शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
2
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
4
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
5
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
6
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
7
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
8
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
9
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
10
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
11
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
12
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
13
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
14
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
15
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
16
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
17
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
18
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
19
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
20
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
Daily Top 2Weekly Top 5

भूसंपादनाअभावी रखडला अहमदपूरचा वळण रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:17 IST

अहमदपूर : राष्ट्रीय महामार्ग क्रं. ३६१ वरील शिरुर ताजबंद गावाजवळील बाहेरुन जाणाऱ्या वळण रस्त्याचे काम सुरु झाले आहे. परंतु, ...

अहमदपूर : राष्ट्रीय महामार्ग क्रं. ३६१ वरील शिरुर ताजबंद गावाजवळील बाहेरुन जाणाऱ्या वळण रस्त्याचे काम सुरु झाले आहे. परंतु, सर्वाधिक वाहतूक असलेल्या अहमदपूर वळण रस्त्याचे काम भूसंपादनाअभावी रखडले आहे. त्यामुळे शहरातील वाहनधारकांची कसरत होत आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्र. ३६१ साठी भूसंपादन आणि मार्ग निर्मितीचे काम प्रगतिपथावर आहे. यात शिरुर ताजबंद गावाजवळून जाणाऱ्या वळण रस्त्याचे मातीकाम सुरु झाले आहे. येत्या काही दिवसात प्रत्यक्ष काँक्रिटच्या कामास सुरुवात होणार आहे. तसेच या वळण रस्त्यासाठी भूसंपादन करण्यात आलेल्या जमिनीचा मावेजाही मागील वर्षी वाटप करण्यात आला आहे. परंतु, अहमदपूर शहराबाहेरुन जाणाऱ्या वळण रस्त्याचे काम २०१७ पासून अद्यापही रखडले आहे.

अद्यापपर्यंत कोणत्याही शेतकऱ्यास मावेजा मिळाला नाही. याबाबत मावेजा अधिक असल्याने हे प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांच्या लवादाकडे होते. परंतु, यासंबंधीचा निकाल लागून वर्ष उलटले तरी संबंधित भूसंपादनाचे काम रखडले आहे. त्यासाठी २७ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्याचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण दिल्ली, नागपूर व नांदेड येथे पाठविण्यात आला आहे. त्यास मंजुरी मिळताच प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या नावे मावेजा जमा होणार असल्याचे उपजिल्हाधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले.

१५ दिवसात मावेजा मिळणार...

अहमदपूर शहरातून जाणाऱ्या रस्त्याच्या मावेजा संबंधीचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या दिल्ली, नागपूर आणि नांदेड येथील कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. त्यास मंजुरी मिळाली आहे. येत्या १० दिवसात संबंधित शेतकऱ्यांच्या नावावर मावेजा जमा होणार असल्याचे भूसंपादन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी जीवन देसाई यांनी सांगितले.

मावेजा त्वरित वाटप करावा...

अहमदपूर वळण रस्त्याचे काम २०१७ पासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे गेले होते. मार्चमध्ये मोबदल्याची रक्कम राज्य शासनाकडे आली. त्यानंतर काही शेतकऱ्यांना वाटप झाले. परंतु, अनेकांची रक्कम शिल्लक आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांचा मावेजा त्वरित देण्यात यावा, अशी मागणी आशिष गुणाले यांनी केली आहे.

मावेजा वाटपात भेदभाव...

मावेजा वाटपात भेदभाव झाल्याचे काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. काहींना नोटीस देऊन त्यांचा मावेजा खात्यावर जमा करण्यात आला आहे. काहींना अद्यापही नोटीस प्राप्त झाली नाही, अशी शेतकऱ्यांत चर्चा आहे.