शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंनी एक तरी ठोस विकासकाम दाखवावे; मुख्यमंत्री फडणवीस यांचे युतीच्या प्रचारसभेत आव्हान
2
आमच्या अस्तित्वासाठी नव्हे, राज्यातील भावी पिढीच्या भवितव्यासाठी एकत्र आलो: ठाकरे बंधू
3
वडापाव-दाल पकवानचे महागठबंधन सत्तेवर येणार: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठी-सिंधीवर भाष्य
4
विचारसरणी सोडून काँग्रेससोबत जाणाऱ्यांवर भाजपने कारवाई करावी: खासदार डॉ. श्रीकांत शिंदे
5
कुठे, कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक? मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पनवेलमध्ये काय गाजतेय?
6
अमेरिका : मोदींनी फोन न केल्याने करार रखडला; भारत : मोदी-ट्रम्प यांच्यात ८ वेळा फोनवर संवाद
7
यंदा अर्थसंकल्प रविवारी मांडणार? अधिवेशन सुरू होणार २८ जानेवारीपासून; १३ फेब्रुवारीला संपेल
8
ईडीविरोधात तृणमूल संतप्त, खासदारांची दिल्लीत निदर्शने; ८ खासदार पोलिसांच्या घेतले ताब्यात
9
आम्ही जाणार नाही! चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी उमेदवारांच्या प्रचाराकडे फिरवली पाठ
10
सत्ताधाऱ्यांचे ‘विकासा’चे तर विरोधकांचे ‘बदल हवा’; ठाण्यात ठाकरे बंधू, भाजप-शिंदेसेनेचे बॅनर
11
राज्यात आचारसंहिता भंगाच्या १८६ तक्रारी, ८ कोटी जप्त केले; ३८ गुन्हे नोंदविण्यात आले
12
तीन वर्षांत किती बांगलादेशींना पकडून मायदेशी परत पाठवले? काँग्रेसचा सवाल; भाजपचा दावा फसवा
13
कारमध्ये १६ लाखांची रोकड; आचारसंहिता पथकाची कारवाई, पैसे कोठून आले? नवी मुंबईत कारवाई
14
अमेरिकेविरोधात महायुद्धाची तयारी? दक्षिण आफ्रिकेत चीन-रशिया-इराणच्या खतरनाक युद्धनौका पोहचल्या
15
Uddhav Thackeray: "तुमच्या फडक्यावरचा हिरवा रंग काढा अन्..."; MIM सोबत युती अन् हिंदुत्वावरून भाजपावर घणाघात
16
WPL 2026 : Nadine De Klerk ची अविश्वसनीय खेळी! MI च्या तोंडचा घास हिरावून घेत RCB ला जिंकून दिली मॅच
17
Raj Thackeray: उमेदवारी मागे घ्यायला 'त्या' तिघांना १५ कोटींची ऑफर; राज ठाकरेंनी डागली सत्ताधाऱ्यांवर तोफ
18
Virat Kohli Viral Photo: चक्क बच्चे कंपनीसोबत किंग कोहलीला भेटायला आला 'चिकू' अन्...
19
मीरा भाईंदरमध्ये विविध समाजांच्या भवनासाठी सरकार मोफत जागा देणार; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
20
भाजपा नेते गणेश नाईकांचा नगरविकास खात्यावर गंभीर आरोप; "२२०० कोटी कुठे गेले, ईडीनं चौकशी करावी"
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यात आज ‘यलो अलर्ट’; पावसाच्या उघडिपीमुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत घट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 12:04 IST

अद्याप ३८ बंधारे पाण्याखाली: धरणातील विसर्ग मात्र कायम: पडझडीत नऊ लाखांचे नुकसान

कोल्हापूर : जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभर पावसाची उघडीप राहिली. विशेष म्हणजे दुपारी कडकडीत ऊन पडल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. जून महिन्यातच धुवाधार पाऊस कोसळल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली होती. दिवसभरात पंचगंगेची पातळी फुटाने कमी झाली असून, अद्याप ३८ बंधारे पाण्याखाली आहेत. सायंकाळनंतर मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या.

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. गुरुवारी दिवसभरात अधूनमधून सरी कोसळत होत्या. मात्र, शुक्रवारी सकाळपासून पूर्णपणे उघडीप राहिली. दुपारी तर चक्क ऊन पडले होते. धरणक्षेत्रातहीपाऊस कमी झाल्याने विसर्ग कमी करण्यात आला आहे. राधानगरी धरणातून प्रतिसेकंद ३,१००, वारणातून १,७३५ तर दूधगंगातून १,६०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पावसाची उघडीप असली तरी नद्यांचे पाणी संथगतीने कमी होत आहे. पंचगंगा नदीचे पाणी दिवसभरात फुटाने कमी झाले आहे. अद्याप ३८ बंधारे पाण्याखाली असून, वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे. शुक्रवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ८.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गगनाबवड्यात ३३, भुदरगडमध्ये १२, आजरा २४, तर चंदगड १६.९ मिलिमीटर पाऊस झाला आहे.दरम्यान, हवामान विभागाने शुक्रवारी दुपारी एकपर्यंत कोल्हापूर जिल्ह्याला ‘ऑरेंज अलर्ट’ दिला होता, पण उघडीप राहिली. आज, शनिवारी जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ दिला असून उद्या, रविवारपासून दोन दिवस ‘ऑरेंज अलर्ट’ राहील, असे हवामान विभागाने सांगितले आहे.

पडझडीत नऊ लाखांचे नुकसानशुक्रवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यत २५ खासगी मालमत्तांची पडझड झाली आहे. यामध्ये ९ लाख ४ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.