शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
2
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
3
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
5
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
6
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
7
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
8
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
9
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
10
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
11
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
12
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
13
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
14
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
15
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
16
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
17
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
18
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
19
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
20
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

विधानपरिषदेला विलासराव देशमुख अर्ध्या मताने झाले होते पराभूत; शिवसेनेने केले होते पुरस्कृत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2022 19:05 IST

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी विलासराव देशमुख यांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिली. परंतु माझ्या रक्तातील काँग्रेस तुम्ही कशी काढणार? असे देशमुख यांचे विधान त्यावेळी गाजले होते.

विश्वास पाटीलकोल्हापूर : महाराष्ट्रात सध्या राज्यसभेच्या निवडणुकीची जोरदार चर्चा असून मतांची गणिते मांडली जात आहेत. राज्यसभेसारखीच मतदानाची पध्दत असलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत १९९६ ला विलासराव देशमुख शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून केवळ अर्ध्या मताने पराभूत झाले होते. त्याच्या आठवणी यानिमित्ताने जाग्या झाल्या.या निवडणुका रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट १९५१ व कॉन्डक्ट ऑफ इलेक्शन रूल १९६१ च्या नियमान्वये घेतल्या जातात. राज्यसभेच्या निवडणुकीत मतांचा कोटा व पसंतीक्रम निश्चित करून दिला जातो. पहिल्या पसंतीच्या मतांचा कोटा पूर्ण झाल्यावर उमेदवार विजयी घोषित केला जातो. परंतु तेवढी मते न मिळाल्यास सर्वच उमेदवारांची दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या पसंतीची मते मोजली जातात.चौथ्या पसंतीची मते मोजण्याची वेळ यापूर्वी एकदाच विलासराव देशमुख उमेदवार असलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत आली होती व त्या लढतीत विलासराव अवघ्या अर्ध्या मताने पराभूत झाले होते, अशी आठवण माजी प्रधान सचिव अनंत कळसे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितली.घडले होते ते असे : विलासराव यांच्यासारख्या मातब्बर नेतृत्वाचा विधानसभेच्या १९९५ च्या निवडणुकीत लातूर मतदार संघातून शिवाजीराव कव्हेकर यांनी पराभव केला. त्यानंतर विधानपरिषदेची निवडणूक जाहीर झाली. काँग्रेसने जे विधानसभेला पराभूत झाले, त्यांना विधानपरिषदेला संधी नाही, अशी भूमिका घेतली. परंतु शरद पवार यांनी मात्र छगन भुजबळ यांचे नाव या उमेदवारीसाठी रेटले.म्हणून देशमुख यांनी बंडखोरी केली. (कव्हेकर यांना निवडून आणण्यात पवार यांचाच हात होता, असे देशमुख यांना वाटत होते. म्हणूनच ११ अपक्ष आमदार त्यावेळी त्यांनी शिवसेनेकडे पाठवून दिले होते. त्यातून राज्यात शिवसेनेचे सरकार आले.) त्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेत येण्याची ऑफर दिली. परंतु माझ्या रक्तातील काँग्रेस तुम्ही कशी काढणार? असे देशमुख यांचे विधान त्यावेळी गाजले होते. त्यांनी शिवसेनेचे सहयोगी उमेदवार म्हणून ही निवडणूक लढवली व त्यात अमरावतीच्या राठोड यांच्याकडून त्यांचा पराभव झाला.

पराभवामुळे झालो मुख्यमंत्री...पुढे विधानसभेच्या १९९९ च्या निवडणुकीत विलासराव महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी विजयी झाले आणि १८ ऑक्टोबर १९९९ ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. त्यादिवशी त्यांनी अनंत कळसे यांना जाऊन मिठी मारली व म्हणाले, ‘कळसे, तुम्ही काटेकोर मतमोजणी केल्यामुळे माझा अर्ध्या मताने पराभव झाला. निवडून आलो असतो, तर शिवसेनेचा आमदार म्हणून वावरलो असतो. पराभव झाल्यानेच मी परत काँग्रेसमध्ये सक्रिय झालाे व आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनलो.’

टॅग्स :kolhapurकोल्हापूरVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस