शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
4
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
5
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

बँकांच्या उदासीनतेमुळे महामंडळाचे कर्ज प्रस्ताव रखडले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:18 IST

लातूर : मराठा समाजातील होतकरू तरुणांना व्यवसायासाठी कर्जपुरवठा करता यावा, यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने विविध कर्ज ...

लातूर : मराठा समाजातील होतकरू तरुणांना व्यवसायासाठी कर्जपुरवठा करता यावा, यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने विविध कर्ज योजना राबविल्या जातात. जिल्ह्यात आतापर्यंत ३ हजार ५१ जणांनी कर्जासाठी प्रस्ताव दाखल केले आहेत. त्यापैकी ६१४ जणांना कर्ज मिळाले असून, राष्ट्रीयीकृत बँकांच्या उदासीनतेमुळे १ हजार लाभार्थी कर्जापासून वंचित आहेत. त्यामुळे अर्जदारांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने मराठा समाजातील तरुणांना व्यवसायासाठी कर्जपुरवठा करता यावा, यासाठी व्याज परतावा योजना राबविली जाते. त्याअंतर्गत महामंडळाकडे ३ हजार ५१ तरुणांनी प्रस्ताव दाखल केले आहेत. यापैकी १ हजार ६१४ जणांना महामंडळाच्या वतीने पूर्वसंमती देण्यात आली आहे, तर ६१४ जणांना ४३ कोटी ५९ लाख रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. यापैकी ४३९ लाभार्थ्यांना २ कोटी ४ लाख रुपयांचा व्याज परतावाही देण्यात आला आहे. दोन खासगी फायनान्स कंपन्यांनी महामंडळासोबत कर्जपुरवठा करण्यासाठी करार केला आहे. जिल्ह्यात जवळपास १ हजार प्रस्ताव बँकांकडे प्रलंबित आहेत. सदरील प्रस्ताव दाखल करणारे तरुण बँकाचे उंबरठे झिजवत आहेत. मात्र, अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने कर्ज मिळत नसल्याचे चित्र आहे. व्याज परतावा योजनेंतर्गत वितरित करण्यात आलेल्या कर्जाचे व्याज महामंडळाच्या वतीने भरले जाते. यासाठी बँकांना महामंडळाच्या वतीने हमी दिली जात आहे. मात्र, तरीही बँकांचे याकडे दुर्लक्ष आहे. परिणामी, व्यवसाय उभारण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांना कर्जापासून वंचित राहावे लागत असल्याचे चित्र आहे.

४३९ जणांना मिळाला व्याज परतावा...

महामंडळांतर्गत आतापर्यंत केवळ ६१४ जणांना कर्ज मिळाले आहे. यापैकी ४३९ लाभार्थ्यांना २ कोटी ४ लाख रुपयांचा व्याज परतावा मिळाला आहे. महामंडळाकडे लातूर जिल्ह्यातील ३ हजार ५१ जणांचे प्रस्ताव दाखल आहेत. १ हजार ६१४ जणांना महामंडळाच्या वतीने पूर्वसंमती देण्यात आली आहे. कर्ज प्रस्तावांना बँकांकडून कर्ज पुरवठा होत नसल्याने अर्जदारांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.

प्रलंबित प्रस्तावासाठी बँकांकडे पाठपुरावा...

महामंडळाने पूर्वसंमती दिलेल्या कर्ज प्रस्तावांना बँकांनी कर्जपुरवठा करणे आवश्यक आहे. कागदपत्रांची पूर्तता असल्यानेच महामंडळाने परवानगी दिलेली असते. त्यामुळे बँकांकडे प्रलंबित असलेल्या कर्ज प्रस्तावासाठी जिल्हा कार्यालयाच्या वतीने वेळोवेळी पाठपुरावा केला जात असल्याचे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक प्रशांत पाटील यांनी सांगितले.