शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

जलसंपदा विभागाकडून पाणी कपातीचे धोरण

By admin | Updated: November 10, 2015 23:52 IST

सूक्ष्म जलसिंचनाच्या वापराची गरज : शेतकऱ्यांना खोडवा ऊस न ठेवता कडधान्ये घेण्याचे आवाहन

जयसिंगपूर : कोयना धरण क्षेत्रात यंदाच्या वर्षी पाऊस कमी झाल्याने धरणातील पाणीसाठ्याची पातळी कमी-जास्त प्रमाणात झाली आहे. शिल्लक पाणीसाठा वर्षभर पुरेसा ठेवण्यासाठी तलाठी कार्यालयात जलसंपदा कार्यालयाकडून जाहीर निवेदन दिले आहे. शेतकऱ्यांनी तुटून गेलेल्या लागण उसाचा खोडवा न ठेवता कमी पाण्यावरील अन्नधान्ये, कडधान्ये घेण्याची विनंतीवजा सूचना केली आहे. तसेच उभ्या पिकासाठी आधुनिक सूक्ष्म जलसिंचनाचा वापर करावा, बारमाही पीक केल्यामुळे पिकाचे नुकसान झाल्यास सांगली पाटबंधारे विभाग जबाबदार राहणार नाही, असेही निवेदनात म्हटले आहे. चालू वर्षी पाऊस कमी झाल्याने तसेच धरणातील पाण्याची पातळी सुद्धा कमी होत गेली आहे. नद्यांचे पाणी प्रदूषित होत असल्यामुळे पाणीसाठा असूनही ते पिण्यासाठी वापरता येत नाही, अशी परिस्थिती आहे. कोयना धरणातील पाणी पातळीत घट निर्माण होत आहे. सध्या नद्यांच्या पाण्याची पातळी कमी-जास्त होत असली तरी शिल्लक पाणी साठ्याचे नियोजन काटेकोरपणे होणे आवश्यक आहे. सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाने नदीकाठच्या शेतकऱ्यासह जलसिंचन योजना संस्थेला पाणी टंचाईबाबत जाहीर प्रकटनाद्वारे सूचना दिल्या आहेत. आगामी काळात ऊस पिकाबरोबर अन्य पिकांना वेळेत पाणी मिळणार नाही. यामध्ये सध्या तुटून गेलेल्या उसाच्या लागणीचा खोडवा ऊस न ठेवता तीन महिन्यांची कडधान्ये करण्याची विनंती शेतकऱ्यांना केली आहे. यावर्षी पाण्याची कमतरता भासणार असून त्यामुळे शेतकऱ्यांनी ऊस पीक कमी करून अन्नधान्य व कडधान्ये करण्याबाबत सुचविण्यात आले आहे. उभ्या पिकासाठी आधुनिक सूक्ष्म जलसिंचनाच्या सोयी करून पिकांना पाणी द्यावे, अन्यथा पाणी कपात झाल्यास उभे पीक धोक्यात येण्याची शक्यता विभागाने वर्तवली आहे. यामुळे तालुक्यातील कृष्णा नदीवर अवलंबून असणाऱ्या साखर पट्ट्यात असणाऱ्या शेकडो शेतकऱ्यांची हजारो हेक्टर क्षेत्र असणारी शेती संकटात सापडण्याची शक्यता आहे. या पुढील काळातही शासनाने शेती पिकाबरोबर, उद्योग व्यवसाय तसेच नागरिकांना पिण्याच्या पाण्याबाबत काटकसर व बचतीबाबत जागृती करावी लागणार आहे. (प्रतिनिधी)