शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "अजित पवार, सगळ्यांचा नाद करायचा, पण..."; भाजपा नेते राजन पाटलांच्या मुलाचं थेट चॅलेंज
2
भारताला 'हिंदू राष्ट्र' घोषित करण्याची गरज नाही, हिंदू म्हणजे अशी व्यक्ती जी...- मोहन भागवत
3
'AI वर आंधळा विश्वास ठेवू नका; यातील गुंतवणुकीचा फुगा कधीही फुटू शकतो' सुंदर पिचाईं यांचा इशारा!
4
"मुलाच्या मनात माझा आदर वाढेल"; डिनर पार्टीत ट्रम्प यांनी रोनाल्डोसोबत शेअर केला घरातला खास किस्सा
5
Mumbai Airport: मुंबई विमानतळ २० नोव्हेंबर रोजी ६ तास बंद राहणार, कारण काय?
6
अनगरात 'सही'चा खेळ! अर्ज बाद होताच उज्ज्वला थिटेंचा आरोप, 'मुलगा सोबत असूनही सही राहिलीच कशी?
7
FD-RD विसरा! सुरक्षित गुंतवणूक हवी असल्यास FMP ठरेल स्मार्ट चॅाईस, लो रिस्क हाय रिटर्नचा स्मार्ट कॅाम्बो
8
भाजपाची घराणेशाही! एकाच कुटुंबातील ६ जणांना तिकीट; पत्नी, भाऊ, वहिनी, मेहुणा... सगळेच रिंगणात
9
Mahayuti: भाजप- शिंदे गटात माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा, निवडणुकीपूर्वी महायुतीत अंतर्गत वाद शिगेला!
10
शेअर बाजारात आजही घसरण, २५,९०० च्या खाली निफ्टी; IT Stocks मध्ये मोठी खरेदी
11
Video: "लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम..."; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा घणाघात, भाजपावर निशाणा
12
Delhi Blast: युनूस सरकारचा दावा खोटा; अटकेत असलेला इख्तियार बांगलादेशचा पर्दाफाश करणार !
13
आजचे राशीभविष्य - १९ नोव्हेंबर २०२५, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी आजचा दिवस अनुकूल
14
Politics: "मला आणि माझा मुलाला मारण्याचा कट" भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्याचा शिंदेसेनेवर गंभीर आरोप!
15
Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार, आरक्षणाच्या मर्यादेवर आज सुनावणी!
16
Mumbai Airport: विमानतळ परिसरातील मार्ग आजपासून २ दिवस बंद; 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर!
17
CNG Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा! ३ दिवसांनंतर सीएनजी पुरवठा पूर्ववत, प्रवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास
18
Farmers Relief: मुसळधार पाऊस किंवा वन्य प्राण्यांनी पीक तुडवले, नुकसान भरपाई मिळणार,  पण एक अट!
19
Mahayuti: एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पळवण्यावरून महायुतीत घमासान! 
20
Government Decision: 'नोटरी'वर झालेले जमीन व्यवहारही आता कायदेशीर; ३ कोटी नागरिकांना मोठा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणासाठी निजामाचे गॅझेट का?, शाहू छत्रपती यांचा सवाल; कोल्हापूर गॅझेट लागू करण्यासाठी आंदोलनाचे रंणशिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 12:05 IST

मराठा समाजाला नेमके काय मिळाले?

कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या प्रश्नात राजर्षी शाहू महाराजांनी १९०२ मध्ये काढलेल्या आरक्षण आदेशाचा उल्लेख कुठेही नाही हे दुर्दैव आहे. ज्या निजामाला आपण तीनवेळा हरवले आहे. त्याचे हैद्राबाद गॅझेट आपण का स्वीकारतोय ? असा प्रश्न खासदार शाहू छत्रपती यांनी बुधवारी उपस्थित केला. ऐतिहासिक भवानी मंडपात मराठा आरक्षणासाठीकोल्हापूर गॅझेट लागू करण्याच्या आंदोलनाला कोल्हापूर गॅझेट, पेन, कायद्याच्या पुस्तकाचे पूजन करून सुरुवात झाली यावेळी ते बोलत होते.यावेळी त्यांनी खंडेनवमीच्या निमित्ताने राज्यघटना आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी १९०२ मध्ये काढलेला आदेश प्रमाण मानून यापुढे मराठा आरक्षणाचा लढा करायचा आहे. यासाठीच सातत्याने प्रयत्न करूया असा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमाला ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. डॉ. जयसिंगराव पवार, मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती तानाजी नलवडे, व्ही. बी. पाटील, दिलीप देसाई, बाबा इंदुलकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.शाहू छत्रपती म्हणाले, आज आपण वेगळ्या पद्धतीने खंडेनवमी साजरी करत आहोत. परंपरेनुसार शस्त्रांचे पूजन करायचे असते. भारताने लोकशाही स्वीकारली असून आपल्याला त्याच रस्त्याचे जायचे आहे. मराठा आरक्षणाच्या बाबतीत संविधानामध्ये जे अडथळे आहेत ते दूर करावे लागतील तरच आरक्षणाचा प्रश्न सुटेल. मराठा समाज अनेक पातळ्यांवर मागासलेला आहे हे सिद्ध झाले आहे तसेच मराठा व कुणबी हे एकच आहेत हे मी गेले दोन वर्षे सांगत आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना अन्य समाजावर अन्याय होऊ नये.

मराठा समाजाला नेमके काय मिळाले?शाहू छत्रपती म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारसोबत बैठका घेतल्या. मात्र, सरकारकडून हा प्रश्न सुटलेला नाही. आतापर्यंत पुष्कळ प्रयत्न झाले आहेत, प्रत्यक्षात मराठा समाजाला काय मिळाले आणि किती मिळाले याचा अंदाज नाही. मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे यात शंका नाही. मराठा समाज मोठा आहे त्यामुळे त्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे.

English
हिंदी सारांश
Web Title : Shahu Chhatrapati Questions Nizam's Gazette for Maratha Reservation; agitation announced.

Web Summary : Shahu Chhatrapati questions why Nizam's gazette is used for Maratha reservation instead of Rajarshi Shahu Maharaj's 1902 order. He announced agitation for implementing Kolhapur gazette and emphasized constitutional means for Maratha reservation, advocating unity between Maratha and Kunbi communities.