शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

विद्यार्थी,ज्येष्ठांना ७ किमीची पायपीट;सुनेगाव शेंद्रीकरांना ७७ वर्षांपासून बसची प्रतीक्षा! 

By संदीप शिंदे | Updated: May 16, 2024 15:43 IST

ग्रामस्थांना बाहेरगावी जायचे असल्यास मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

अहमदपूर (लातूर ) : तालुक्यातील सुनेगाव शेंद्री गावात ७७ वर्षांत अजूनही बस पोहोचलेली नाही. आज ना उद्या बस गावात येईल, अशी अपेक्षा ग्रामस्थ करीत आहेत. याबाबत त्यांनी वारंवार पाठपुरावा करून प्रशासन लक्ष देत नसल्याने ग्रामस्थांना तब्बल ७ किलोमीटरचा पायी प्रवास करावा लागत आहे.

सुनेगाव शेंद्री गावची लोकसंख्या हजाराच्या जवळपास आहे. ग्रामस्थांना बाहेरगावी जायचे असल्यास मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. अहमदपूर शहरापासून केवळ ७ किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. येथील नागरिकांना अहमदपूरला एकतर पायी यावे लागते किंवा खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. गावातून जवळपास अनेक विद्यार्थी पायीच ये-जा करतात. बससेवेअभावी ग्रामस्थांना सात किलोमीटर पायी यावे लागते. एसटी महामंडळाकडून काही ठिकाणी जाण्यासाठी पक्के रस्ते नसल्याचे कारण पुढे केले जात आहे.

परंतु, बससेवा बंद असल्याने त्याचा फायदा खासगी वाहनधारकांना होत आहे. विशेष म्हणजे या वाहनात क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसविले जातात. भाडेही जास्तीचे घेतले जाते. प्रवासी जीव धोक्यात घालून खासगी वाहनाने प्रवास करतात. सुनेगाव शेंद्री बससेवा सुरू व्हावी, यासाठी ग्रामस्थांनी पाठपुरावा करूनही कुणीच दखल घेतलेली नाही. गावात केवळ प्राथमिक शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी अहमदपूरला यावे लागते. बससेवा नसल्याने विद्यार्थ्यांना दररोज पायी जावे लागते. यातून शैक्षणिक नुकसान होत आहे. सुनेगाव शेंद्री येथून अनेक विद्यार्थी दररोज सात किलोमीटर पायी चालत जातात. अहमदपूर गाठावे लागते. गावात आजवर कधीच बस आली नाही. देशाला स्वातंत्र्य मिळून ७७ वर्षे लोटली. ग्रामीण भागात भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने कोट्यवधी रुपये खर्च केले. रस्ते तयार झाले, वीज आली पण सुनेगाव शेंद्री गावात अद्याप एकदाही राज्य परिवहन महामंडळाची बस आली नसल्याने ग्रामस्थांना उत्सुकता आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बससाठी पाठपुरावा करणाऱ्या ग्रामस्थांना ना शासन प्रतिसाद देते ना लोकप्रतिनिधी प्रतिसाद देतात.

बससेवा नसल्याने विद्यार्थी, ज्येष्ठांच्या अडचणी...ग्रामीण भागात अद्यापही बससेवा सुरळीत नाही, खेड्या-पाड्याच्या रस्त्यावर प्रवासाला बसशिवाय पर्याय नाही. सुरक्षित व वेळेत ये-जा करणाऱ्या बसमुळे प्रवाशांना आधार होतो. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी बससेवा नसल्याने अडचणी येत आहेत. याचाच फायदा अवैध प्रवासी वाहतूक करणारे उचलत असून प्रमाणापेक्षा अधिक प्रवासी भरून वाहतूक सुरू आहे. अशा वाहनातून प्रवास करताना विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

मतदानावर बहिष्कार टाकूनही बस मिळेना...सुनेगाव शेंद्री गावात देशाला स्वातंत्र्य मिळून ७७ वर्षे झाली तरी गावकऱ्यांनी अद्यापपर्यंत गावात बस तर पाहिलीच नाही. परंतु गावाला पक्का रस्ता व पक्का पूल नाही. गावकऱ्यांनी पक्का रस्ता, पुलाच्या मागणीसाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०१७ तसेच लोकसभा निवडणूक २०१९ च्या मतदानावर बहिष्कार टाकून तो १०० टक्के यशस्वी करूनही अद्यापही गावाकडे प्रशासनाचे लक्ष नसल्याचे गावकरी गाेविंद काळे यांनी सांगितले.

टॅग्स :laturलातूरstate transportएसटीEducationशिक्षणtourismपर्यटन