शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

'पीकविमा योजना कुचकामी, शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडले'; रोहित पवारांचा सरकारवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 18:00 IST

'५ निकषांपैकी ४ रद्द'; पीक कापणी प्रयोग हा एकमेव निकष ठेवून पीकविमा निधी वाचवण्याचा प्रयत्न!

उदगीर / जळकोट (जि. लातूर) : राज्य सरकारने पीकविम्याचा निधी वाचविण्याच्या प्रयत्नात राज्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. यापूर्वीच्या पीकविमा योजनेतील पाच निकषांपैकी चार निकष रद्द करून केवळ पीक कापणी प्रयोग हा एकमेव निकष ठेवण्यात आला. त्यामुळे मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीकविमा योजनेचा लाभ होणार नसल्याचे समोर आले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी संकटात असताना पीकविमा योजना कुचकामी ठरल्याची टीका राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी गुरुवारी केली.

अहमदपूर, जळकोट व उदगीर तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करून त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी माजी आ. सुधाकर भालेराव, विनायकराव पाटील, शिवाजीराव मुळे, संजय शेटे, चंदन पाटील नागराळकर, अजीम दायमी, ज्ञानेश्वर पाटील आदी उपस्थित होते.

आमदार रोहित पवार म्हणाले, ऑगस्टमधील अतिवृष्टीच्या नुकसानीचे पंचनामे झाले असले तरी प्रत्यक्षात मदत अत्यल्प मिळत आहे. त्यामुळे आता सरकारने सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे सरसकट शेतकऱ्यांना ५० हजारांची मदत द्यावी. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी केली.

विद्यमान मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरे सरकारच्या काळात विरोधी पक्षनेता असताना माध्यमांसमोर व लेखीपत्राद्वारे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. आता ओला दुष्काळ ही संकल्पनाच नसल्याचे सांगून हात झटकत आहेत. सरकारने पीकविमा योजनेतील निकषातील बदल केल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. निकषात बदल केले नसते तर सोयाबीन उत्पादकांना एकरी ५१ हजार रुपयांचा मोबदला पीकविमा कंपनीकडून मिळाला असता. १२ ऑक्टोबरपर्यंत राज्यात सर्वत्र पाहणी करून शासनाकडे शेतकऱ्यांना मदतीची मागणी करण्यात येणार आहे. अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.

दरम्यान, आमदार पवार यांनी जळकोट तालुक्यातील बेळसांगवी, तिरुका, बोरगाव, घोणसी या पूरग्रस्त गावांना भेटी देऊन परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी ॲड. पद्माकर उगिले, नेमिचंद पाटील, सचिन केंद्रे, सोमेश्वर कदम, राजेश्वर जाधव, माजी सभापती धोंडिराम पाटील आदी उपस्थित होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Crop insurance ineffective, farmers abandoned: Rohit Pawar slams government.

Web Summary : Rohit Pawar criticizes the government's crop insurance scheme changes, leaving farmers vulnerable after heavy rains. He demands ₹50,000 assistance per farmer, a declaration of a wet drought, and threatens protests if demands are unmet.
टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारFarmerशेतकरीfloodपूरRainपाऊस