शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
2
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
3
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
4
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
5
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
6
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
7
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
8
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
9
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
10
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
11
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
12
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
13
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
14
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
15
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
16
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
17
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
18
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
19
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
20
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...

विधानपरिषदेला विलासराव देशमुख अर्ध्या मताने झाले होते पराभूत; शिवसेनेने केले होते पुरस्कृत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2022 19:05 IST

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी विलासराव देशमुख यांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिली. परंतु माझ्या रक्तातील काँग्रेस तुम्ही कशी काढणार? असे देशमुख यांचे विधान त्यावेळी गाजले होते.

विश्वास पाटीलकोल्हापूर : महाराष्ट्रात सध्या राज्यसभेच्या निवडणुकीची जोरदार चर्चा असून मतांची गणिते मांडली जात आहेत. राज्यसभेसारखीच मतदानाची पध्दत असलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत १९९६ ला विलासराव देशमुख शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून केवळ अर्ध्या मताने पराभूत झाले होते. त्याच्या आठवणी यानिमित्ताने जाग्या झाल्या.या निवडणुका रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट १९५१ व कॉन्डक्ट ऑफ इलेक्शन रूल १९६१ च्या नियमान्वये घेतल्या जातात. राज्यसभेच्या निवडणुकीत मतांचा कोटा व पसंतीक्रम निश्चित करून दिला जातो. पहिल्या पसंतीच्या मतांचा कोटा पूर्ण झाल्यावर उमेदवार विजयी घोषित केला जातो. परंतु तेवढी मते न मिळाल्यास सर्वच उमेदवारांची दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या पसंतीची मते मोजली जातात.चौथ्या पसंतीची मते मोजण्याची वेळ यापूर्वी एकदाच विलासराव देशमुख उमेदवार असलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत आली होती व त्या लढतीत विलासराव अवघ्या अर्ध्या मताने पराभूत झाले होते, अशी आठवण माजी प्रधान सचिव अनंत कळसे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितली.घडले होते ते असे : विलासराव यांच्यासारख्या मातब्बर नेतृत्वाचा विधानसभेच्या १९९५ च्या निवडणुकीत लातूर मतदार संघातून शिवाजीराव कव्हेकर यांनी पराभव केला. त्यानंतर विधानपरिषदेची निवडणूक जाहीर झाली. काँग्रेसने जे विधानसभेला पराभूत झाले, त्यांना विधानपरिषदेला संधी नाही, अशी भूमिका घेतली. परंतु शरद पवार यांनी मात्र छगन भुजबळ यांचे नाव या उमेदवारीसाठी रेटले.म्हणून देशमुख यांनी बंडखोरी केली. (कव्हेकर यांना निवडून आणण्यात पवार यांचाच हात होता, असे देशमुख यांना वाटत होते. म्हणूनच ११ अपक्ष आमदार त्यावेळी त्यांनी शिवसेनेकडे पाठवून दिले होते. त्यातून राज्यात शिवसेनेचे सरकार आले.) त्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेत येण्याची ऑफर दिली. परंतु माझ्या रक्तातील काँग्रेस तुम्ही कशी काढणार? असे देशमुख यांचे विधान त्यावेळी गाजले होते. त्यांनी शिवसेनेचे सहयोगी उमेदवार म्हणून ही निवडणूक लढवली व त्यात अमरावतीच्या राठोड यांच्याकडून त्यांचा पराभव झाला.

पराभवामुळे झालो मुख्यमंत्री...पुढे विधानसभेच्या १९९९ च्या निवडणुकीत विलासराव महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी विजयी झाले आणि १८ ऑक्टोबर १९९९ ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. त्यादिवशी त्यांनी अनंत कळसे यांना जाऊन मिठी मारली व म्हणाले, ‘कळसे, तुम्ही काटेकोर मतमोजणी केल्यामुळे माझा अर्ध्या मताने पराभव झाला. निवडून आलो असतो, तर शिवसेनेचा आमदार म्हणून वावरलो असतो. पराभव झाल्यानेच मी परत काँग्रेसमध्ये सक्रिय झालाे व आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनलो.’

टॅग्स :kolhapurकोल्हापूरVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस