शहरं
Join us  
Trending Stories
1
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
2
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
3
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
4
सोनं १ लाखांपार, का उदय कोटक यांनी भारतीय महिलांना जगातील सर्वोत्तम फंड मॅनेजर म्हटलं?
5
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार
6
'या' ज्येष्ठ नागरिकांना आयकरात मिळते ५ लाखांची सवलत; आयटीआर भरण्याची प्रक्रिया जाणून घ्या
7
डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्र; धक्कादायक माहिती उघड
8
वहिनीच्या बेडरूममधून येत होते चित्रविचित्र आवाज, दिराला आला संशय, दरवाजा उघडताच... 
9
छत्रपती संभाजीनगरच्या 'तेजस्वी'चे यूपीएससीत झळाळते यश; तिसऱ्याच प्रयत्नात ९९ वी रँक
10
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...
11
Astro Tips: अनेक जोडप्यांची इच्छा असूनही त्यांना संतती सौख्य लाभत नाही, असे का? जाणून घ्या!
12
UPSC परीक्षेचा निकाल जाहीर; पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा, प्रयागराजची शक्ती दुबे पहिल्या स्थानी
13
९ दिवसांत ३ शहरं! "व्हायरल झालो, आमच्याच बातम्या सर्वत्र"; जावयासह पळून गेलेली सासू म्हणाली...
14
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
15
१००-२०० नाही तर ट्रम्प यांनी थेट ३५२१% लावलं टॅरिफ, पण भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर बनले रॉकेट
16
छत्रपती संभाजीनगरात खंडपीठाला बॉम्बने उडवण्याची धमकी; कोर्टात शोध मोहीम, पोलिस अलर्ट
17
करिअर, कुटुंब आणि आर्थिक व्यवस्थापन कसे करावे? सोप्या ६ टीप्स वापरा आणि टेन्शन फ्री व्हा
18
'पाच दिवसांत व्हिडीओ काढून टाका...', दिल्ली उच्च न्यायालयाचा रामदेव बाबांना दणका
19
पुन्हा परतला कोरोना, महाराष्ट्राशेजारील या राज्यात एका महिलेच्या मृत्यूने खळबळ, सापडले एवढे रुग्ण
20
एक बायको गावात, दुसरी शहरात! नववधूची १५ दिवसांत फसवणूक; पतीने गर्लफ्रेंडशी केलं लग्न

Kolhapur: आठ दिवस पाणीपुरवठा ठप्प, संतप्त शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना कोंडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 15:35 IST

कुरुंदवाड : पाटबंधारे विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे पंचगंगा नदीपात्रातील पाणीपातळी कमी झाल्याने गेल्या आठ दिवसांपासून शेतीचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. ...

कुरुंदवाड : पाटबंधारे विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे पंचगंगा नदीपात्रातील पाणीपातळी कमी झाल्याने गेल्या आठ दिवसांपासून शेतीचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. पाण्याअभावी पिके वाळत असल्याने शिरढोण (ता. शिरोळ) येथील शेतकऱ्यांनी कुरुंदवाड पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत त्यांना कोंडून घातले.पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी शशांक शिंदे आल्यानंतर व बुधवारपर्यंत पंचगंगा नदीपात्रातील पाणीपातळी ३० फूट करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर अधिकाऱ्यांची सुटका केली. जयहिंद सहकारी पाणीपुरवठा संस्थेचे अध्यक्ष दस्तगीर बाणदार यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.दरम्यान, बुधवारपर्यंत पाणीपातळी योग्य न झाल्यास पाटबंधारे अधिकाऱ्यांना पुन्हा कोंडून कार्यालयासमोरच आत्मदहन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला. तेरवाड बंधाऱ्यावर पंचगंगा पाणीपातळी २७ फुटांच्या खाली गेल्याने या नदीवरील खासगी व सहकारी पाणीपुरवठा संस्थांचे विद्युतपंप उघडे पडले आहेत. कार्यालयाकडे वारंवार तक्रार करूनही अधिकारी निष्काळजीपणा करत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी पाटबंधारे शाखा कार्यालयातील अधिकाऱ्यांना धारेवर धरले.कार्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी सहायक सुमित डोंगळे, कार्यालयीन लिपिक एस. जी. शिंदे यांनी समाधानकारक उत्तरे न दिल्याने शेतकऱ्यांनी कार्यालयाला कडी घालून अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना कोंडले. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.दुपारी येथील पाटबंधारे कार्यालयातील उपविभागीय अधिकारी शशांक शिंदे आल्याने बाणदार यांच्यासह शेतकऱ्यांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार करत धारेवर धरले. सुमारे एक तासांच्या वादळी चर्चेनंतर अधिकारी शिंदे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर पाटबंधारे कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची सुटका केली.आंदोलनात सरपंच भास्कर कुंभार, अरुण शिंगे, डॉ. संदीप नागणे, अर्जुन बेबडे, शाहीर बाणदार, मोरा भंडारे, सुधाकर खोत, उत्तम शिंदे, भाऊसाहेब चौधरी, अस्लम मुजावर यांच्यासह शिरढोण, अब्दुललाट येथील शेतकरी सहभागी झाले होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीWaterपाणीagitationआंदोलन