शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

हेच खरं 'स्वच्छता अभियान', कोल्हापूरचा कचरा साफ करतायंत महापालिका आयुक्त 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 10:04 AM

शहरातील महापुराचे पाणी ओसरल्यानंतर दूषित पाणी तसेच दुर्गंधीमुळे रोगराई पसरू नये म्हणून स्वच्छतेची मोहीम युद्धपातळीवर राबविली जात

ठळक मुद्देशहरातील महापुराचे पाणी ओसरल्यानंतर दूषित पाणी तसेच दुर्गंधीमुळे रोगराई पसरू नये म्हणून स्वच्छतेची मोहीम युद्धपातळीवर राबविली जात यथा राजा तथा प्रजा या उक्तीप्रमाणे आपण काम केल्यांच पाहिल्यास इतर कर्मचारीही जोमाने काम करतील

कोल्हापूर - स्वच्छ भारत मिशन अभियानावेळी हजारो सेलिब्रिटी हात पुढे आले होते. शेकडो नेते आणि लाखो कार्यकर्ते स्वच्छता मोहीम राबवत होते. भारत स्वच्छ करण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांपासून ते पंतप्रधानांपर्यंत सर्वांनीच भारत स्वच्छ केला होता. मात्र, खऱ्या स्वच्छता अभियानाची गरज आता आहे. सांगली आणि कोल्हापूरातील पूरस्थिती ओसरल्यानंतर तेथील नागरिकांच्या आरोग्यासाठी, शहराच्या स्वच्छतेसाठी स्वयंसेवींचे हात पुढे येत आहेत.  

शहरातील महापुराचे पाणी ओसरल्यानंतर दूषित पाणी तसेच दुर्गंधीमुळे रोगराई पसरू नये म्हणून स्वच्छतेची मोहीम युद्धपातळीवर राबविली जात असून फक्त पूरग्रस्त भागात 400 कर्मचारी अत्यावश्यक मशिनरीच्या सहाय्याने काम करीत आहेत. संपूर्ण शहरात सुमारे दीड हजार कर्मचारी स्वच्छतेच्या कामात योगदान देत असून एरव्ही एका शिफ्टमध्ये चालणारे काम आता दोन शिफ्टमध्ये सकाळी सहा ते सायंकाळी सहा असे अखंड बारा तास करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या कार्यात स्वत: महापालिका आयुक्तही हातात ग्लोज घालून रस्त्यावर उतरले आहेत. आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामध्ये, ते स्वत: घाण काढून शहराला स्वच्छ करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे केवळ दिखाऊपणा किंवा चकमोगिरीसाठी नव्हे, तर गेली अकरा रविवार म्हणजे तीन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांसमेवत ते रस्त्यावरील कचरा झाडत आहेत. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानावेळी हाती घेतलाला झाडू कलशेट्टी यांनी अद्यापही कायम सोबत ठेवला आहे. यथा राजा तथा प्रजा या उक्तीप्रमाणे आपण काम केल्यांच पाहिल्यास इतर कर्मचारीही जोमाने काम करतील, केवळ भाषणाबाजीन करता कृतीतून आपला विचार लोकांपर्यंत मांडायचा असतो, असे कलशेट्टी यांनी म्हटले आहे.  

दरम्यान, शहरातील महापुराची परिस्थिती आता सुधारत असून अनेक ठिकाणांचे पुराचे पाणी ओसरले आहे. आता पूरग्रस्त भागात केवळ दूषित पाण्याची डबकी, कुजलेला गाळ यामुळे सर्वत्र दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झालेले आहे. त्यामुळे शहरात रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महापालिका प्रशासनाने आधी पुराच्या पाण्याचा सामना केला. आता शहर स्वच्छतेच्या आव्हानाचा सामना करत आहे.महापालिकेचे शहरात एकूण 12 आरोग्य विभाग असून त्यांच्या अखत्यारीत सुमारे दीड हजार कर्मचारी काम करत असतात. त्यातील 400 कर्मचारी केवळ पूरग्रस्त भागात तैनात करण्यात आले आहेत. त्यांच्याकडे जेसीबी, आवश्यक डंपर, काळ उचलणारे ट्रॅक्टर, जेट मशीन, औषध फवारणी पंप अशी यंत्रसामग्री देण्यात आली आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरKolhapur Floodकोल्हापूर पूरSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानcommissionerआयुक्त