शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह आणि एकनाथ शिंदेंमध्ये ५० मिनिटे बैठक; रवींद्र चव्हाणांबाबत तक्रारीचा सूर, काय घडलं?
2
दिल्लीत तक्रार अन् मुंबईत डिल? उपमुख्यमंत्री पदासाठी शिंदेचा नेता भाजपशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नात, अंधारेंचा दावा
3
Ashish Shelar:... तर मुंबईत अजित पवार गटाशी युती करणार नाही, आशिष शेलार यांचा इशारा!
4
SBI मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४१,८२६ चं फिक्स व्याज; परताव्याची गॅरंटी
5
आजचे राशीभविष्य - २० नोव्हेंबर २०२५, 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आज लाभदायी दिवस, शेअर-सट्टा ह्यात धनलाभ होईल
6
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
7
Dombivli: डोंबिवलीत भाजप मजबूत, मनसेच्या माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेने टाकले जाळे!
8
Ulhasnagar: पक्षांतर करणाऱ्यांच्या फोटोला आधी फासले काळे; नंतर सन्मानाने स्थान!
9
India- Israel: भारत-इस्रायलचे संबंध आणखी होणार वृद्धिंगत!
10
Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात सात नक्षलवाद्यांचा खात्मा, ५० जणांना अटक; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
11
Palghar: पालघरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून मुलं लपली जंगलात, मग पुढं काय घडलं?
12
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
13
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
14
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
15
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
16
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
17
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
18
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
19
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
20
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : आयजी, एसपींची मतदान केंद्रांना भेटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 18:46 IST

विधानसभा निवडणुकीचे मतदान सोमवारी पार पडले. परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी शहर व ग्रामीण भागातील काही संवेदनशील मतदान केंद्रांना भेटी देऊन मतदान प्रक्रियेची माहिती घेतली. मतदार प्रक्रिया संपेपर्यंत ते यंत्रणेकडून माहिती घेत होते. निवडणूक मतदान प्रक्रिया संपेपर्यंत बंदोबस्तासाठी सुमारे साडेपाच हजार पोलिसांनी मेहनत घेतली.

ठळक मुद्देआयजी, एसपींची मतदान केंद्रांना भेटीसाडेपाच हजार पोलिसांनी बंदोबस्तासाठी घेतली मेहनत

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीचे मतदान सोमवारी पार पडले. परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी शहर व ग्रामीण भागातील काही संवेदनशील मतदान केंद्रांना भेटी देऊन मतदान प्रक्रियेची माहिती घेतली. मतदार प्रक्रिया संपेपर्यंत ते यंत्रणेकडून माहिती घेत होते. निवडणूक मतदान प्रक्रिया संपेपर्यंत बंदोबस्तासाठी सुमारे साडेपाच हजार पोलिसांनी मेहनत घेतली.विधानसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने दोन महिन्यांपूर्वीच तयारी सुरू केली होती. आचारसंहिता लागताच पोलीस प्रशासनाच्या आठ ते दहा बैठका बंदोबस्तासाठी घेण्यात आल्या. प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुखमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्यासह मातब्बर नेत्यांच्या सभा कोल्हापुरात झाल्या. या सभांना कोठेही गालबोट लागू दिले नाही.

दहा विधानसभा मतदारसंघांत पोलिसांचे सशस्त्र संचलन करून निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन नागरिकांना केले. मतदान प्रक्रियेसाठी ओडिशा, कर्नाटक, मुंबई, दौंड, पुणे रेल्वे येथून ९०० पोलीस व १० केंद्रीय जवानांच्या कंपन्या दाखल झाल्या. संवेदनशील ७० केंद्रांवर हे जवान तैनात केले होते. विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. वारके, पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी कसबा बावडा येथील मतदान केंद्रावर सकाळी भेट देऊन पाहणी केली. येथील बंदोबस्ताला असणाऱ्या जवानांना सूचनाही केल्या. त्यानंतर शहरासह ग्रामीण भागातील काही संवेदनशील केंद्रांना भेटी दिल्या. दिवसभर ते वॉकीटॉकीवरून जिल्ह्यातील परिस्थितीची माहिती घेत होते.शनिवारी (दि. १९) सायंकाळी पाचच्या सुमारास १० मतदारसंघांनुसार बंदोबस्ताचे वाटप करून तो रवाना केला होता. रविवार आणि सोमवार असे दिवस-रात्र सुमारे साडेपाच हजार पोलीस जिल्ह्यावर लक्ष ठेवून होते. इचलकरंजी, कोल्हापूर दक्षिण, जयसिंगपूर, कागल, मुरगूड, शाहूवाडी, कोडोली, पन्हाळा, आदी ठिकाणी अप्पर पोलीस अधीक्षकांसह उपअधीक्षकांच्या टीमने भेटी देऊन पाहणी केली. सकाळपासून मतदान केंद्रावर व परिसरात पोलीस अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून होते. मतदान केंद्राच्या १०० व २०० मीटर परिसरामध्ये जमावबंदी आदेश लागू केला असल्याने कार्यकर्त्यांची गर्दी होऊ दिली नव्हती.मतदान केंद्रांना सशस्त्र सुरक्षामतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गावागावांत बंदोबस्ताला असणारे पोलीस मतदान केंद्रावर सतर्क दिसत होते. मतदारांच्या रांगा लावण्यापासून त्यांना आतमध्ये सोडण्यापर्यंतची सर्व जबाबदारी पोलीस कर्मचारी पार पाडत होते. चौकाचौकांत उमेदवारांचे कार्यकर्ते गर्दी करून होते. त्यांच्यात वादावादीचे प्रकार होऊन कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पोलीस गर्दीच्या ठिकाणी फिरुन अंदाज घेत होते. पोलिसांचा फौजफाटा सतर्क असल्याने वादावादी करण्याचे धाडस कोणी केले नाही. मतपेट्या जमा करण्यापर्यंतची सर्वस्वी जबाबदारी पोलिसांनी पार पाडली.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Policeपोलिसkolhapurकोल्हापूर