शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

'पीकविमा योजना कुचकामी, शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडले'; रोहित पवारांचा सरकारवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 18:00 IST

'५ निकषांपैकी ४ रद्द'; पीक कापणी प्रयोग हा एकमेव निकष ठेवून पीकविमा निधी वाचवण्याचा प्रयत्न!

उदगीर / जळकोट (जि. लातूर) : राज्य सरकारने पीकविम्याचा निधी वाचविण्याच्या प्रयत्नात राज्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. यापूर्वीच्या पीकविमा योजनेतील पाच निकषांपैकी चार निकष रद्द करून केवळ पीक कापणी प्रयोग हा एकमेव निकष ठेवण्यात आला. त्यामुळे मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीकविमा योजनेचा लाभ होणार नसल्याचे समोर आले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी संकटात असताना पीकविमा योजना कुचकामी ठरल्याची टीका राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी गुरुवारी केली.

अहमदपूर, जळकोट व उदगीर तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करून त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी माजी आ. सुधाकर भालेराव, विनायकराव पाटील, शिवाजीराव मुळे, संजय शेटे, चंदन पाटील नागराळकर, अजीम दायमी, ज्ञानेश्वर पाटील आदी उपस्थित होते.

आमदार रोहित पवार म्हणाले, ऑगस्टमधील अतिवृष्टीच्या नुकसानीचे पंचनामे झाले असले तरी प्रत्यक्षात मदत अत्यल्प मिळत आहे. त्यामुळे आता सरकारने सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे सरसकट शेतकऱ्यांना ५० हजारांची मदत द्यावी. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी केली.

विद्यमान मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरे सरकारच्या काळात विरोधी पक्षनेता असताना माध्यमांसमोर व लेखीपत्राद्वारे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. आता ओला दुष्काळ ही संकल्पनाच नसल्याचे सांगून हात झटकत आहेत. सरकारने पीकविमा योजनेतील निकषातील बदल केल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. निकषात बदल केले नसते तर सोयाबीन उत्पादकांना एकरी ५१ हजार रुपयांचा मोबदला पीकविमा कंपनीकडून मिळाला असता. १२ ऑक्टोबरपर्यंत राज्यात सर्वत्र पाहणी करून शासनाकडे शेतकऱ्यांना मदतीची मागणी करण्यात येणार आहे. अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.

दरम्यान, आमदार पवार यांनी जळकोट तालुक्यातील बेळसांगवी, तिरुका, बोरगाव, घोणसी या पूरग्रस्त गावांना भेटी देऊन परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी ॲड. पद्माकर उगिले, नेमिचंद पाटील, सचिन केंद्रे, सोमेश्वर कदम, राजेश्वर जाधव, माजी सभापती धोंडिराम पाटील आदी उपस्थित होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Crop insurance ineffective, farmers abandoned: Rohit Pawar slams government.

Web Summary : Rohit Pawar criticizes the government's crop insurance scheme changes, leaving farmers vulnerable after heavy rains. He demands ₹50,000 assistance per farmer, a declaration of a wet drought, and threatens protests if demands are unmet.
टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारFarmerशेतकरीfloodपूरRainपाऊस