शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

टंचाईचे ढग दाटले; लातूर जिल्ह्यातील प्रकल्पातील पाणी आता पिण्यासाठी आरक्षित !

By हरी मोकाशे | Updated: August 30, 2023 17:36 IST

पाऊस नसल्याने चिंता वाढली; एमआयडीसीच्या पाण्यात होणार कपात

लातूर : वरुणराजाने महिनाभरापासून दडी मारल्यामुळे चिंता वाढली आहे. जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची भीती वाढली आहे. आतापर्यंत सरासरी ३४०.६ मिमी पाऊस झाल्याने नदी- नाले कोरडेठाक आहेत. मध्यम प्रकल्पातही केवळ २०.८५ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. परिणामी, जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व मध्यम, लघु प्रकल्पातील पाणी केवळ पिण्यासाठी आरक्षित ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

जिल्ह्यात पावसाळ्यातील मृगाचे १५ दिवस कोरड गेले. आर्द्रापासून पावसाला सुरुवात झाली. जुलैच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत कधी रिमझिम तर कधी मध्यम स्वरुपाचा पाऊस होत होता. त्यावर खरीपाच्या ९८ टक्के पेरण्या झाल्या. त्यानंतर मात्र, वरुणराजाने हुलकावणीच दिली. जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातील दोन महसूल मंडळ वगळता अद्यापही एकदाही मुसळधार पाऊस झाला नाही. त्यामुळे मांजरा, तेरणा, तिरु या तीन प्रमुख नद्या वाहिल्या नाहीत.जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस झाला नसल्याने नदी- नाले वाहिले नाहीत. परिणामी, विहिरी, तलाव, लघु, मध्यम प्रकल्पात जलसाठा झाला नाही. बाष्पीभवनामुळे जलसाठ्यात मोठी घट होत आहे.

दोन प्रकल्प जोत्याखाली...पावसाळ्यातील पावणेतीन महिने उलटत आहेत. मात्र, दमदार पाऊस नाही. त्यामुळे व्हटी आणि तिरु हे दोन मध्यम प्रकल्प जोत्याखाली आहेत. तिथे उपयुक्त पाणीसाठा नाही. उर्वरित सहा प्रकल्पात २५.४६५ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. तसेच १३४ लघुप्रकल्पात ६७.३२१ दलघमी उपयुक्त पाणीसाठा असून त्याची टक्केवारी २१.४२ अशी आहे.

१९६ मिमी पावसाची तूट...

जिल्ह्यात यंदा सरासरी ३४०.६ मिमी पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी ५३८.४ मिमी पाऊस झाला होता. गतवर्षीच्या तुलनेत १९६.८ मिमी पावसाची तूट आहे.

आतापर्यंत पाऊस...तालुका - पाऊस मिमीमध्ये

लातूर - ३१२.०औसा - २६६.०

अहमदपूर - ३३६.८निलंगा - ३२०.९

उदगीर - ४७३.१चाकूर - २९०.५

रेणापूर - २६७.९देवणी - ५११.८

शिरुर अनं. - ३५९.७जळकोट - ४१४.२

एकूण - ३४०.६

६ प्रकल्पात २०.८५ टक्के उपयुक्त पाणीसाठा...प्रकल्प - टक्केवारी

तावरजा - १.५२व्हटी - जोत्याखाली

रेणापूर - २४.४८तिरु - जोत्याखाली

देवर्जन - ३९.४१साकोळ - ५३.७९

घरणी - २७.२७मसलगा - २८.६७

एकूण - २०.८५

प्रकल्पातील पाणी राखीव ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश...जिल्ह्यात ऑगस्टअखेरपर्यंत समाधानकारक पाऊस झाला नाही. तसेच मान्सूनमध्ये पावसाची प्रगतीही नसल्याने जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी जिल्ह्यातील सर्व मध्यम, लघु पाटबंधाऱ्यातील पाणी राखीव ठेवण्याचे आदेश काढले आहेत.जिल्ह्यातील मध्यम, लघु प्रकल्पातील उपयुक्त पाणी पातळीचा आढावा घेऊन संभाव्य पाणी टंचाई उद्भवू नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी प्रकल्पातील पाणी केवळ पिण्यासाठी आरक्षित केले आहे.

अनधिकृतपणे पाणी उपसा होऊ नये...प्रकल्पातील पाण्याचा अनधिकृतपणे उपसा होणार नाही, याची दक्षता पाटबंधारे विभागाने घ्यावी. पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी प्रकल्पातील पाणीसाठा सुरक्षित ठेवण्यासाठी दक्षता पथक नियुक्त करावे, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्ह्यातील आणि शहरातील औद्योगिक क्षेत्रातही येणाऱ्या काळातील पाणी टंचाई लक्षात घेऊन पाणी कपात करण्याची सूचना संबंधित विभागाला दिली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांनी सांगितले.

टॅग्स :laturलातूरRainपाऊसFarmerशेतकरी