शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

२ हजार ९६८ विद्यार्थी थेट दुसरीच्या वर्गात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:14 IST

चापोली : मागील वर्षभरापासून कोरोना संकटामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मार्च २०२० मध्ये पहिले लॉकडाऊन झाले. त्यामुळे इयत्ता पहिली ...

चापोली : मागील वर्षभरापासून कोरोना संकटामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मार्च २०२० मध्ये पहिले लॉकडाऊन झाले. त्यामुळे इयत्ता पहिली ते ९ वी च्या वर्गातील विद्यार्थी परीक्षा न देता उत्तीर्ण झाले. दरम्यान, पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतलेले तालुक्यातील २ हजार ९६८ विद्यार्थी प्रत्यक्षात एकही दिवस शाळेतील वर्गात न जाता दुसरीच्या वर्गात गेले आहेत.

गेल्या वर्षीपासून कोरोनाचे संकट सुरु असून त्याचा शिक्षणावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे शाळा सुरु असल्या तरी प्रत्यक्षात वर्ग बंद असून ऑनलाईन शिक्षण प्रणाली सुरु आहे. पहिल्यांदाच बहुतांश विद्यार्थ्यांना मोबाईल, संगणकावर शिक्षण घ्यावे लागले आहे. इयत्ता पहिलीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना शब्दाची ओळख नसतानाही ऑनलाईन अभ्यासक्रमात गुंतावे लागले. शाळा, वर्गमित्र, शिक्षक यातून बाराखडी, अक्षर ओळख, शाळेचे वातावरण या बाबींपासून पहिलीच्या विद्यार्थ्यांना मुकावे लागले. एकही दिवस शाळेत न जाता थेट दुसरीच्या वर्गात हे विद्यार्थी गेले आहेत.

गेल्या वर्षी चाकूर तालुक्यात मराठी माध्यमाचे २ हजार ४६९, उर्दू माध्यमाचे १५४, इंग्रजी माध्यमाचे ३४५ असे एकूण २ हजार ९६८ विद्यार्थ्यांनी पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतला होता. आता हे सर्व परीक्षा न देता उत्तीर्ण होऊन दुसरीच्या वर्गात गेले आहेत. दरम्यान, या परिस्थितीमुळे पालकांची चिंता वाढली आहे.

शहरी भागातील काही पालकांनी विद्यार्थ्यांचा अभ्यास घेतला असला तरी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. पहिलीच्या वर्गातील शैक्षणिक पाया मजबूत न झाल्यामुळे ते पूर्ण कसे करतील, अशी चिंता पालकांना लागली आहे. विशेष म्हणजे, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षात प्रत्यक्षात वर्ग भरतील की नाही, हे सांगता येत नाही. त्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे.

शिक्षकांवर वाढणार ताण...

इयत्ता पहिलीच्या अभ्यासक्रमाची तोंड ओळख करुन घेत विद्यार्थी दुसरीच्या वर्गात गेले आहेत. त्यामुळे या वर्गाचा अभ्यासक्रम सुरू करताना शिक्षकांपुढे विविध प्रश्न निर्माण होत आहेत. शिक्षकांना प्रथम पहिलीच्या अभ्यासक्रमाची पार्श्वभूमी शिकविल्यानंतर दुसरीचा अभ्यासक्रम सुरु करावा लागणार आहे. त्यामुळे शिक्षकांवर अतिरिक्त ताण पडणार आहे.

ब्रिज कोर्सचा उपक्रम...

गतवर्षी मार्चमध्ये कोविडमुळे लॉकडाऊन झाले आणि नवीन शैक्षणिक वर्षाला जूनपासून सुरूवात झाली. त्यामुळे गतवर्षी पहिलीच्या वर्गात प्रवेश न करता विद्यार्थ्यांना दुसरीत जावे लागत आहे. या विद्यार्थ्यांसाठी राज्य शिक्षण विभागाने ब्रिज कोर्सचा उपक्रम काढला आहे, असे प्रभारी गटशिक्षणाधिकारी संजय आलमले यांनी सांगितले.