शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

जलसंपदा विभागाकडून पाणी कपातीचे धोरण

By admin | Updated: November 10, 2015 23:52 IST

सूक्ष्म जलसिंचनाच्या वापराची गरज : शेतकऱ्यांना खोडवा ऊस न ठेवता कडधान्ये घेण्याचे आवाहन

जयसिंगपूर : कोयना धरण क्षेत्रात यंदाच्या वर्षी पाऊस कमी झाल्याने धरणातील पाणीसाठ्याची पातळी कमी-जास्त प्रमाणात झाली आहे. शिल्लक पाणीसाठा वर्षभर पुरेसा ठेवण्यासाठी तलाठी कार्यालयात जलसंपदा कार्यालयाकडून जाहीर निवेदन दिले आहे. शेतकऱ्यांनी तुटून गेलेल्या लागण उसाचा खोडवा न ठेवता कमी पाण्यावरील अन्नधान्ये, कडधान्ये घेण्याची विनंतीवजा सूचना केली आहे. तसेच उभ्या पिकासाठी आधुनिक सूक्ष्म जलसिंचनाचा वापर करावा, बारमाही पीक केल्यामुळे पिकाचे नुकसान झाल्यास सांगली पाटबंधारे विभाग जबाबदार राहणार नाही, असेही निवेदनात म्हटले आहे. चालू वर्षी पाऊस कमी झाल्याने तसेच धरणातील पाण्याची पातळी सुद्धा कमी होत गेली आहे. नद्यांचे पाणी प्रदूषित होत असल्यामुळे पाणीसाठा असूनही ते पिण्यासाठी वापरता येत नाही, अशी परिस्थिती आहे. कोयना धरणातील पाणी पातळीत घट निर्माण होत आहे. सध्या नद्यांच्या पाण्याची पातळी कमी-जास्त होत असली तरी शिल्लक पाणी साठ्याचे नियोजन काटेकोरपणे होणे आवश्यक आहे. सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाने नदीकाठच्या शेतकऱ्यासह जलसिंचन योजना संस्थेला पाणी टंचाईबाबत जाहीर प्रकटनाद्वारे सूचना दिल्या आहेत. आगामी काळात ऊस पिकाबरोबर अन्य पिकांना वेळेत पाणी मिळणार नाही. यामध्ये सध्या तुटून गेलेल्या उसाच्या लागणीचा खोडवा ऊस न ठेवता तीन महिन्यांची कडधान्ये करण्याची विनंती शेतकऱ्यांना केली आहे. यावर्षी पाण्याची कमतरता भासणार असून त्यामुळे शेतकऱ्यांनी ऊस पीक कमी करून अन्नधान्य व कडधान्ये करण्याबाबत सुचविण्यात आले आहे. उभ्या पिकासाठी आधुनिक सूक्ष्म जलसिंचनाच्या सोयी करून पिकांना पाणी द्यावे, अन्यथा पाणी कपात झाल्यास उभे पीक धोक्यात येण्याची शक्यता विभागाने वर्तवली आहे. यामुळे तालुक्यातील कृष्णा नदीवर अवलंबून असणाऱ्या साखर पट्ट्यात असणाऱ्या शेकडो शेतकऱ्यांची हजारो हेक्टर क्षेत्र असणारी शेती संकटात सापडण्याची शक्यता आहे. या पुढील काळातही शासनाने शेती पिकाबरोबर, उद्योग व्यवसाय तसेच नागरिकांना पिण्याच्या पाण्याबाबत काटकसर व बचतीबाबत जागृती करावी लागणार आहे. (प्रतिनिधी)