शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

पहिली ते नववी आणि अकरावीच्या शिक्षकांना ५० टक्के उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:14 IST

लातूर : जिल्ह्यात १५ जूनपासून नवीन शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली आहे. प्रारंभी शाळांमध्ये शिक्षकांची शंभर टक्के उपस्थिती करण्यात आली ...

लातूर : जिल्ह्यात १५ जूनपासून नवीन शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली आहे. प्रारंभी शाळांमध्ये शिक्षकांची शंभर टक्के उपस्थिती करण्यात आली होती. मात्र शिक्षण संचालकांच्या आदेशानुसार पहिली ते नववी आणि अकरावीच्या शिक्षकांना ५० टक्के तर दहावी आणि बारावीच्या शिक्षकांना निकालाच्या कामामुळे शंभर टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. त्याबाबत शाळांना आदेशित करण्यात आले आहे.

जिल्ह्यात जिल्हा परिषद, खासगी, अनुदानित, विनाअनुदानित, कनिष्ठ महाविद्यालय अशा सर्व मिळून २,७१५ शाळा आहेत. यामध्ये जवळपास २० हजारांहून अधिक शिक्षक अध्यापनाचे कार्य करतात. कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंदच असल्या तरी ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू होता. १५ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे. शाळांमध्ये विद्यार्थी येण्याबाबत निर्णय झाला नसला तरी शिक्षकांना उपस्थितीबाबत सूचित करण्यात आले आहे. प्रारंभी शंभर टक्के उपस्थितीबाबत सुचविण्यात आले होते. मात्र शिक्षणाधिकारी यांच्या १५ जूनच्या आदेशानुसार शाळेची वेळ १० ते ४.३० पर्यंत असेल. तसेच पहिली ते नववी शिक्षकांची उपस्थिती ५० टक्के तर दहावीची उपस्थिती १०० टक्के राहणार आहे.

जिल्ह्यातील शाळा २,७१५

जि.प. शाळा १,२८४

माध्यमिक शाळा ५७०

कनिष्ठ महाविद्यालय २००

पहिली ते बारावीचे शिक्षक २०,७००

कोट

शिक्षण संचालकांच्या आदेशानुसार पहिली ते नववीच्या शिक्षकांची उपस्थिती ५० टक्के करण्यात आली आहे. तसेच दहावीच्या निकालाची तयारी सुरू असल्याने शंभर टक्के उपस्थिती अनिवार्य आहे. शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शिक्षण सुरूच राहणार आहे. याबाबत शाळांना आणि मुख्याध्यापकांना सूचना करण्यात आल्या आहेत. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचीही शंभर टक्के उपस्थिती अनिवार्य आहे. - विशाल दशवंत, शिक्षणाधिकारी

संचालकांच्या पत्रात काय

शिक्षण संचालक कार्यालयाच्या वतीने १४ जून रोजी शाळा सुरू करण्याबाबत आदेश काढण्यात आले होते. त्यानुसार पहिली ते नववी आणि अकरावी ५० टक्के तर दहावी, बारावी १०० टक्के शिक्षक उपस्थिती

कोविड-१९ परिस्थितीमुळे शाळा बंद असल्या तरी शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवावे.

प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, मुख्याध्यापक, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी शंभर टक्के उपस्थित राहणे अनिवार्य असल्याचेही शिक्षण संचालकांच्या आदेशात म्हटले आहे.

जि.प. शिक्षणाधिकाऱ्यांचे पत्र

प्रारंभी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने ११ जून रोजी शंभर टक्के उपस्थितीबाबत सूचना केल्या होत्या. मात्र शिक्षण संचालकांच्या १४ जूनच्या पत्रानंतर १५ जून रोजी नवीन आदेश शिक्षण विभागाने काढले.

त्यानुसार शाळेची वेळ १० ते ४.३० ठरवून देण्यात आली. तसेच पहिली ते नववी ५० टक्के आणि अकरावी व बारावी शिक्षक उपस्थिती शंभर टक्के करण्यात आली.

शिक्षकेतर कर्मचारी उपस्थिती १०० टक्के तर ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू ठेवण्याच्या सूचनाही जि.प. शिक्षणाधिकारी यांच्या आदेशात करण्यात आल्या आहेत.

उपस्थितीबाबत योग्य निर्णय

सध्या पहिली ते नववीच्या शाळांचा ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू आहे. त्यामुळे पहिली ते नववी शिक्षकांची उपस्थिती ५० टक्के करण्याचा निर्णय योग्य आहे. दरम्यान, दहावीचा निकालाच्या अनुषंगाने शिक्षक तयारी करीत आहेत. - सोनेराव बेलुरे, शिक्षक

कोरोनामुळे शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू आहे. सध्या जि.प. शाळाही सुरू झाल्या आहेत. पहिली ते नववी शिक्षकांची उपस्थिती ५० टक्के करण्यात आली. हा निर्णय चांगला आहे. - रवींद्र गोसावी, शिक्षक