शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
4
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
5
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
6
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
7
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
8
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
9
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
10
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
11
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
12
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
13
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
14
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
15
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
16
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
17
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
18
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
19
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
20
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
Daily Top 2Weekly Top 5

विशाळगड कात टाकतोय बुरुज, कमानींची उभारणी : शिवकालीन साक्षीदारांची पुनर्बांधणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 23:53 IST

स्वराज्यातील जाज्वल्य इतिहास आणि सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या किल्ले विशाळगडावरील शिवकालीन साक्षीदारांची पुनर्बांधणी होत आहे. शासनाच्या पर्यटन विकास निधीतून पाच कोटी रुपये बुरुजांच्या व दक्षिण कमानीच्या उभारणीसाठी उपलब्ध आहेत. गडाच्या प्रथमदर्शनीच्या बुरुजांची काळाच्या ओघात पडझड

ठळक मुद्देदर्गा कमानी व भगवा चौक बहरला. यातून ऐतिहासिक वास्तूचे वैभव खुलले आहे

आंबा : स्वराज्यातील जाज्वल्य इतिहास आणि सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या किल्ले विशाळगडावरील शिवकालीन साक्षीदारांची पुनर्बांधणी होत आहे. शासनाच्या पर्यटन विकास निधीतून पाच कोटी रुपये बुरुजांच्या व दक्षिण कमानीच्या उभारणीसाठी उपलब्ध आहेत. गडाच्या प्रथमदर्शनीच्या बुरुजांची काळाच्या ओघात पडझड झाली होती. बुरुजांचे घडीव दगड कोसळत होते. पावसाळ्यात बुरुजाखालून जाणे जीवघेणे ठरले होते.

कमानीही निखळल्या होत्या. त्यामुळे गडाचा तोंडावळा गायब झाला होता. सध्या या बुरुजांची बांधणी अंतिम टप्प्यात आल्याने गडाचा बाज साकारला आहे. तीन वर्षांपूर्वी प्रथमदर्शनीचा मुंडा दरवाजा व त्याला सलग्न असलेले दोन बुरूज बांधले गेले. शेजारी बेवारस अवस्थेत पडलेल्या तोफेला चौथरा करून ती सुरक्षित ठेवली आहे. यामुळे रणमंडळ टेकडीचा बाज बहरला आहे. गडावर जाणाऱ्या अरुंद सिडीच्या रस्त्याला पर्याय म्हणून उजव्या बाजूने पायºयांचा रुंद रस्ता, खंदकावरील सिमेंटचा पूल, भगवंतेश्वर मंदिराकडे जाणाºया मार्गाची दुरुस्ती झाली. गडावरील भगवंतेशवर मंदिरासह राममंदिर, भावकाई मंदिर, गणेश मंदिर, मलिक रेहान बाबांचा दर्गा यांचा जीर्णोद्धार झाला. अमृतेश्वर मंदिरासमोरील पाण्याचे टाके पुनर्जीवित केले. बाजीप्रभू व फुलाजींची समाधिस्थळे सुशोभित केली आहेत.

दर्गा कमानी व भगवा चौक बहरला. यातून ऐतिहासिक वास्तूचे वैभव खुलले आहे. गड आणि पायथ्यावर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी बाजीप्रभू जलाशयातून (गजापूर) वाढीव पाणीपुरवठा योजनेला ग्रामपंचायतीने मंजुरी आणली आहे. त्याला निधी मिळून ती तातडीने होण्याची गरज आहे. अनेक दशके केंबुर्णेवाडी ते विशाळगड हा रस्ता निधीअभावी धुळीत होता. गेल्या वर्षी रस्ता डांबरीकरण होऊन पावनखिंडीकडून येणारा रस्ता व घाट यांचे दीड वर्षात बांधकाम गतिमान झाले आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे दुरावलेला पर्यटक पुन्हा इकडे वळू लागला आहे.

गेल्या पाच वर्षांपासून विशाळगडसह पावनखिंडीच्या विकासाला शासकीय निधी मिळू लागल्याने गडाचे व खिंडीचे अस्तित्व पुन्हा नजरेत भरू लागले आहे. पावनखिंडीतही पार्किंगसह नरवीर बाजीप्रभंूच्या पराक्रमांची साक्ष देणारे स्मारक, खिंडीत उतरण्यास दगडी पायºया, तसेच सुरक्षिततेसाठी कठडे उभारले आहेत. खिंडीकडे वळणाºया रस्त्यावरच दगडी निशाण चबुतरा, अर्धगोलाकार स्वागत कठडे उभारल्याने पावनखिंडीकडेपर्यटकांचे पाय वळत आहेत. येथे सर्वत्र पाण्याचे झरे आहेत. पाऊसही मोठा होतो. या परिसरात बंधाºयाचे बांधकाम करण्यासाठी सर्वेक्षण झाले आहे. वृक्षलागवड, जलाशय, बगीचा, पदभ्रमंतीतील धारकºयांना निवास व्यवस्था, सभागृह व स्वच्छतागृह यांच्या बांधकामाचेही प्रस्ताव झाले आहेत.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेनुसार राबलेले ‘आडवाटेवरचे पर्यटन’ यामध्ये पांढरेपाणी व पावनखिंड यांचा समावेश केला आहे. आता येथील प्रलंबित प्रस्तावांना निधी देण्याचे पालकत्व सांभाळावे, असा येथील भूमिपुत्रांचा आग्रह आहे.राजवाडा अर्धवटच...गडावरील भगवंतेश्वर मंदिरामागील पंतप्रतिनिधीचा राजवाडा हे गडाचे वैभव होते. हा वाडा भुईसपाट झाला होता. त्याला लागूनच पाण्याचा हौद व चंद्रकोर विहीर ही शिवकालीन पाण्याचे मोठे स्रोत आहेत; पण याकडे सर्वांचेच दुर्लक्ष आहे. राजवाडा पूर्ण झाला तर येथील हे पाणीस्रोत जपले जातील. प्राचीन बांधकामाचे हे दोन स्रोत ठेवाच आहे. मुंढा दरवाजाच्या बांधकामाबरोबर राजवाड्याचे बांधकाम सुरू झाले. चौथरे उभारले गेले; पण पुन्हा या बांधकामाला ‘खो’ बसला. या बांधकामास निधी मिळावा, अशी मागणी शिवाजी तरुण मंडळ व विशाळगडवासीयांनी केली आहे.

टॅग्स :Fortगडkolhapurकोल्हापूर