शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजी-सांगली रस्त्यावर प्रवास कोण करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 00:48 IST

पावसाळा सुरू झाल्याने रस्ता होणे शक्य नसल्याने आणखीन किती दिवस हा धोकादायक प्रवास सहन करायचा, असे म्हणत वाहनधारकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देअपघात घडूनही वाहनचालक दररोजचा करतात धोकादायक प्रवास दुर्गम ग्रामीण भागातील रस्त्याप्रमाणे स्वरूप

इचलकरंजी : येथील सांगली रोडची दुरवस्था पाहता दुर्गम ग्रामीण भागातील वाड्या-वस्त्यांवर जाण्यासाठीचा मार्ग असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. भुयारी गटार योजनेच्या खुदाईमुळे या मुख्य रस्त्याची वाताहात झाली आहे. मोटारसायकली घसरून पडणे, यासह किरकोळ अपघात नित्याचेच बनले आहेत. पावसाळा सुरू झाल्याने रस्ता होणे शक्य नसल्याने आणखीन किती दिवस हा धोकादायक प्रवास सहन करायचा, असे म्हणत वाहनधारकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

इचलकरंजी-सांगली-मिरज-जयसिंगपूरकडे जाणारा हा मुख्य मार्ग आहे. त्याचबरोबर या मार्गावर मोठमोठे शाळा, कॉलेज, अभियांत्रिकी विद्यालये, मल्टिप्लेक्स, मॉल, हॉटेल, विविध कंपनीच्या गाड्यांचे शोरूम असल्याने नेहमीच मोठी वर्दळ असते. नगरपालिकेच्यावतीने गेल्या वर्षभरापासून भुयारी गटार योजना राबविण्यासाठी या रस्त्याची मोठ्या प्रमाणात खुदाई सुरू केली आहे. त्यामुळे रस्त्याची चाळण होऊन पूर्ण रस्ता खराब झाला आहे. खुदाई केलेली माती रस्त्यावर पसरून निसरडे निर्माण झाल्याने अनेक वाहनधारक यावरून घसरून पडून जखमी झाले आहेत.

गेल्या पावसाळ्यामध्येही अशीच परिस्थिती कायम आहे. अनेकजण या रस्त्यावर घसरून पडत आहेत. त्याचबरोबर मोठी खुदाई केली असतानाही त्याबाबत सूचना अथवा काळजी न घेतल्याने काहीजण खड्ड्यांमध्ये जाऊन पडले आहेत. वारंवार घडणाऱ्या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांनी अनेकवेळा आंदोलने केली, नगरपालिकेकडे तक्रारी केल्या, सोशल मीडियावर वारंवार टीकाही केली जाते. तरीही हे काम म्हणावे तशा गतीने पूर्ण होताना दिसत नाही.जीव मुठीत घेऊन करावे लागणार मार्गक्रमणपावसाळा सुरू झाल्याने नियमानुसार रस्त्याचे काम करता येणारनाही, त्यामुळे नागरिकांना दिवाळीपर्यंत जीव मुठीत घेऊन या रस्त्यावरूनच मार्गक्रमण करावे लागणार आहे. परिणामी संतप्त नागरिकांच्या तीव्र भावनांना नगरपालिकेलाही सामोरे जावे लागणार आहे.वारंवारच्या खुदाईमुळे रस्ता कमकुवतभुयारी गटार योजनेच्या पूर्वी पाईपलाईनसाठीही या मार्गावर खुदाई करण्यात आली होती. वारंवारच्या खुदाईमुळे हा रस्ता कमकुवत झाला असून, शासनाने नव्याने रस्ता करताना गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन चांगला दर्जेदार रस्ता करणे गरजेचे आहे.

सद्य:स्थितीत हा रस्ता म्हणजे ग्रामीण भागातील वाड्या-वस्त्यांवर जाणारा किंवा पाणंद रस्ता असल्यासारखे चित्र निर्माण झाले आहे. नाइलाजास्तव अनेकजण धोका पत्करून या रस्त्यावर मार्गक्रमण करीत आहेत.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरroad safetyरस्ते सुरक्षा