शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
5
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
6
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
7
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
8
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
9
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
10
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
11
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
12
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
13
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
14
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
15
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
16
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

कोल्हापूर विभागात बारावीच्या साडेसात लाख उत्तरपत्रिका तपासणीविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 7:11 PM

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बारावीच्या उत्तरपत्रिका मूल्यमापनावर बहिष्कार टाकला आहे. तो आठव्या दिवशीही कायम राहिला. या आंदोलनामुळे कोल्हापूर विभागातील बारावीच्या सुमारे साडेसात लाख उत्तरपत्रिका तपासणीविना पडून आहेत.

ठळक मुद्देकोल्हापूर विभागात बारावीच्या साडेसात लाख उत्तरपत्रिका तपासणीविनाकनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा बहिष्कार कायम

संतोष मिठारी

कोल्हापूर : कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बारावीच्या उत्तरपत्रिका मूल्यमापनावर बहिष्कार टाकला आहे. तो आठव्या दिवशीही कायम राहिला. या आंदोलनामुळे कोल्हापूर विभागातील बारावीच्या सुमारे साडेसात लाख उत्तरपत्रिका तपासणीविना पडून आहेत.नोव्हेंबर २००५ पूर्वी व नंतरच्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. अर्धवेळ शिक्षकांना सेवासंरक्षण, पूर्णवेळ शिक्षकांना लाभ द्यावा. दि. २ मे २०१२ नंतरच्या पायाभूत रिक्त पदांवर विद्यार्थिहितासाठी नियुक्त शिक्षकांच्या मान्यता, वेतन नियुक्ती दिनांकापासून मिळावे, कनिष्ठ महाविद्यालयीन प्रशासन स्वतंत्र करावे, अशा विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे. महासंघाने याअंतर्गत बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका मूल्यमापनावर बहिष्कार घातला आहे.

बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू झाली. पहिल्या पेपरदिवशीच नियामकांनी उत्तरपत्रिकेच्या मूल्यमापन कामकाजावर बहिष्कार टाकत असल्याची नोटीस शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागीय सचिवांना देऊन आंदोलन सुरू केले. यानंतर मंगळवारअखेर बारावीचे आठहून अधिक पेपर झाले आहेत.

यावर्षी कोल्हापूर विभागातील सुमारे एक लाख २९ हजार ९३९ परीक्षार्थी आहेत. या बहिष्कार आंदोलनामुळे सुमारे साडेसात लाख उत्तरपत्रिका तपासणीविना पडून आहेत. उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन लवकर सुरू झाले नाही, तर त्याचा परिणाम निकालावर होणार आहे.तोडगा निघण्याची शक्यताविद्यार्थिहित लक्षात घेऊन उत्तरपत्रिका मूल्यमापनाबाबत सहकार्य करण्याचे आवाहन शिक्षण मंडळाने शिक्षकांना केले आहे. शिक्षकांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी मंगळवारी मुंबईत शिक्षणमंत्र्यांसमवेत महासंघाच्या शिष्टमंडळाबरोबर चर्चा झाली. बुधवारी पुन्हा चर्चा होणार आहे. यातून तोडगा निघण्याची शक्यता आहे.

 

प्रलंबित मागण्यांबाबत शासनाची राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या शिष्टमंडळासमवेत चर्चा सुरू आहे. मागण्यांच्या पूर्ततेबाबत सरकारने लेखी पत्र दिल्याशिवाय बहिष्कार मागे घेतला जाणार नाही. याबाबत उद्या, गुरुवारपर्यंत कार्यवाही होणे अपेक्षित आहे.- प्रा. अविनाश तळेकर,राज्य कार्याध्यक्ष, राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ

 

बारावीचे आजअखेर आठहून अधिक पेपर झाले आहेत. बहिष्कार आंदोलनामुळे अद्यापही उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनाचे कामकाज सुरू झालेले नाही. या आंदोलनाबाबत नियामक आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाने दिलेल्या निवेदनांची माहिती वरिष्ठ कार्यालयाला दिली आहे.- पुष्पलता पवार,कोल्हापूर विभागीय सचिव, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ 

 

टॅग्स :examपरीक्षाkolhapurकोल्हापूरTeacherशिक्षक