शहरं
Join us  
Trending Stories
1
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
2
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
3
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
4
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
7
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
8
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
9
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
10
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
11
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
12
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
13
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
14
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
15
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
16
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
17
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
18
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
19
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
20
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजी-सांगली रस्त्यावर प्रवास कोण करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 00:48 IST

पावसाळा सुरू झाल्याने रस्ता होणे शक्य नसल्याने आणखीन किती दिवस हा धोकादायक प्रवास सहन करायचा, असे म्हणत वाहनधारकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देअपघात घडूनही वाहनचालक दररोजचा करतात धोकादायक प्रवास दुर्गम ग्रामीण भागातील रस्त्याप्रमाणे स्वरूप

इचलकरंजी : येथील सांगली रोडची दुरवस्था पाहता दुर्गम ग्रामीण भागातील वाड्या-वस्त्यांवर जाण्यासाठीचा मार्ग असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. भुयारी गटार योजनेच्या खुदाईमुळे या मुख्य रस्त्याची वाताहात झाली आहे. मोटारसायकली घसरून पडणे, यासह किरकोळ अपघात नित्याचेच बनले आहेत. पावसाळा सुरू झाल्याने रस्ता होणे शक्य नसल्याने आणखीन किती दिवस हा धोकादायक प्रवास सहन करायचा, असे म्हणत वाहनधारकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

इचलकरंजी-सांगली-मिरज-जयसिंगपूरकडे जाणारा हा मुख्य मार्ग आहे. त्याचबरोबर या मार्गावर मोठमोठे शाळा, कॉलेज, अभियांत्रिकी विद्यालये, मल्टिप्लेक्स, मॉल, हॉटेल, विविध कंपनीच्या गाड्यांचे शोरूम असल्याने नेहमीच मोठी वर्दळ असते. नगरपालिकेच्यावतीने गेल्या वर्षभरापासून भुयारी गटार योजना राबविण्यासाठी या रस्त्याची मोठ्या प्रमाणात खुदाई सुरू केली आहे. त्यामुळे रस्त्याची चाळण होऊन पूर्ण रस्ता खराब झाला आहे. खुदाई केलेली माती रस्त्यावर पसरून निसरडे निर्माण झाल्याने अनेक वाहनधारक यावरून घसरून पडून जखमी झाले आहेत.

गेल्या पावसाळ्यामध्येही अशीच परिस्थिती कायम आहे. अनेकजण या रस्त्यावर घसरून पडत आहेत. त्याचबरोबर मोठी खुदाई केली असतानाही त्याबाबत सूचना अथवा काळजी न घेतल्याने काहीजण खड्ड्यांमध्ये जाऊन पडले आहेत. वारंवार घडणाऱ्या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांनी अनेकवेळा आंदोलने केली, नगरपालिकेकडे तक्रारी केल्या, सोशल मीडियावर वारंवार टीकाही केली जाते. तरीही हे काम म्हणावे तशा गतीने पूर्ण होताना दिसत नाही.जीव मुठीत घेऊन करावे लागणार मार्गक्रमणपावसाळा सुरू झाल्याने नियमानुसार रस्त्याचे काम करता येणारनाही, त्यामुळे नागरिकांना दिवाळीपर्यंत जीव मुठीत घेऊन या रस्त्यावरूनच मार्गक्रमण करावे लागणार आहे. परिणामी संतप्त नागरिकांच्या तीव्र भावनांना नगरपालिकेलाही सामोरे जावे लागणार आहे.वारंवारच्या खुदाईमुळे रस्ता कमकुवतभुयारी गटार योजनेच्या पूर्वी पाईपलाईनसाठीही या मार्गावर खुदाई करण्यात आली होती. वारंवारच्या खुदाईमुळे हा रस्ता कमकुवत झाला असून, शासनाने नव्याने रस्ता करताना गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन चांगला दर्जेदार रस्ता करणे गरजेचे आहे.

सद्य:स्थितीत हा रस्ता म्हणजे ग्रामीण भागातील वाड्या-वस्त्यांवर जाणारा किंवा पाणंद रस्ता असल्यासारखे चित्र निर्माण झाले आहे. नाइलाजास्तव अनेकजण धोका पत्करून या रस्त्यावर मार्गक्रमण करीत आहेत.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरroad safetyरस्ते सुरक्षा