शहरं
Join us  
Trending Stories
1
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
4
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
5
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
7
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
8
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
9
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
10
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
11
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
12
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
13
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
14
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
15
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
16
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
17
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
18
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
20
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
Daily Top 2Weekly Top 5

वरुणराजाने उघडीप दिल्याने बळीराजा धास्तावला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रेणापूर : मृगाच्या प्रारंभी तालुक्यात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. त्यामुळे खरिपाच्या आतापर्यंत एकूण ५७.९५ टक्के ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रेणापूर : मृगाच्या प्रारंभी तालुक्यात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. त्यामुळे खरिपाच्या आतापर्यंत एकूण ५७.९५ टक्के पेरण्या झाल्या आहेत. मात्र, आठवडाभरापासून पावसाने ताण दिल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या थांबवल्या. पिके उगवली असून, पावसाची गरज आहे. त्यामुळे बळीराजा वरुणराजाच्या प्रतीक्षेत आहे.

रेणापूर तालुक्यात वरुणराजा मृगाच्या प्रारंभी बरसला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या. पुढील काळातही पाऊस पडेल, या आशेवर तालुक्यातील शेतकऱ्यांनी चाढ्यावर मूठ धरण्यास सुरुवात केली. दरम्यान, हवामान खात्यानेही मान्सून सक्रिय झाला असून, तो सुरु होईल, असा अंदाज वर्तविला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप पेरणीला सुरुवात केली.

तालुक्यातील पाच महसूल मंडलांत खरिपासाठी एकूण ४८ हजार ६६० हेक्टर क्षेत्र पेरणीयोग्य आहे. आतापर्यंत तालुक्यात २८ हजार २०० हेक्‍टरवर म्हणजेच ५७.९५ टक्के पेरण्या झाल्या आहेत. यात सर्वात कमी पेरणी रेणापूर आणि पोहरेगाव महसूल मंडलांत झाली आहे. सर्वाधिक पेरा कारेपूर, पळशी व पानगाव यात तीन मंडलांमध्ये झाला आहे.

खरिपाच्या पेरण्या झाल्या असल्या तरी आठ दिवसांपासून पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे उगवलेल्या पिकांना आता पाण्याची गरज आहे. तसेच आणखीन ४२ टक्के क्षेत्रावर पावसाअभावी पेरण्या राहिल्या आहेत. सध्या पेरणी केलेले आणि पेरणी न केलेले शेतकरी पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. लवकर पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येण्याची भीती आहे.

सोयाबीनचा सर्वाधिक पेरा...

रेणापूर तालुक्यातील पाच महसूल मंडलांत ५७.९५ टक्के पेरण्या झाल्या आहेत. त्यात रेणापूर मंडलात ३ हजार ९२९, पानगाव ६ हजार २६७, पळशी ६ हजार ४५१, कारेपूर मंडलात ७ हजार २९५ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. सर्वाधिक पेरा सोयाबीनचा झाला असून, तो २५ हजार ६६३ हेक्टरवर झाला आहे. त्यापाठोपाठ तुरीचा १ हजार ९९८ हेक्टर, मूग २०९, उडीद ९७, ज्वारी १२५, मका ७० असा पेरा झाला आहे.

आतापर्यंत १९४ मिमी पाऊस...

रेणापूर तालुक्यात आतापर्यंत १९४.१ मिमी पाऊस झाला आहे. मृगाच्या प्रारंभी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. आता पावसाची गरज आहे. दरम्यान, शनिवारी रात्री काही प्रमाणात पाऊस झाला आहे. शेतकऱ्यांनी पेरणीयोग्य पाऊस झाल्याशिवाय पेरणी करु नये, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी हरिराम नागरगोजे यांनी केले.

पावसाची नितांत गरज...

मृगाच्या सुरुवातीला पाऊस झाल्याने यापुढेही पाऊस होईल, या आशेवर पेरणी केली. सध्या पिके उगवली असून, पाण्याची गरज आहे. परंतु, आठवडाभरापासून पाऊस नसल्याने चिंता वाढली आहे, असे शेतकरी भागवत माने यांनी सांगितले.