शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

नदीकाठच्या २० गावांत बांबू लागवडीस सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:14 IST

शिरूर अनंतपाळ : बांबू लागवड ही शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असून कमीत-कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन देणारे हे पीक असल्याने शिरूर ...

शिरूर अनंतपाळ : बांबू लागवड ही शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असून कमीत-कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन देणारे हे पीक असल्याने शिरूर अनंतपाळ तालुक्यातील नदीकाठच्या २० गावांत बांबू लागवडीस चांगला प्रतिसाद मिळत आहे. पोकरा योजनेअंतर्गत तालुक्यातील १२० शेतकऱ्यांनी बांबू लागवडीत सहभाग नोंदविला आहे. राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांच्या उपस्थितीत बुधवारी शिरूर अनंतपाळचे शेतकरी प्रभाकर लव्हांडे यांच्या शेतात बांबू लागवडीस प्रारंभ करण्यात आला.

शिरूर अनंतपाळ तालुक्यास घरणी नदीचा १२ कि.मी. आणि मांजरा नदीचा १३ कि.मी. असा एकूण २५ कि.मी.चा किनारा आहे. नदीकाठच्या २० गावांतील शेतकऱ्यांच्या शेतात बांबू लागवड करण्याचे नियोजन तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले. बांबू लागवडीचा प्रारंभ शिरूर अनंतपाळ येथील प्रायोगिक तत्त्वावर शेती करणारे शेतकरी प्रभाकर लव्हांडे यांच्या एक एकर शेतीत राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांच्या उपस्थितीत बुधवारी झाला. यावेळी तहसीलदार अतुल जटाळे, पोलीस उपनिरीक्षक मलय्या स्वामी, जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती गोविंदराव चिलकुरे, तालुका कृषी अधिकारी संजय नाबदे, नागनाथ चलमले, सुधाकर लव्हांडे, मधुकर लव्हांडे, आपचे आनंदा कामगुंडा, ॲड. अनंत लव्हांडे आदींची उपस्थिती होती.

तालुक्यातील ४८ हेक्टरची निवड...

शिरूर अनंतपाळ तालुक्याला २५ कि.मी.चा नदीकिनारा लाभला आहे. नदीकाठच्या २० गावांतील नदी किनाऱ्यावर उच्च प्रतीच्या दर्जेदार बांबूची लागवड करण्यासाठी तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने कृती कार्यक्रम आखण्यात आला असून, १२० एकर म्हणजे ४८ हेक्टरवर बांबू लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

एकरी लाखाच्या उत्पादनाची हमी...

पारंपरिक पद्धतीने शेती केल्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादनाची हमी नाही; परंतु मानवेल आणि बल्कवा या उच्च प्रतिच्या बांबूची लागवड केली, तर एकरी एक लाखापर्यंत उत्पादनाची हमी आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बांबू लागवड केली पाहिजे, असे आवाहन राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी केले.

बांबूपासून रोटी, कपडा और मकान प्राप्त...

मानवाच्या गरजा असंख्य असल्या तरी तीन मूलभूत गरजा आहेत ज्या बांबू लागवडीतून पूर्ण होतात, तसेच ग्लोबल वॉर्मिंगमुळे पर्यावरण संवर्धन आणि संतुलनाचा समतोल बिघडत आहे. म्हणून प्रत्येकाने पोकरा योजनेंतर्गत किमान एक एकर तरी बांबू लागवड करावी, असेही पाशा पटेल म्हणाले.