शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचा काँग्रेस-एमआयएमसोबत घरोबा! CM फडणवीसांचा पारा चढला, म्हणाले, "हे चालणार नाही, १०० टक्के..."
2
पुतीन यांनी शब्द पाळला! व्हेनेझुएलाच्या समुद्रात अण्वस्त्रधारी युद्धनौका, पाणबुडी तैनात; अमेरिकेच्या दारात रशिया-अमेरिका आमनेसामने?
3
नौदल एक-दोन नव्हे तर १९ युद्धनौका सामील करणार; चीनच्या आव्हानाला भारताचे उत्तर
4
SBI च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; आधार अपडेट केलं नाही तर ब्लॉक होणार YONO App?
5
अमेरिका व्हेनेझुएलातून ५ कोटी बॅरल कच्चे तेल खेचून घेणार; शुक्रवारी बैठका...; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
6
बंगळुरूच्या कन्स्ट्रक्शन साईटवर महिलेचा फोटो; सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं प्रकरण काय?
7
नवीन वर्षात कोणती बँक देतेय स्वस्त दरात कार लोन: ७.४०% व्याजासह १० लाखांच्या कर्जावर किती असेल EMI?
8
"बायकोने बॉयफ्रेंडशी लग्न केलं, मुलंही झालं, दागिने-पैसे घेऊन फरार..."; न्यायासाठी नवऱ्याचं उपोषण
9
भारतात रस्त्याच्या डाव्या बाजूनेच गाडी का चालवली जाते? रंजक इतिहास, अन्य कोणते देश असेच नियम पाळतात...
10
ट्रम्प यांच्यासाठी नोबेलचा त्याग, पण बदल्यात काय मिळालं? व्हेनेझुएलाच्या 'त्या' महिला नेत्याला मोठा झटका!
11
शुभमंगल सावधान! अर्जुन तेंडुलकरच्या लग्नाची तारीख ठरली; सानिया चंडोकशी बांधणार लगीनगाठ
12
"पंतप्रधान मोदी माझ्यावर नाराज..."; ट्रम्प यांना चुकीची जाणीव! भारतासोबतच्या संबंधांवर काय म्हणाले?
13
विमा एजंटच्या अधिक कमिशनला चाप लावण्याची तयारी, कंपन्यांनी एका वर्षात वाटले ६०,८०० कोटी रुपये
14
गॅस चेंबर अन् भीषण स्फोट! DMRC इंजिनिअरचं कुटुंब झोपेतच संपलं; काळजाचा थरकाप उडवणारी घटना
15
Numerology: तुमचा जोडीदार तुमच्या आयुष्यात कोणत्या 'हेतूने' आला? याचे गुपित जन्मतारखेवरुन कळणार!
16
अवघ्या ५ हजार रुपयांत उभं केलं १३ हजार कोटींचं साम्राज्य! देशातील प्रत्येक घरात होतो वापर
17
सत्तेसाठी भाजपची थेट ओवेसींच्या AIMIM शी हातमिळवणी; BJP च्या राजकारणाचा नवा 'अकोट पॅटर्न'
18
बांगलादेशला आयसीसीचा जोर का झटका...! भारतात खेळावेच लागेल, अन्यथा गुण कापणार; बीसीबीची मागणी फेटाळली
19
६० वर्षांनंतर मोठा खुलासा; १३ व्या वर्षी 'त्या' एका पुस्तकाने कसं बदललं शी जिनपिंग यांचं जग?
20
शेअर बाजारात पुन्हा घसरण, Sensex १९७ अंकांची, तर निफ्टीमध्ये ५९ अंकांची घसरण; हे स्टॉक्स आपटले
Daily Top 2Weekly Top 5

'पीकविमा योजना कुचकामी, शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडले'; रोहित पवारांचा सरकारवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 18:00 IST

'५ निकषांपैकी ४ रद्द'; पीक कापणी प्रयोग हा एकमेव निकष ठेवून पीकविमा निधी वाचवण्याचा प्रयत्न!

उदगीर / जळकोट (जि. लातूर) : राज्य सरकारने पीकविम्याचा निधी वाचविण्याच्या प्रयत्नात राज्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. यापूर्वीच्या पीकविमा योजनेतील पाच निकषांपैकी चार निकष रद्द करून केवळ पीक कापणी प्रयोग हा एकमेव निकष ठेवण्यात आला. त्यामुळे मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीकविमा योजनेचा लाभ होणार नसल्याचे समोर आले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी संकटात असताना पीकविमा योजना कुचकामी ठरल्याची टीका राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी गुरुवारी केली.

अहमदपूर, जळकोट व उदगीर तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करून त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी माजी आ. सुधाकर भालेराव, विनायकराव पाटील, शिवाजीराव मुळे, संजय शेटे, चंदन पाटील नागराळकर, अजीम दायमी, ज्ञानेश्वर पाटील आदी उपस्थित होते.

आमदार रोहित पवार म्हणाले, ऑगस्टमधील अतिवृष्टीच्या नुकसानीचे पंचनामे झाले असले तरी प्रत्यक्षात मदत अत्यल्प मिळत आहे. त्यामुळे आता सरकारने सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे सरसकट शेतकऱ्यांना ५० हजारांची मदत द्यावी. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी केली.

विद्यमान मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरे सरकारच्या काळात विरोधी पक्षनेता असताना माध्यमांसमोर व लेखीपत्राद्वारे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. आता ओला दुष्काळ ही संकल्पनाच नसल्याचे सांगून हात झटकत आहेत. सरकारने पीकविमा योजनेतील निकषातील बदल केल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. निकषात बदल केले नसते तर सोयाबीन उत्पादकांना एकरी ५१ हजार रुपयांचा मोबदला पीकविमा कंपनीकडून मिळाला असता. १२ ऑक्टोबरपर्यंत राज्यात सर्वत्र पाहणी करून शासनाकडे शेतकऱ्यांना मदतीची मागणी करण्यात येणार आहे. अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.

दरम्यान, आमदार पवार यांनी जळकोट तालुक्यातील बेळसांगवी, तिरुका, बोरगाव, घोणसी या पूरग्रस्त गावांना भेटी देऊन परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी ॲड. पद्माकर उगिले, नेमिचंद पाटील, सचिन केंद्रे, सोमेश्वर कदम, राजेश्वर जाधव, माजी सभापती धोंडिराम पाटील आदी उपस्थित होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Crop insurance ineffective, farmers abandoned: Rohit Pawar slams government.

Web Summary : Rohit Pawar criticizes the government's crop insurance scheme changes, leaving farmers vulnerable after heavy rains. He demands ₹50,000 assistance per farmer, a declaration of a wet drought, and threatens protests if demands are unmet.
टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारFarmerशेतकरीfloodपूरRainपाऊस