शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
3
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
4
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
5
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
6
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
7
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
8
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
9
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
10
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
11
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
12
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
13
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
14
फायद्याची गोष्ट! स्टील, अ‍ॅल्युमिनियम की लोखंड... स्वयंपाकासाठी कोणतं भांडं सर्वात बेस्ट?
15
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
16
"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक
17
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
18
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश
19
Navratri 2025: अष्टमी-नवमीला 'या' दिशेला दिवा लावा; अखंड दिवा लावण्याचे लाभ मिळतील 
20
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली

Kolhapur: गेली २० वर्षे पंचगंगेचे प्रदूषण करणारी गावेच ठरेनात, शास्त्रशुद्ध तपासणी नसल्याने प्रस्ताव नाकारुन परत

By समीर देशपांडे | Updated: June 19, 2024 13:22 IST

समीर देशपांडे कोल्हापूर : गेली २० वर्षे पंचगंगेचे प्रदूषण करणारी गावे किती आहेत हेच जिल्हा परिषदेला ठरवता आलेले नाही. ...

समीर देशपांडेकोल्हापूर : गेली २० वर्षे पंचगंगेचे प्रदूषण करणारी गावे किती आहेत हेच जिल्हा परिषदेला ठरवता आलेले नाही. मग उपाययोजना कशी करणार, असा सवाल उपस्थित होत आहे. अव्वाच्या सव्वा गावांची संख्या घालून प्रस्ताव पाठवले गेले आणि ते नाकारून परत आले. नेमक्या किती गावांमुळे प्रदूषण होते याची शास्त्रशुद्ध तपासणी करून मगच निधीची मागणी करण्याची गरज असताना अधिकारी बैठकीत ठरल्याप्रमाणे नुसते प्रस्तावावर प्रस्ताव पाठवत सुटले आहेत.पंचगंगा नदीकाठच्या ३९ गावांमधून विनाप्रक्रिया सांडपाणी नदीत मिसळते आणि त्यामुळे नदीचे प्रदूषण वाढते, असे सांगण्यात येते. परंतु, जिल्हा परिषदेकडून याआधी गावांची संख्या वेगवेगळी सांगितली गेल्याने यामध्ये घोळच होत गेला आहे. कोल्हापूर आणि इचलकरंजीच्या तुलनेत ग्रामीण भागातून कमी सांडपाणी मिसळले जात असताना बोट मात्र या गावांकडे दाखवण्यात येते आणि अधिकारीही गावांची संख्याही बदलून सांगत असल्याने गैरसमजाला बळ मिळाले आहे.तुळशी, कुंभी, कासारी, भोगावती या चार प्रत्यक्षातील आणि दिसून येत नसलेली सरस्वती या नद्यांची मिळून पंचगंगा बनल्याचे मानले जाते. त्यामुळे पंचगंगेच्या प्रदूषणाचे सर्वेक्षण करताना वरील चारही नद्यांच्या काठच्या गावांचेही सर्वेक्षण करण्यात आले. अशा १७१ गावांपैकी ८९ गावांचे सांडपाणी त्या त्या नदीत मिसळते, असे मानले गेले आणि यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पांसाठी शासनाकडे २५२ कोटी ७१ लाख रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली. २१ फेब्रुवारी आणि २३ ऑक्टोबर २०२३ असे दोन वेळा हे प्रस्ताव केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाकडे आणि राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडे पाठवण्यात आले. परंतु, सहा महिन्यांपूर्वी हा प्रस्तावच फेटाळण्यात आला आहे.त्यानंतर आता मोठ्या प्रमाणावर सांडपाणी निर्माण करून नदीत सोडणारी १५ गावे निवडण्यात आली असून, त्यावर प्रक्रिया करण्यासाठी १०० कोटी रुपयांची मागणी करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. आता हा प्रस्ताव मंजूर झाला तर मग पावसाळ्यानंतर या कामांना सुरुवात होऊन पुढील वर्षी कामकाज सुरू होऊन २०२६ मध्ये पंचगंगेत सांडपाणी मिसळणे बंद होऊ शकते. परंतु, त्यासाठी प्रचंड राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे.

पंचगंगेचे प्रदूषण करणारी मुख्य गावेपुलाची शिराेली,  चंदूर,  कबनूर,  कोरोची,  मोरेवाडी,  गांधीनगर,  उचगाव,  गडमुडशिंगी,  कळंबे तर्फ ठाणे,  पाचगाव,  नृसिंहवाडी,  तळंदगे,  रूकडी,  वसगडे, रूई. या गावांमध्ये सर्वाधिक सात गावे ही हातकणंगले तालुक्यातील आहेत. सहा गावे करवीर तालुक्यातील असून, एक गाव शिराेळ तालुक्यातील आहे.

प्रदूषणास जबाबदार तालुकानिहाय गावे

  • करवीर ४२
  • राधानगरी १७
  • हातकणंगले १४
  • पन्हाळा ०६
  • शिरोळ ०५
  • गगनबावडा ०४
  • शाहूवाडी ०१
टॅग्स :kolhapurकोल्हापूरriverनदीpollutionप्रदूषण