शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

आम्ही सैन्य भरतीसाठी आलोय.... हॉटेलमालक म्हणाला 'मग पोटभर खा अन् फुकट जेऊन जा'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2019 3:48 PM

कोल्हापूरमध्ये सैन्य भरतीच्या परीक्षेसाठी पहिल्याच दिवशी तब्बल दहा हजारांहून अधिक उमेदवारांनी हजेरी लावली आहे.

कोल्हापूर : शहरतील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर प्रादेशिक सेनेतील शिपाई, लिपिक अशा पदांसाठी निवड चाचणी मेळाव्यास सोमवारी प्रारंभ झाला आहे. त्यासाठी राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार राज्यांतूनही मुले आली आहेत. तर गोंदिया, यवतमाळपासून सैन्यभरती होण्यासाठी मुले कोल्हापुरात दाखल झाली आहे. या मुलांना येथील एका हॉटेलमालकाने सुखद धक्का दिला आहे. सैन्य भरतीसाठी आलेल्यांना चक्क मोफत जेवण येथील हॉटेल मालकाने दिले. त्यामुळे ही मुलेही भावूक झाली. 

कोल्हापूरमध्ये सैन्य भरतीच्या परीक्षेसाठी पहिल्याच दिवशी तब्बल दहा हजारांहून अधिक उमेदवारांनी हजेरी लावली आहे. रविवारपासून रात्रभर फुटपाथवर झोपलेल्या या मुलांनी सकाळपासून जवळच्या हॉटेलात तुडुंब गर्दी केली होती. मात्र, आपल्या खिशाचा सल्ला घेऊनच ही मुले हॉटेलमध्ये शिरत होती. त्यावेळी तेथील हॉटेलमालक म्हणाला, ''आधी आत या, पोटभर खा, असतील तर पैसे द्या नाहीतर फुकट जेऊन जा.."

त्यावर, ती मुले म्हणाली, अहो, काका, काही हॉटेल्सनी आमची गर्दी पाहून रेट दुप्पट केले आहेत. म्हणूनच काल रात्री 170 अन् 200 रुपयांनी  थाळी जेवलोय. म्हणूनच आधी रेट विचारतोय. त्यावर पुन्हा एकदा या हॉटेलमालकाने मुलांना सांगितलं. "पैशाची काळजी करुच नका. आमची साधी थाळी 70 रुपयालाच मिळेल. तेही असतील तर द्या... नाहीतर फुकट खा.. काहीच प्रॉब्लेम नाही, पण उपाशीपोटी राहू नका. हॉटेल मालकाच्या या उत्तराने ही मुले अगदी भारवून गेली. त्यानंतर, या हॉटेलवर मुलांची मोठी गर्दीही झाली. त्यामुळे या गर्दीसाठी जेवणाचे नियोजन करणे हॉटेल मालकाला अशक्य बनले होते. त्यावेळी त्याने आपल्या मित्रांची, सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि पुण्याहून आलेल्या काही मित्रांची मदत घेऊन या भावी सैनिकांची भूक भागविण्याचं काम केलं.

हॉटेल खमंग... खाऊया आनंदे... याचे मालक सुधांशू यांनी निस्वार्थपणे सैन्यात भरतीसाठी आलेल्या तरुणांना जेवण वाढले. सकाळपासून 400 जणांना जेवण आणि 300 जणांना नाश्ता त्यांनी दिला. मात्र, आपल्या गल्ल्यात किती पैसे जमा झालेत आणि किती जणांनी पैसे दिलेत, हे अजिबात पाहिले नाही. पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतरही तरुण पोरं सैन्यात भरती होतात, हे पाहूनच मला आनंद झाल्याचं हॉटेलमालक सुधांशू यांनी म्हटलंय. 

कोल्हापूर येथील 109 इन्फंट्री (टी. ए.) मराठा लाईट इन्फंट्री बटालियनतर्फे नियोजन केलेल्या भरती मेळाव्यात प्रादेशिक सैन्य भरतीसाठी शिपाई (जनरल ड्युटी), शिपाई क्लार्क, शिपाई (चीफ), शिपाई (स्पेशल चीफ), शिपाई (हाऊसकीपर), शिपाई (हेअर ड्रेसर) या पदांसाठी 2 मार्चपर्यंत ही भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. या मेळाव्यात 18 ते 42 वर्षांपर्यंतच्या उमेदवारांना भरतीत सहभागी होता येणार आहे. पहाटे तीन वाजल्यापासूनच टेंबलाईवाडी येथील बीएसएनएल चौक येथे गर्दी होऊ लागली. पहिल्या दिवशी फक्त कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि बेळगाव जिल्ह्यांसाठी भरती प्रक्रिया होती. मात्र, महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांसह कर्नाटक राज्यातील उमेदवारांनी हजेरी लावल्याने मोठा गोंधळ उडाला. एकाचवेळी दहा हजारांहून अधिक उमेदवारांनी भरती प्रक्रियेत सहभाग घेतल्याने पुढे जाण्यावरून उमेदवारांमध्ये ढकलाढकलीचा प्रकार होऊ लागल्याने गोंधळात अधिकच भर पडली. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून सौम्य लाठीहल्ला करून परिस्थिती नियंत्रणात आणली.  

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरIndian Armyभारतीय जवानSoldierसैनिकexamपरीक्षाhotelहॉटेल