शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

पंधरा दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा-पाऊस लांबल्यास कोल्हापुरात पाणीबाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 00:57 IST

अवघा महाराष्ट्र पाण्यावाचून तडफडत असताना कोल्हापूरकर पाण्याची बिनधास्त चैन करीत आहेत; पण ती चैन करण्याचे दिवसही आता संपण्याच्या मार्गावर आहेत. कारण, जिल्ह्याची तहान भागविणारी राधानगरी, काळम्मावाडी, वारणा, तुळशी ही चारही मोठी धरणे कोरडी पडण्याच्या मार्गावर आहेत

ठळक मुद्देधरणांनी गाठला तळ : राधानगरीत एक, तर ‘काळम्मावाडी’त दीड टीएमसी पाणी;

कोल्हापूर : अवघा महाराष्ट्र पाण्यावाचून तडफडत असताना कोल्हापूरकर पाण्याची बिनधास्त चैन करीत आहेत; पण ती चैन करण्याचे दिवसही आता संपण्याच्या मार्गावर आहेत. कारण, जिल्ह्याची तहान भागविणारी राधानगरी, काळम्मावाडी, वारणा, तुळशी ही चारही मोठी धरणे कोरडी पडण्याच्या मार्गावर आहेत. या धरणांतील सध्याचा पाणीसाठा केवळ १५ दिवस पुरेल इतकाच असून पाऊस लांबल्यास दुष्काळाच्या झळा या पाणीदार जिल्ह्यास बसणार आहेत.

सध्या राधानगरी धरणात एक टीएमसीपेक्षाही कमी पाणीसाठा आहे, तर काळम्मावाडी धरणात अवघे दीड टीएमसी पाणी शिल्लक आहे. वारणा ३.५, तर ‘तुळशी’ने ०.९० टीएमसी इतका आजवरचा नीचांकी साठा नोंदविला आहे. मान्सूनचे आगमन२० दिवस लांबणीवर पडले आहे. सध्याचा पाणीसाठा केवळ १५ दिवस पुरेल इतकाच असल्याने आता फक्त पिण्याच्या पाण्यासाठीच प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतीसाठीच्या पाण्याचा प्रश्न बिकट होणार आहे.

गेल्या तीन-चार वर्षांपासून महाराष्ट्रात पाणीबाणी निर्माण होत असताना, धरणे कोरडी ठाक पडत असताना कोल्हापुरात मात्र मे महिन्याच्या कडक उन्हाळ्यातही धरणांत मुबलक साठा दिसत असे; पण यावर्षी कडक उन्हाळा आणि वळीव पावसाने दिलेल्या हुलकावणीमुळे धरणांतील पाण्याचा विसर्ग वाढला शिवाय उन्हामुळे बाष्पीभवनात वाढ झाल्याचाही फटका पाणीसाठ्यावर झाला आहे. अवघ्या दहा दिवसांत या चारही प्रमुख धरणांतील साठा निम्म्याने कमी झाला आहे. गतवर्षीच्या आजच्या दिवशी या धरणांमधील साठा आजच्यापेक्षा चौपटीने जास्त होता. यावरून पाणीटंचाईची तीव्रता लक्षात येते.धरणांतील विसर्ग कमीपाणीसाठा झपाट्याने कमी झाल्याने त्याचा विसर्गावरही परिणाम झाला आहे. संभाव्य टंचाई लक्षात घेऊन नदीपात्रात पाणी सोडण्यास पाटबंधारे विभागाने हात आखडता घेतला आहे. ‘राधानगरी’तून आजच्या घडीला केवळ ६१, तर ‘तुळशी’तून २२ घनफूट वगळता वारणा, काळम्मावाडी, कासारी, कडवी, कुंभीतून विसर्ग पूर्णपणे थांबविण्यात आला आहे. २५ मे ते १० जून या कालावधीत केवळ ६२४ दशलक्ष घनफूट इतकेच कमी पाणी सोडण्यात येणार आहे.लघुप्रकल्पही कोरडेजिल्ह्यात पाटबंधारे विभागाच्या दक्षिण विभागांतर्गत ३१, तर उत्तर विभागांतर्गत ५४ लघुप्रकल्प येतात. मोठ्या धरणांतून ज्यांना पाणी मिळत नाही, त्यांना या लघुप्रकल्पांचा हातभार लागतो; पण हे प्रकल्पही कोरडे पडत आहेत. आज एकूण ८५ प्रकल्पांत केवळ १५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी हेच प्रमाण २६ टक्क्यांच्याही पुढे होते.खरीप पेरण्या लांबणीवरवळवाने फिरविलेली पाठ, कोरडे तलाव, आटत चाललेल्या विहिरी आणि आता धरणांनीही तळ गाठल्याने सध्या शेतीसाठीच्या पाण्याची मोठी समस्या जिल्ह्यात निर्माण होत आहे. उसाचेच क्षेत्र जास्त असल्याने उपलब्ध पाण्यातून पीक वाचविण्याचे मोठे संकट आहे. मान्सून उशिरा येणार असल्याने आणि पाणीच उपलब्ध होणार नसल्याने खरीप पेरण्यांवर याचा परिणाम होणार आहे.प्रमुख चार धरणांतील पाणीसाठा (टीएमसीमध्ये)धरण आजचा गतवर्षी याच दिवशीचाराधानगरी ०.८६ २.२७तुळशी ०.९० १.३२वारणा ३.०५ ७.८१काळम्मावाडी १.५७ ५.३६

टॅग्स :water shortageपाणीटंचाईkolhapurकोल्हापूरwater transportजलवाहतूक