शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

Maharashtra Election 2019 : आयजी, एसपींची मतदान केंद्रांना भेटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 18:46 IST

विधानसभा निवडणुकीचे मतदान सोमवारी पार पडले. परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी शहर व ग्रामीण भागातील काही संवेदनशील मतदान केंद्रांना भेटी देऊन मतदान प्रक्रियेची माहिती घेतली. मतदार प्रक्रिया संपेपर्यंत ते यंत्रणेकडून माहिती घेत होते. निवडणूक मतदान प्रक्रिया संपेपर्यंत बंदोबस्तासाठी सुमारे साडेपाच हजार पोलिसांनी मेहनत घेतली.

ठळक मुद्देआयजी, एसपींची मतदान केंद्रांना भेटीसाडेपाच हजार पोलिसांनी बंदोबस्तासाठी घेतली मेहनत

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीचे मतदान सोमवारी पार पडले. परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी शहर व ग्रामीण भागातील काही संवेदनशील मतदान केंद्रांना भेटी देऊन मतदान प्रक्रियेची माहिती घेतली. मतदार प्रक्रिया संपेपर्यंत ते यंत्रणेकडून माहिती घेत होते. निवडणूक मतदान प्रक्रिया संपेपर्यंत बंदोबस्तासाठी सुमारे साडेपाच हजार पोलिसांनी मेहनत घेतली.विधानसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने दोन महिन्यांपूर्वीच तयारी सुरू केली होती. आचारसंहिता लागताच पोलीस प्रशासनाच्या आठ ते दहा बैठका बंदोबस्तासाठी घेण्यात आल्या. प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुखमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्यासह मातब्बर नेत्यांच्या सभा कोल्हापुरात झाल्या. या सभांना कोठेही गालबोट लागू दिले नाही.

दहा विधानसभा मतदारसंघांत पोलिसांचे सशस्त्र संचलन करून निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन नागरिकांना केले. मतदान प्रक्रियेसाठी ओडिशा, कर्नाटक, मुंबई, दौंड, पुणे रेल्वे येथून ९०० पोलीस व १० केंद्रीय जवानांच्या कंपन्या दाखल झाल्या. संवेदनशील ७० केंद्रांवर हे जवान तैनात केले होते. विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. वारके, पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी कसबा बावडा येथील मतदान केंद्रावर सकाळी भेट देऊन पाहणी केली. येथील बंदोबस्ताला असणाऱ्या जवानांना सूचनाही केल्या. त्यानंतर शहरासह ग्रामीण भागातील काही संवेदनशील केंद्रांना भेटी दिल्या. दिवसभर ते वॉकीटॉकीवरून जिल्ह्यातील परिस्थितीची माहिती घेत होते.शनिवारी (दि. १९) सायंकाळी पाचच्या सुमारास १० मतदारसंघांनुसार बंदोबस्ताचे वाटप करून तो रवाना केला होता. रविवार आणि सोमवार असे दिवस-रात्र सुमारे साडेपाच हजार पोलीस जिल्ह्यावर लक्ष ठेवून होते. इचलकरंजी, कोल्हापूर दक्षिण, जयसिंगपूर, कागल, मुरगूड, शाहूवाडी, कोडोली, पन्हाळा, आदी ठिकाणी अप्पर पोलीस अधीक्षकांसह उपअधीक्षकांच्या टीमने भेटी देऊन पाहणी केली. सकाळपासून मतदान केंद्रावर व परिसरात पोलीस अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून होते. मतदान केंद्राच्या १०० व २०० मीटर परिसरामध्ये जमावबंदी आदेश लागू केला असल्याने कार्यकर्त्यांची गर्दी होऊ दिली नव्हती.मतदान केंद्रांना सशस्त्र सुरक्षामतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गावागावांत बंदोबस्ताला असणारे पोलीस मतदान केंद्रावर सतर्क दिसत होते. मतदारांच्या रांगा लावण्यापासून त्यांना आतमध्ये सोडण्यापर्यंतची सर्व जबाबदारी पोलीस कर्मचारी पार पाडत होते. चौकाचौकांत उमेदवारांचे कार्यकर्ते गर्दी करून होते. त्यांच्यात वादावादीचे प्रकार होऊन कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पोलीस गर्दीच्या ठिकाणी फिरुन अंदाज घेत होते. पोलिसांचा फौजफाटा सतर्क असल्याने वादावादी करण्याचे धाडस कोणी केले नाही. मतपेट्या जमा करण्यापर्यंतची सर्वस्वी जबाबदारी पोलिसांनी पार पाडली.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Policeपोलिसkolhapurकोल्हापूर