शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

कायद्याची बूज राखता तर दोन वर्षापुर्वी एफआरपीचे तुकडे का पाडले : शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 5:41 PM

ऊस दर नियंत्रण समिती पहिली उचल नव्हते ऊसाचा अंतिम दर ठरविते, याची माहिती माझ्यावर टीका करणाऱ्यानी घ्यावी. कायद्याची भुज राखणाऱ्या हसन मुश्रीफ यांनी दोन वर्षापुर्वी कोणत्या कायद्याने एफआरपीचे दोन तुकडे पाडले? असा सवाल करत अशी धमकी देऊन चळवळ मोडत नसते, याचे भान ठेवावे. असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

ठळक मुद्देराजू शेट्टी यांचा मुश्रीफ यांना सवाल बेड्या ठोकणारे दादा मुश्रीफांना ‘आध्यात्मिक’ कधी पासून वाटू लागले ही तर नवीन राजकारणाची समीकरणे

कोल्हापूर :  ऊस दर नियंत्रण समिती पहिली उचल नव्हते ऊसाचा अंतिम दर ठरविते, याची माहिती माझ्यावर टीका करणाऱ्यानी घ्यावी. कायद्याची भुज राखणाऱ्या  हसन मुश्रीफ यांनी दोन वर्षापुर्वी कोणत्या कायद्याने एफआरपीचे दोन तुकडे पाडले? असा सवाल करत अशी धमकी देऊन चळवळ मोडत नसते, याचे भान ठेवावे. असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

‘स्वाभिमानी’ ची शनिवारी जयसिंगपूर येथे ऊस परिषद झाल्यापासून राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी खासदार राजू शेट्टी यांच्यावर टीका करण्यास सुरूवात केली आहे. ‘कायद्याने ऊस दर देणे बंधनकारक असताना दर जाहीर करणारे शेट्टी कोण?’ असा सवाल करून शेतकरी संघटनेला अंगावर घेणारे राज्यातील एकमेव साखर कारखानदार आहेत.

या टीकेचे पडसाद शेतकरी संघटनेत उमटले असून खासदार राजू शेट्टी म्हणाले, ऊस दर नियंत्रण समितीमध्ये अंतिम दर निश्चित केला जातो. या समितीत आपण असतानाही या मंडळींनी कारखान्यांचे आर्थिक वर्ष बदलण्याचा केलेला प्रयत्न आम्ही हाणून पाडला. आमच्या ऊसाला किती दर पाहिजे याची मागणी केली म्हणून मुश्रीफ यांचा एवढा तीळपापड का झाला.

मुश्रीफ एवढीच कायद्याची बूज राखतात तर दोन वर्षापुर्वी एफआरपी देण्यासाठी कारखान्यांकडे पैसे नव्हते त्यावेळी दोन तुकड्यात पैसे दिले, त्यावेळी कायदा कोठे गेला. कारखान्यांची परिस्थिती पाहून आम्हीही व्यावहारिक तोडगा मान्य केला. आता शेतकरी दुष्काळाने होरपळत आहे, कर्जमाफीच्या लाभाचा सर्वात जास्त फटका ऊस उत्पादकांना बसला आहे.

साखरेचे दर चांगले असल्याने कारखान्यांची परिस्थिती चांगली असल्याने चार पैसे जादा मागितले म्हणून लगेच कायद्याची भाषा आम्हाला कोणी सांगू नये. उठसूठ धमकी देऊन चळवळ मोडत नसते, याचे भान मुश्रीफ यांनी ठेवावे.

हसन मुश्रीफ यांना बेड्या ठोकून तुरूंगात डांबण्याची भाषा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील करत होते. तेच पाटील कधीपासून मुश्रीफ यांना आध्यात्मिक वाटू लागले? हे कळत नसून ही तर नवीन राजकारणाची समीकरणे आहेत. पण अशा समीकरणाने आमच्या चळवळीला फरक पडत नसल्याचेही शेट्टी यांनी सांगितले.

 

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीHassan Mianlal Mushrifहसन मियांलाल मुश्रीफ