शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

विधानपरिषदेला विलासराव देशमुख अर्ध्या मताने झाले होते पराभूत; शिवसेनेने केले होते पुरस्कृत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2022 19:05 IST

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी विलासराव देशमुख यांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिली. परंतु माझ्या रक्तातील काँग्रेस तुम्ही कशी काढणार? असे देशमुख यांचे विधान त्यावेळी गाजले होते.

विश्वास पाटीलकोल्हापूर : महाराष्ट्रात सध्या राज्यसभेच्या निवडणुकीची जोरदार चर्चा असून मतांची गणिते मांडली जात आहेत. राज्यसभेसारखीच मतदानाची पध्दत असलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत १९९६ ला विलासराव देशमुख शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून केवळ अर्ध्या मताने पराभूत झाले होते. त्याच्या आठवणी यानिमित्ताने जाग्या झाल्या.या निवडणुका रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट १९५१ व कॉन्डक्ट ऑफ इलेक्शन रूल १९६१ च्या नियमान्वये घेतल्या जातात. राज्यसभेच्या निवडणुकीत मतांचा कोटा व पसंतीक्रम निश्चित करून दिला जातो. पहिल्या पसंतीच्या मतांचा कोटा पूर्ण झाल्यावर उमेदवार विजयी घोषित केला जातो. परंतु तेवढी मते न मिळाल्यास सर्वच उमेदवारांची दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या पसंतीची मते मोजली जातात.चौथ्या पसंतीची मते मोजण्याची वेळ यापूर्वी एकदाच विलासराव देशमुख उमेदवार असलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत आली होती व त्या लढतीत विलासराव अवघ्या अर्ध्या मताने पराभूत झाले होते, अशी आठवण माजी प्रधान सचिव अनंत कळसे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितली.घडले होते ते असे : विलासराव यांच्यासारख्या मातब्बर नेतृत्वाचा विधानसभेच्या १९९५ च्या निवडणुकीत लातूर मतदार संघातून शिवाजीराव कव्हेकर यांनी पराभव केला. त्यानंतर विधानपरिषदेची निवडणूक जाहीर झाली. काँग्रेसने जे विधानसभेला पराभूत झाले, त्यांना विधानपरिषदेला संधी नाही, अशी भूमिका घेतली. परंतु शरद पवार यांनी मात्र छगन भुजबळ यांचे नाव या उमेदवारीसाठी रेटले.म्हणून देशमुख यांनी बंडखोरी केली. (कव्हेकर यांना निवडून आणण्यात पवार यांचाच हात होता, असे देशमुख यांना वाटत होते. म्हणूनच ११ अपक्ष आमदार त्यावेळी त्यांनी शिवसेनेकडे पाठवून दिले होते. त्यातून राज्यात शिवसेनेचे सरकार आले.) त्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेत येण्याची ऑफर दिली. परंतु माझ्या रक्तातील काँग्रेस तुम्ही कशी काढणार? असे देशमुख यांचे विधान त्यावेळी गाजले होते. त्यांनी शिवसेनेचे सहयोगी उमेदवार म्हणून ही निवडणूक लढवली व त्यात अमरावतीच्या राठोड यांच्याकडून त्यांचा पराभव झाला.

पराभवामुळे झालो मुख्यमंत्री...पुढे विधानसभेच्या १९९९ च्या निवडणुकीत विलासराव महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी विजयी झाले आणि १८ ऑक्टोबर १९९९ ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. त्यादिवशी त्यांनी अनंत कळसे यांना जाऊन मिठी मारली व म्हणाले, ‘कळसे, तुम्ही काटेकोर मतमोजणी केल्यामुळे माझा अर्ध्या मताने पराभव झाला. निवडून आलो असतो, तर शिवसेनेचा आमदार म्हणून वावरलो असतो. पराभव झाल्यानेच मी परत काँग्रेसमध्ये सक्रिय झालाे व आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनलो.’

टॅग्स :kolhapurकोल्हापूरVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस