शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
2
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
3
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
4
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
5
'हिरव्या पतंगाचा मांजा भगवा तर धनुष्याचा बाण हिरवा, भाजपा, शिंदेसेना आणि MIM एकच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
6
थ्रिलर फिल्मपेक्षाही भयंकर! जावयासोबत सासूचं सूत जुळलं, अडसर ठरणाऱ्या नवऱ्यालाच संपवलं
7
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, महापालिका निवडणुकीत नवा वाद; प्रचार संपला तरीही उमेदवारांना...
8
गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढलं, तीन दिवसंपासून घसरतोय हा शेअर; आजही 5.58% आपटला, काय म्हणतात एक्सपर्ट?
9
एका दिवसात १ लाख कोटींचा धुराळा! टाटांच्या 'या' कंपनीचा शेअर धडाम; संक्रांतीपूर्वीच गुंतवणूकदारांना 'धक्का'
10
ना भिंतीवर पोस्टर, ना रॅली, ना फ्लेक्सबाजी; जपानची निवडणूक पद्धत पाहून तुम्हीही व्हाल थक्क!
11
T20 Word Cup: ४ परदेशी खेळाडूंना भारताचा व्हिसा नाकारला; 'पाकिस्तान कनेक्शन' पडले महागात
12
इराणवरील लष्करी कारवाईला तूर्तास ब्रेक; अमेरिकेनं दिली चर्चेची आणखी एक ऑफर, तोडगा निघणार?
13
"...तर तेव्हा उपमुख्यमंत्री झाले नसते'; बसवलेला मुख्यमंत्री म्हणत राज ठाकरेंचा फडणवीसांवर निशाणा
14
Uday Samant: 'काँग्रेसचा वाण नाही, पण गुण लागला' राज ठाकरेंच्या सभेनंतर उदय सामंतांचा टोला!
15
दुपारी जेवणानंतर का येते झोप? सायंटिफीक कारण समजल्यावर तुम्हीही नक्कीच घ्याल 'पॉवर नॅप'
16
तुम्ही संभाजीनगरचे पालक, पण देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मालक; संजय केनेकर शिरसाटांवर संतापले
17
IND vs NZ: विराट-शिखरचा विक्रम धोक्यात! श्रेयस अय्यर वनडे क्रिकेटमध्ये रचणार 'असा' इतिहास
18
२०००% नं वधारला हा स्मॉलकॅप शेअर, ₹54 वर आलाय भाव; आता कंपनी ₹84 कोटींचे भांडवल उभारणार
19
तुमच्या कुटुंबाचे भविष्य करा सुरक्षित! वर्षाला फक्त २० रुपये भरा आणि मिळवा २ लाखांचे कवच
20
मतदानादिवशी ठाकरे बंधूंचे 'भगवा गार्ड' मैदानात उतरणार, दुबार, बोगस मतदारांना पकडणार आणि...
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: वारणा नदीच्या पाण्याने गाठला तळ, पाणीटंचाईने शेतकरी हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 13:01 IST

शेती उत्पादनावर परिणाम होणार अशी भीती शेतकऱ्यांना वाटू लागली

खोची : ऐन हिवाळ्यात वारणा नदीच्या पाण्याने तळ गाठला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना कृषी व पिण्याच्या पाण्याचा तुटवडा भासू लागला आहे. नदीच्या पाण्याचा गारठा सोडाच पाणी शोधण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. बंधारे व पूर संरक्षक भिंतीच्या दुरुस्तीच्या कामामुळे गेली आठ-दहा दिवस झाले शेतकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.माणगाव (ता. शाहुवाडी), तांदूळवाडी, शिगाव (ता. वाळवा) येथील कोल्हापूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. तर उखळू (ता. शाहुवाडी, करंगुली (ता. शिराळा) कणेगाव (ता. वाळवा) येथे पूर संरक्षक भिंतीचे काम सुरू आहे. त्यामुळे वारणा नदीचे जोरदार प्रवाहाने वाहणारे पाणी थांबले आहे. गेले आठ-दहा दिवस झाले पाणी पातळी एकदमच तळापर्यंत पोहचली आहे. नदीचा पृष्ठभाग दिसू लागला आहे.शेकडो शेतकऱ्यांच्या कृषी सिंचनाच्या मोटारी तसेच गाव पाणीपुरवठा करणाऱ्या मोटारी सुद्धा उघड्या पडल्या आहे. अनेक ठिकाणी अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे शेतीला पाणी देण्याचे तसेच गाव पाणीपुरवठा याचे नियोजन कोलमडून पडले आहे. शेतीला पाणी देण्याचा फेर वाढला आहे. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होणार अशी भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.दरम्यान एक हजार क्युसेकने पाणी सोडले असून उद्या पर्यंत खोची बंधाऱ्यापर्यंत नदीचे पाणी भरपूर येईल अशी माहिती जलसंपदा विभागाचे अधिकारी बी. आर. पाटील यांनी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Warana River Dries Up, Farmers Face Water Scarcity

Web Summary : Warana River's water level has drastically decreased, causing water shortages for irrigation and drinking in riverbank villages. Repair work on dams and flood protection walls has exacerbated the crisis, impacting agriculture and water supply schedules, raising farmer concerns about production.