शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

विद्यार्थी,ज्येष्ठांना ७ किमीची पायपीट;सुनेगाव शेंद्रीकरांना ७७ वर्षांपासून बसची प्रतीक्षा! 

By संदीप शिंदे | Updated: May 16, 2024 15:43 IST

ग्रामस्थांना बाहेरगावी जायचे असल्यास मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

अहमदपूर (लातूर ) : तालुक्यातील सुनेगाव शेंद्री गावात ७७ वर्षांत अजूनही बस पोहोचलेली नाही. आज ना उद्या बस गावात येईल, अशी अपेक्षा ग्रामस्थ करीत आहेत. याबाबत त्यांनी वारंवार पाठपुरावा करून प्रशासन लक्ष देत नसल्याने ग्रामस्थांना तब्बल ७ किलोमीटरचा पायी प्रवास करावा लागत आहे.

सुनेगाव शेंद्री गावची लोकसंख्या हजाराच्या जवळपास आहे. ग्रामस्थांना बाहेरगावी जायचे असल्यास मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. अहमदपूर शहरापासून केवळ ७ किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. येथील नागरिकांना अहमदपूरला एकतर पायी यावे लागते किंवा खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. गावातून जवळपास अनेक विद्यार्थी पायीच ये-जा करतात. बससेवेअभावी ग्रामस्थांना सात किलोमीटर पायी यावे लागते. एसटी महामंडळाकडून काही ठिकाणी जाण्यासाठी पक्के रस्ते नसल्याचे कारण पुढे केले जात आहे.

परंतु, बससेवा बंद असल्याने त्याचा फायदा खासगी वाहनधारकांना होत आहे. विशेष म्हणजे या वाहनात क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसविले जातात. भाडेही जास्तीचे घेतले जाते. प्रवासी जीव धोक्यात घालून खासगी वाहनाने प्रवास करतात. सुनेगाव शेंद्री बससेवा सुरू व्हावी, यासाठी ग्रामस्थांनी पाठपुरावा करूनही कुणीच दखल घेतलेली नाही. गावात केवळ प्राथमिक शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी अहमदपूरला यावे लागते. बससेवा नसल्याने विद्यार्थ्यांना दररोज पायी जावे लागते. यातून शैक्षणिक नुकसान होत आहे. सुनेगाव शेंद्री येथून अनेक विद्यार्थी दररोज सात किलोमीटर पायी चालत जातात. अहमदपूर गाठावे लागते. गावात आजवर कधीच बस आली नाही. देशाला स्वातंत्र्य मिळून ७७ वर्षे लोटली. ग्रामीण भागात भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने कोट्यवधी रुपये खर्च केले. रस्ते तयार झाले, वीज आली पण सुनेगाव शेंद्री गावात अद्याप एकदाही राज्य परिवहन महामंडळाची बस आली नसल्याने ग्रामस्थांना उत्सुकता आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बससाठी पाठपुरावा करणाऱ्या ग्रामस्थांना ना शासन प्रतिसाद देते ना लोकप्रतिनिधी प्रतिसाद देतात.

बससेवा नसल्याने विद्यार्थी, ज्येष्ठांच्या अडचणी...ग्रामीण भागात अद्यापही बससेवा सुरळीत नाही, खेड्या-पाड्याच्या रस्त्यावर प्रवासाला बसशिवाय पर्याय नाही. सुरक्षित व वेळेत ये-जा करणाऱ्या बसमुळे प्रवाशांना आधार होतो. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी बससेवा नसल्याने अडचणी येत आहेत. याचाच फायदा अवैध प्रवासी वाहतूक करणारे उचलत असून प्रमाणापेक्षा अधिक प्रवासी भरून वाहतूक सुरू आहे. अशा वाहनातून प्रवास करताना विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

मतदानावर बहिष्कार टाकूनही बस मिळेना...सुनेगाव शेंद्री गावात देशाला स्वातंत्र्य मिळून ७७ वर्षे झाली तरी गावकऱ्यांनी अद्यापपर्यंत गावात बस तर पाहिलीच नाही. परंतु गावाला पक्का रस्ता व पक्का पूल नाही. गावकऱ्यांनी पक्का रस्ता, पुलाच्या मागणीसाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०१७ तसेच लोकसभा निवडणूक २०१९ च्या मतदानावर बहिष्कार टाकून तो १०० टक्के यशस्वी करूनही अद्यापही गावाकडे प्रशासनाचे लक्ष नसल्याचे गावकरी गाेविंद काळे यांनी सांगितले.

टॅग्स :laturलातूरstate transportएसटीEducationशिक्षणtourismपर्यटन