शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

लातूरमधील जलस्रोतांमध्ये मुबलक पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2020 5:29 PM

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या वतीने रिचार्ज शाफ्टची संकल्पना राबविण्यात आली असून, जिल्ह्यात  ५५ गावांत ४३७ रिचार्ज शाफ्टमुळे  जलपुनर्भरणाचा उपक्रम यशस्वीपणे राबविला जात आहे.

संदीप शिंदे

लातूर : जिल्ह्याचा भूभाग बेसॉल्ट नावाच्या कठीण अग्निजन्य पाषाणाने व्यापलेला असून खडक, सच्छिद्र, विघटित, भेगायुक्त  या प्रकारात  सापडतो. त्यात पाणी साठविण्याची क्षमता फार कमी प्रमाणात असते. त्यामुळे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या वतीने रिचार्ज  शाफ्टची संकल्पना राबविण्यात आली असून, जिल्ह्यात ५५ गावांत ४३७ रिचार्ज शाफ्टमुळे जलपुनर्भरणाचा उपक्रम यशस्वीपणे राबविला जात आहे.

जिल्ह्यात ५५ गावांत ४३७ रिचार्ज शॉफ्ट उभारण्यात आले असून, लातूर तालुक्यातील ६ गावांत ४८, औसा तालुक्यातील ५ गावांत ४०, निलंगा तालुक्यातील ६ गावांत ४८, रेणापूर तालुक्यातील ७ गावांत ५६, अहमदपूर तालुक्यातील ५ गावांत ४०, उदगीर तालुक्यातील ७ गावांत ५६, देवणी तालुक्यातील ६ गावांत ४८, जळकोट तालुक्यातील ५ गावांत ३७, चाकूर तालुक्यातील ५ गावांत ४० तर शिरूर अनंतपाळ तालुक्यातील  तालुक्यातील ३ गावांत २४ शाफ्ट उभारण्यात आले आहेत.

रिचार्ज शाफ्ट ही उपाययोजना अत्यंत कमी खर्चाची असून, परिणामकारक आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या दूर व्हावी, यासाठी जलस्त्रोतांना पाणी उपलब्ध होण्यासाठी हा उपक्रम राबविला जातो. भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या वतीने जिल्ह्यातील दहाही तालुक्यांत ही संकल्पना राबविण्यात  आली असून, २०१६-१७ मध्ये ७७ गावांत ३२७, २०१७-१८ मध्ये ६७ गावांत २७१ कामे पूर्ण करण्यात आली आहेत.

अनेक गावांत उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणवते. जलस्त्रोत कोरडे पडतात. त्यामुळे पावसाळ्यातील पाण्याचे संवर्धन व्हावे, यासाठी रिचार्ज  शाफ्टची उभारणी केली जाते. परिणामी, रिचार्ज शाफ्टजवळील अनेक जलस्त्रोतांच्या पाणी पातळीत समाधानकारक वाढ झाली असल्याचे जिल्हा भूजल सर्वेक्षण विभागाचे वरिष्ठ भू-वैज्ञानिक डॉ. भालचंद्र संगनवार यांनी सांगितले.

टॅग्स :WaterपाणीMarathwadaमराठवाडाwater shortageपाणीकपात