शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

अडीचशे जनावरे, वीस हजार कोंबड्या महापुरात गडप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 12:20 AM

कोल्हापूर : जिल्ह्यात आलेल्या प्रलयकारी महापुराने पुरते जनजीवन उद्ध्वस्त झाले असून, शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे. अडीचशेहून अधिक जनावरे पुराच्या ...

कोल्हापूर : जिल्ह्यात आलेल्या प्रलयकारी महापुराने पुरते जनजीवन उद्ध्वस्त झाले असून, शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे. अडीचशेहून अधिक जनावरे पुराच्या पाण्यात दगावल्याने गोठेच्या गोठे ओस पडले आहेत. पोल्ट्री उद्योगाचेही मोठे नुकसान झाले असून, तब्बल १९,५३० कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या आहेत. ओढे, नाले, नद्यांच्या पुराचे पाणी पात्रात जाईल असे झाडे, नाल्यात मृत जनावरांचे सांगाडे अडकलेलेदिसत असल्याने हा आकडा वाढण्याची भीती प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.शेतीला जोडधंदा म्हणून दूध व कुक्कुटपालन व्यवसायास ग्रामीण भागात सुरूवात झाली. पण लहरी हवामान व शेतीमालाच्या दरातील अनिश्चितेमुळे शेती अडचणीत आली त्यावेळी दूध व्यवसायाने शेतकऱ्यांना सावरले. किंबहुना दूधामुळेच शेतकºयांचे संसार उभे राहिले. त्यामुळे गेल्या दहा वर्षात पशुधनात दीडपटीने वाढ झाली आहे. जिल्ह्यात सुमारे आठ लाख दूभती जनावरे असून गावागावात कुकुटपालनाचा व्यवसायही मोठ्या प्रमाणात केला जातो.गेल्या आठवड्यात झालेल्या धुवांदार पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. सुपाने ओतणारा पाऊस, सोसाट्याचा वारा आणि अंगात हुडहुडी भरवणारी थंडीने माणसांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले होते, तिथे मुक्या पशु-पक्षांची तर दैना उडाली होती. या वातावरणाने पोल्ट्रीचे मोठे नुकसान झाले. या आठ दिवसांत जिल्ह्यात १९५३० कोंबड्या दगावल्या असून सर्वाधिक ८६७० कोंबड्या गडहिंग्लज तालुक्यातील आहेत. पोल्ट्री उद्योगावर अस्मानी संकट कोसळल्याने पोल्ट्री चालक हवालदिल झाले आहेत.पोल्ट्री उद्योगाबरोबरच जनावरांनाही पुराचा झटका बसला. पुराच्या पाण्यात जिल्ह्यातील अडीचशेहून अधिक जनावरे मृत्यूमुखी पडली. आतापर्यंत २५४ जनावरांची विल्हेवाट लावण्यात प्रशासनाला यश आले असून ओढे, नाले, नद्यांना आलेल्या पुराचे पाणी पात्रात जाईल, तशी मेलेल्या जनावरांचे सांगाडे दिसू लागले आहेत. यामुळे मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.तालुका पशुधन कुक्कुटपक्षीकरवीर ७४ -शाहूवाडी १३ -गगनबावडा ९ -पन्हाळा ३५ -कागल ७ -गडहिंग्लज १२ ३७००चंदगड ६ -भुदरगड २ ८६७०राधानगरी १९ ८०आजरा ५ ३५००शिरोळ ३२ ३००हातकणंगले ४० ३२८०एकूण २५४ १९५३०नुकसान लाखातभरपाई हजारातराज्य सरकारने पुरात मृत्युमुखी पडलेल्या मोठ्या जनावरांना प्रत्येकी ३० हजार तर लहान जनावराला ३ हजार रूपये नुकसान भरपाईची घोषणा केली आहे.पुराच्या पाण्यात लाख रूपये किमंतीच्या गायी व म्हैशी वाहून गेल्या पण त्याची भरपाई हजारात मिळणार आहे.