शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

तक्रारीच्या नावाखाली पीकविमा कंपनीकडून नुकसान भरपाईस ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:18 IST

लातूर : गत खरीप हंगामात अतिवृष्टी झाल्याने जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतक-यांनी पीकविमा कंपनीकडे ऑनलाईन, लेखी तक्रारी केल्या होत्या. मात्र, बहुतांश ...

लातूर : गत खरीप हंगामात अतिवृष्टी झाल्याने जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतक-यांनी पीकविमा कंपनीकडे ऑनलाईन, लेखी तक्रारी केल्या होत्या. मात्र, बहुतांश शेतक-यांच्या तक्रारींची पीकविमा कंपनीने दखलही घेतली नसल्याचे दिसून येत आहे, तर जवळपास ८ हजार शेतक-यांचे अर्ज अपात्र ठरविले. केवळ १ लाख ८ हजार शेतक-यांना ८८ कोटी २६ लाख मंजूर करुन त्याचे वाटप केले जात आहे.

गत खरीप हंगामात वेळेवर आणि पुरेसा पाऊस झाल्याने चांगले शेती उत्पादन मिळेल, अशी आशा शेतक-यांना होती. मात्र, मुग, उडीद तसेच सोयाबीन काढणीच्या कालावधीत अतिवृष्टी झाल्याने पिकांचे नुकसान झाले. तत्पूर्वी प्रधानमंत्री पीकविमा योजनेत जिल्ह्यातील १० लाख ४४ हजार शेतक-यांनी अर्ज करुन ४९ कोटी ७४ लाखांचा विमा हप्ता भरला होता. दरम्यान, नुकसानभरपाई मिळण्यासाठी ऑनलाईन अथवा ऑफलाईन तक्रारी दाखल करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते. त्यामुळे पीकविमा भरलेल्या आणि नुकसानग्रस्त शेतक-यांनी आपल्या सोयीनुसार ग्रामसेवक, तलाठी तसेच पीकविमा कंपनीकडे तक्रारी दाखल केल्या. त्यामुळे शेतक-यांचे डोळे नुकसानभरपाईच्या मदतीकडे लागले. परंतु, वास्तवात पीकविमा कंपनीने १ लाख १६ हजार शेतक-यांचे अर्ज आल्याचे सांगून त्यातील ८ हजार शेतक-यांचे अर्ज अपात्र ठरविले.

स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणी पश्चात नुकसान अनुषंगाने जिल्ह्यातील केवळ १ लाख ८ हजार शेतक-यांना ८८ कोटी २६ लाख रुपये मंजूर करण्यात आले. त्यापोटी आतापर्यंत ७६ कोटी रुपयांचे वाटप झाले आहे. वास्तविक पहाता, जिल्ह्यातील १० लाख ४४ हजारपैकी केवळ १ लाख ८ हजार शेतक-यांनाच मदत मिळत असल्याने उर्वरित तक्रारी अर्ज गायब झाले कुठे असा सवाल शेतक-यांतून व्यक्त होत आहे.

एकाला १२ हजार तर दुस-याला ३ हजार...

नुकसानीच्या तक्रारीनुसार पंचनामा करण्यात आला. मात्र, एकाच गटातील शेतक-याला नुकसानभरपाई पोटी १२ हजार तर दुस-या शेतक-याला ३ हजार रुपये मदत पीकविमा कंपनीकडून देण्यात आली आहे. वास्तविक पहाता, किमान एकाच गटात समान क्षेत्रावर पेरणी केलेल्या शेतक-यांना समान नुकसान भरपाई मिळायला हवी की नाही, असा सवाल शेतक-यांतून व्यक्त होत आहे.

५० ते ६० तक्रारी दाखल...

स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणी पश्चात नुकसाअंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ८ हजार शेतक-यांना ८८ कोटी २६ लाख मंजूर झाले. आतापर्यंत ७६ कोटींचे वाटप करण्यात आले आहे. असमान पैश्याबाबत आतापर्यंत ५० ते ६० शेतक-यांच्या तक्रारी आल्या आहेत. त्यांना समजावून सांगण्यात येत आहे, असे पीकविमा कंपनीचे जिल्हा व्यवस्थापक संतोष भोसले यांनी सांगितले.

अद्यापही मदत मिळाली नाही...

तक्रारीनुसार पंचनामा झाला. दरम्यान, आम्ही कृषी विभागासह प्रशासनाकडे तक्रार केली. परंतु, अद्यापही नुकसानभरपाईपोटी मदत मिळाली नाही. त्यामुळे आता तक्रार करावी कुणाकडे असा प्रश्न असल्याचे कव्हा येथील शेतकरी संतोष सुलगुडले यांनी सांगितले.