शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक घटली, दरात अल्पशी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:14 IST

उदगीर : तालुक्यात जूनच्या सुरुवातीला झालेल्या मोठ्या पावसामुळे भाजीपाल्याचे नुकसान झाले. त्यामुळे बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. सध्या ...

उदगीर : तालुक्यात जूनच्या सुरुवातीला झालेल्या मोठ्या पावसामुळे भाजीपाल्याचे नुकसान झाले. त्यामुळे बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. सध्या होत असलेली आवक ही परजिल्ह्यातील आहे. त्यामुळे वाहतूक खर्च वाढल्याने भाजीपाल्याचे दरही वाढले आहेत. लॉकडाऊनचे निर्बंध शिथील झाल्यानंतर जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. दररोजच्या वापरातील तूर व चणाडाळीची मागणी वाढत आहे. ठोक बाजारात खाद्यतेलाच्या किमती थोड्या कमी झाल्या असल्या तरी किरकोळ बाजारात फारसा फरक पडलेला नाही.

तालुक्यातील बहुतांश भागात शेतकऱ्यांचा भाजीपाला उत्पादनाकडे कल वाढला आहे. मागील वर्षी तालुक्यात समाधानकारक पर्जन्यमान झाले होते. त्यामुळे बोअर, विहिरीला बऱ्यापैकी पाणी होते. त्याचा फायदा घेत शेतकऱ्यांनी भाजीपाल्याचे उन्हाळ्यातही उत्पादन घेतले होते. कुमठा, लोहारा, बामणी, देवर्जन, माळेवाडीसह अन्य गावांतील शेतकरी भाजीपाल्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतात.

दरम्यान, जून महिन्याच्या सुरुवातीलाच तालुक्यातील काही भागात जोरदार पाऊस पडल्यामुळे भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पालेभाज्यांची पाने खराब झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी ती बांधावरच टाकून दिली आहेत. त्यामुळे शहरात भाजीपाला लातूर व सोलापूर जिल्ह्यांतून येत आहे. इंधन दरवाढीमुळे वाहतुकीचा खर्चही जास्त येत असल्याने त्याचा परिणाम भाजीपाल्याच्या दरावर झाला आहे.

वांगे ८० रुपये प्रति किलो...

पालक, शेपू १० रुपये जुडी, मेथी, कोथिंबीर २५ रुपये जुडी तसेच टोमॅटो ३० रुपये, वांगी ८० रुपये, हिरवी मिरची ६० रुपये किलो, दोडके, कारले, शिमला मिरची, भेंडी प्रत्येकी ८० रुपये प्रति किलो दराने ग्राहकांना खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे.

लॉकडाऊनचे निर्बंध शिथील झाल्यानंतर शहर व ग्रामीण भागातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. हॉटेल, खानावळी, धाबे सुरु झाले आहेत. त्यामुळे तूरडाळ व चणाडाळीला मागणी वाढली आहे. डाळीसोबतच खाद्यतेलाच्या दरातही मोठी वाढ झाली. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसत आहे. सध्या खाद्यतेलाच्या ठोक दरात अल्पशी घट झाली असली, तरी किरकोळ बाजारात त्याचा परिणाम दिसून येत नाही.