शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: वारणा नदीच्या पाण्याने गाठला तळ, पाणीटंचाईने शेतकरी हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 13:01 IST

शेती उत्पादनावर परिणाम होणार अशी भीती शेतकऱ्यांना वाटू लागली

खोची : ऐन हिवाळ्यात वारणा नदीच्या पाण्याने तळ गाठला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना कृषी व पिण्याच्या पाण्याचा तुटवडा भासू लागला आहे. नदीच्या पाण्याचा गारठा सोडाच पाणी शोधण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. बंधारे व पूर संरक्षक भिंतीच्या दुरुस्तीच्या कामामुळे गेली आठ-दहा दिवस झाले शेतकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.माणगाव (ता. शाहुवाडी), तांदूळवाडी, शिगाव (ता. वाळवा) येथील कोल्हापूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. तर उखळू (ता. शाहुवाडी, करंगुली (ता. शिराळा) कणेगाव (ता. वाळवा) येथे पूर संरक्षक भिंतीचे काम सुरू आहे. त्यामुळे वारणा नदीचे जोरदार प्रवाहाने वाहणारे पाणी थांबले आहे. गेले आठ-दहा दिवस झाले पाणी पातळी एकदमच तळापर्यंत पोहचली आहे. नदीचा पृष्ठभाग दिसू लागला आहे.शेकडो शेतकऱ्यांच्या कृषी सिंचनाच्या मोटारी तसेच गाव पाणीपुरवठा करणाऱ्या मोटारी सुद्धा उघड्या पडल्या आहे. अनेक ठिकाणी अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे शेतीला पाणी देण्याचे तसेच गाव पाणीपुरवठा याचे नियोजन कोलमडून पडले आहे. शेतीला पाणी देण्याचा फेर वाढला आहे. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होणार अशी भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.दरम्यान एक हजार क्युसेकने पाणी सोडले असून उद्या पर्यंत खोची बंधाऱ्यापर्यंत नदीचे पाणी भरपूर येईल अशी माहिती जलसंपदा विभागाचे अधिकारी बी. आर. पाटील यांनी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Warana River Dries Up, Farmers Face Water Scarcity

Web Summary : Warana River's water level has drastically decreased, causing water shortages for irrigation and drinking in riverbank villages. Repair work on dams and flood protection walls has exacerbated the crisis, impacting agriculture and water supply schedules, raising farmer concerns about production.