शहरं
Join us  
Trending Stories
1
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीसांनी म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
2
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
3
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
4
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
5
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
6
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
7
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
8
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
9
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
10
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
11
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
12
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!
13
चेक क्लिअरन्स आता एका दिवसातच! 'या' तारखेपासून नवा नियम लागू, जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा
14
Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"
15
Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
16
कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले
17
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
18
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
19
आयआयटी कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याला नग्न करून चप्पलांनी मारहाण; ३ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल, वॉर्डन निलंबित
20
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?

विशाळगड कात टाकतोय बुरुज, कमानींची उभारणी : शिवकालीन साक्षीदारांची पुनर्बांधणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 23:53 IST

स्वराज्यातील जाज्वल्य इतिहास आणि सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या किल्ले विशाळगडावरील शिवकालीन साक्षीदारांची पुनर्बांधणी होत आहे. शासनाच्या पर्यटन विकास निधीतून पाच कोटी रुपये बुरुजांच्या व दक्षिण कमानीच्या उभारणीसाठी उपलब्ध आहेत. गडाच्या प्रथमदर्शनीच्या बुरुजांची काळाच्या ओघात पडझड

ठळक मुद्देदर्गा कमानी व भगवा चौक बहरला. यातून ऐतिहासिक वास्तूचे वैभव खुलले आहे

आंबा : स्वराज्यातील जाज्वल्य इतिहास आणि सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या किल्ले विशाळगडावरील शिवकालीन साक्षीदारांची पुनर्बांधणी होत आहे. शासनाच्या पर्यटन विकास निधीतून पाच कोटी रुपये बुरुजांच्या व दक्षिण कमानीच्या उभारणीसाठी उपलब्ध आहेत. गडाच्या प्रथमदर्शनीच्या बुरुजांची काळाच्या ओघात पडझड झाली होती. बुरुजांचे घडीव दगड कोसळत होते. पावसाळ्यात बुरुजाखालून जाणे जीवघेणे ठरले होते.

कमानीही निखळल्या होत्या. त्यामुळे गडाचा तोंडावळा गायब झाला होता. सध्या या बुरुजांची बांधणी अंतिम टप्प्यात आल्याने गडाचा बाज साकारला आहे. तीन वर्षांपूर्वी प्रथमदर्शनीचा मुंडा दरवाजा व त्याला सलग्न असलेले दोन बुरूज बांधले गेले. शेजारी बेवारस अवस्थेत पडलेल्या तोफेला चौथरा करून ती सुरक्षित ठेवली आहे. यामुळे रणमंडळ टेकडीचा बाज बहरला आहे. गडावर जाणाऱ्या अरुंद सिडीच्या रस्त्याला पर्याय म्हणून उजव्या बाजूने पायºयांचा रुंद रस्ता, खंदकावरील सिमेंटचा पूल, भगवंतेश्वर मंदिराकडे जाणाºया मार्गाची दुरुस्ती झाली. गडावरील भगवंतेशवर मंदिरासह राममंदिर, भावकाई मंदिर, गणेश मंदिर, मलिक रेहान बाबांचा दर्गा यांचा जीर्णोद्धार झाला. अमृतेश्वर मंदिरासमोरील पाण्याचे टाके पुनर्जीवित केले. बाजीप्रभू व फुलाजींची समाधिस्थळे सुशोभित केली आहेत.

दर्गा कमानी व भगवा चौक बहरला. यातून ऐतिहासिक वास्तूचे वैभव खुलले आहे. गड आणि पायथ्यावर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी बाजीप्रभू जलाशयातून (गजापूर) वाढीव पाणीपुरवठा योजनेला ग्रामपंचायतीने मंजुरी आणली आहे. त्याला निधी मिळून ती तातडीने होण्याची गरज आहे. अनेक दशके केंबुर्णेवाडी ते विशाळगड हा रस्ता निधीअभावी धुळीत होता. गेल्या वर्षी रस्ता डांबरीकरण होऊन पावनखिंडीकडून येणारा रस्ता व घाट यांचे दीड वर्षात बांधकाम गतिमान झाले आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे दुरावलेला पर्यटक पुन्हा इकडे वळू लागला आहे.

गेल्या पाच वर्षांपासून विशाळगडसह पावनखिंडीच्या विकासाला शासकीय निधी मिळू लागल्याने गडाचे व खिंडीचे अस्तित्व पुन्हा नजरेत भरू लागले आहे. पावनखिंडीतही पार्किंगसह नरवीर बाजीप्रभंूच्या पराक्रमांची साक्ष देणारे स्मारक, खिंडीत उतरण्यास दगडी पायºया, तसेच सुरक्षिततेसाठी कठडे उभारले आहेत. खिंडीकडे वळणाºया रस्त्यावरच दगडी निशाण चबुतरा, अर्धगोलाकार स्वागत कठडे उभारल्याने पावनखिंडीकडेपर्यटकांचे पाय वळत आहेत. येथे सर्वत्र पाण्याचे झरे आहेत. पाऊसही मोठा होतो. या परिसरात बंधाºयाचे बांधकाम करण्यासाठी सर्वेक्षण झाले आहे. वृक्षलागवड, जलाशय, बगीचा, पदभ्रमंतीतील धारकºयांना निवास व्यवस्था, सभागृह व स्वच्छतागृह यांच्या बांधकामाचेही प्रस्ताव झाले आहेत.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेनुसार राबलेले ‘आडवाटेवरचे पर्यटन’ यामध्ये पांढरेपाणी व पावनखिंड यांचा समावेश केला आहे. आता येथील प्रलंबित प्रस्तावांना निधी देण्याचे पालकत्व सांभाळावे, असा येथील भूमिपुत्रांचा आग्रह आहे.राजवाडा अर्धवटच...गडावरील भगवंतेश्वर मंदिरामागील पंतप्रतिनिधीचा राजवाडा हे गडाचे वैभव होते. हा वाडा भुईसपाट झाला होता. त्याला लागूनच पाण्याचा हौद व चंद्रकोर विहीर ही शिवकालीन पाण्याचे मोठे स्रोत आहेत; पण याकडे सर्वांचेच दुर्लक्ष आहे. राजवाडा पूर्ण झाला तर येथील हे पाणीस्रोत जपले जातील. प्राचीन बांधकामाचे हे दोन स्रोत ठेवाच आहे. मुंढा दरवाजाच्या बांधकामाबरोबर राजवाड्याचे बांधकाम सुरू झाले. चौथरे उभारले गेले; पण पुन्हा या बांधकामाला ‘खो’ बसला. या बांधकामास निधी मिळावा, अशी मागणी शिवाजी तरुण मंडळ व विशाळगडवासीयांनी केली आहे.

टॅग्स :Fortगडkolhapurकोल्हापूर