शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

वारकऱ्यांना चंद्रभागेचे वाळवंटच हवे

By admin | Updated: July 18, 2015 00:17 IST

आंदोलनाचा इशारा : सोलापूर जिल्हा प्रवेशापर्यंत सरकारला ‘डेडलाईन’

खंडाळा/ लोणंद : पंढरपूर येथे चंद्रभागेच्या वाळवंटात वारकऱ्यांची व्यवस्था होण्यासाठी सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी वारकऱ्यांनी केली आहे. पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी शासनाने निर्णय न घेतल्यास वारकरी तीव्र आंदोलन करतील, असा इशारा दिंडीप्रमुखांच्या बैठकीत देण्यात आला.न्यायालयाच्या आदेशानुसार चंद्रभागा नदीच्या वाळवंटात वारकऱ्यांच्या व्यवस्थेला बंदी घालण्यात आली आहे. याबाबत सरकारने वारकऱ्यांच्या बाजूने भूमिका मांडावी. पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी या बैठकीत करण्यात आली.संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या आळंदी ते पंढरपूर वारीच्या परंपरागत प्रथा कायम ठेवण्यात येतील. ज्या गावांना ग्रामप्रदक्षिणांचे मान देण्यात आले आहेत, ते अबाधित राहतील, असे या बैठकीत सांगण्यात आले. माउलींच्या लोणंद मुक्कामी पालखी तळावर श्रीमंत शितोळे सरकार यांच्या पालासमोर पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांच्यासमवेत सर्व दिंडीप्रमुखांची बैठक झाली. यावेळी पालखी सोहळ्याचे प्रमुख शामसुंदर मुळे, विश्वस्त प्रशांत सुरू, राजाभाऊ चोपदार, रामभाऊ चोपदार, दिंडी समाजाचे अध्यक्ष भानुदास ढवळीकर, देवस्थान कमिटीचे अध्यक्ष मारुती कोकाटे, माउली जळगावकर, राणूमहाराज वास्कर, नामदेवमहाराज वास्कर यांच्यासह दिंडीप्रमुख उपस्थित होते. माउलींच्या वारीमध्ये वाल्हे, माळशिरस यांसारख्या गावांना ग्रामप्रदक्षिणेचे मान दिलेले आहेत. यावर्षी वाल्ह्यातून प्रदक्षिणा घेण्याबाबत मतभेद निर्माण झाले होते. मात्र, श्रीमंत शितोळे सरकारच्या मध्यस्थीने पूर्वीची प्रथा कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे माळशिरस येथील प्रदक्षिणेचा मार्ग मोकळा झाला आहे. (प्रतिनिधी/ वार्ताहर)