितीची सभा प्रत्येक महिन्यातून एकदा घेणे बंधनकारक आहे.

कोरोनामुळे अडचणी...

चाकूर तालुक्यातील कुठल्याही गावांत या समिती स्थापना झाली नाही. समित्या स्थापन करण्यासंबंधी गटविकास अधिका-यांसोबत चर्चा झाली. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे समित्या स्थापन करण्यासाठी विलंब झाला आहे. लवकरच समित्या गठीत करण्यात येतील, असे तालुका कृषी अधिकारी भुजंग पवार म्हणाले.

ग्रामसेवकांना आदेश...

सर्व ग्रामसेवकांना समिती स्थापन करण्याबाबत आदेश दिले आहेत. कोविडमुळे ग्रामसभा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे समिती गठण करण्यासाठी अडचणी येत आहेत. ऑनलाइन ग्रामसभा घेण्याबाबत आदेश आले असून लवकरच समित्या गठीत होतील, असे गटविकास अधिकारी वैजनाथ लोखंडे यांनी सांगितले.

योजनांचा लाभ मिळेना...

समिती गठीत नसल्याने शेतकऱ्यांना शासन योजनांची माहिती मिळत नाही. लवकरात लवकर समिती गठण करण्यात यावी, अशी मागणी येथील शेतकरी ज्ञानेश्वर वाघमारे यांनी केली.