उसाला पहिली उचल एकरकमी ३४०० रुपये द्या - राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 01:18 AM2017-10-29T01:18:41+5:302017-10-29T04:46:38+5:30

उसाला पहिली उचल टनांस एकरकमी ३४०० रुपये मिळाल्याशिवाय कारखान्यांची धुराडी पेटू देणार नाही, असा इशारा देवून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी येथे शनिवारी झालेल्या ऊस परिषदेत दिला

First pick 3400 rupees: Raju Shetty | उसाला पहिली उचल एकरकमी ३४०० रुपये द्या - राजू शेट्टी

उसाला पहिली उचल एकरकमी ३४०० रुपये द्या - राजू शेट्टी

Next
ठळक मुद्देजयसिंगपूर येथील विराट ऊस परिषदेत आंदोलनाचे रणशिंग; धुराडी पेटू न देण्याचा इशारासंसदेचे हिवाळी अधिवेशन आहे; परंतु आम्ही समांतर संसद भरविणार

विश्वास पाटील-राजाराम लोंढे-संदीप बावचे 
जयसिंगपूर : उसाला पहिली उचल टनास एकरकमी ३४०० रुपये मिळाल्याशिवाय कारखान्यांची धुराडी पेटू देणार नसल्याचा इशारा देऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी येथे शनिवारी झालेल्या ऊस परिषदेत आंदोलनाचे रणशिंग फुंकले. त्यास शेतकºयांनी हात वर करून व मुठी आवळून प्रतिसाद दिला. पहिल्या उचलीबाबत आम्ही लवचिक आहे; परंतु सन्मानजनक तोडगा निघेपर्यंत ऊसतोड नाकारा, असे शेट्टी यांनी शेतकºयांना बजावले.

या परिषदेत केंद्र व राज्यातील भाजप सरकार आणि पंतप्रधान मोदी यांच्यासह कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर टीकेची झोड उठवली. या परिषदेला महाराष्ट्राच्या कानाकोपºयांतून शेतकरी प्रचंड संख्येने आले होते. खोत यांनी ऊसदर म्हणजे मटक्याचा आकडा नव्हे, अशी टीका केली होती, त्यास उत्तर द्यायला लोक त्वेषाने आले. त्यामुळे गर्दीचा उच्चांक झाला. विक्रमसिंह मैदानावर झालेल्या या सोळाव्या परिषदेच्या अध्यक्षस्थानी अजितबाबा शिंदे-नेसरीकर होते.

ऊसदराचा महाराष्ट्राला लागू होणारा निर्णय याच परिषदेत होणार असल्याचे खासदार शेट्टी यांनी ठणकावून सांगितले. ते म्हणाले, ‘मंत्री चंद्रकांतदादा पाटील हे ऊसदराचे काय ठरवायचे, अशी विचारणा करीत आहेत. हा प्रश्न तुम्हाला संपला असल्याचे वाटत असेल, तर मग गेल्यावर्षी ऊसदराचा प्रश्न मी सोडविला असे श्रेय घ्यायला कशाला आला होता..? यंदा देशात जो साखरसाठा शिल्लक आहे, तो या महिन्यात संपणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने साखर आयात न केल्यास तुमच्या उसाच्या कांडीला सोन्याचा भाव मिळेल. थोडा धीर धरा. देशाची गरज २४० लाख टनांची आहे व तेवढेच उत्पादन होणार असल्याने चांगला दर मिळेल, परंतु त्यासाठी १५ दिवस कारखाने बंद पाडायची तयारी ठेवा.

यावेळची लढाई दुहेरी असल्याचे सांगून शेट्टी म्हणाले, ‘ऊसदरासाठीचा संघर्ष आहेच, परंतु त्याशिवाय देशातील शेतकºयांचा सात-बारा कोरा करण्यासाठीही संघर्ष करायचा आहे. जोपर्यंत खासगी सावकारांसह शेतकºयांच्या डोक्यावरील संपूर्ण कर्ज माफ होत नाही, तोपर्यंत ही लढाई आता थांबणार नाही. उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळाला पाहिजे, यासाठीच आम्ही देशभरातील शेतकºयांना घेऊन दिल्लीवर धडक देणार आहे. त्यावेळी संसदेचे हिवाळी अधिवेशन आहे; परंतु आम्ही समांतर संसद भरविणार असून, त्यातील एक सत्र आत्महत्या केलेल्या शेतकºयांच्या विधवा घेणार आहेत. त्यातील ठराव आम्ही राष्ट्रपतींना भेटून देणार आहे. ही खरी कष्टकºयांची संसद असल्याचे आम्ही देशाला दाखवून देऊ.’

‘स्वाभिमानी एक्स्प्रेस’च्या खर्चासाठी शेतकºयांचा प्रतिसाद
सात-बारा कोरा करण्याच्या मागणीसाठी २० नोव्हेंबरला दिल्लीत धडक देण्यासाठी महाराष्ट्रातून ‘स्वाभिमानी एक्स्प्रेस’ म्हणून एक स्पेशल रेल्वेच नेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

राज्यातील आत्महत्या केलेल्या ५४३ शेतकºयांच्या विधवांना सन्मानाने किसान संसदेला नेण्यात येणार आहे. रेल्वेच्या खर्चासाठी संघटनेच्यावतीने मदतीच्या आवाहनास शेतकºयांनी भरभरून प्रतिसाद दिला.

आमच्यामुळेच ४२ खासदार
खासदार शेट्टी म्हणाले, ‘भाजपवाल्यांना मते द्या, असे सांगत मी महाराष्ट्राच्या गावागावांत गेलो म्हणून कधी नव्हे ते ४८ पैकी ४२ खासदार भाजपचे निवडून आले; परंतु निवडून आलेले भामटे निघाले. भाजपवाले मला म्हणतात की मोदींवर टीका करू नका, आम्हाला यातना होतात. परंतु तुम्ही शेतकºयांच्या जीवनात अच्छे दिन आणतो असे सांगून आमचा विश्वासघात केला, त्याच्या यातना आम्हाला होत नाहीत का, अशी विचारणा शेट्टी यांनी केली.

‘लोकमत’ चे अभिनंदन
ऊस परिषदेच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ ने शनिवारच्या अंकात ऊस दराचे अर्थकारण मांडणारे लेखन प्रसिद्ध केल्याबद्दल परिषदेत ‘लोकमत’चे अभिनंदन केले. उपस्थित शेतकºयांनी टाळ्या वाजवून त्यास दाद दिली.

Web Title: First pick 3400 rupees: Raju Shetty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.