शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
2
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
3
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
4
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
6
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
7
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
8
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
9
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
10
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
11
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
12
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
13
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
14
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
15
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
16
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
17
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
18
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
19
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
20
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा

तोतापुरी, लालबाग आंब्याची आवक,डाळी कडाडल्या : मेथी, कोथिंबीर २० रुपये पेंढी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2019 2:24 PM

तोतापुरी आंब्यांची आवक सुरू झाली असून, किरकोळ बाजारात नगाचा दर १५ ते २० रुपये राहिला आहे. हापूसबरोबरच लालबाग आंब्याची आवक चांगली आहे. डाळींसह कडधान्यांच्या दरांत वाढ झाली असून, पाणीटंचाईमुळे भाजीपाल्याचे दर काहीसे वधारले आहेत. मेथी व कोथिंबीर २० रुपये पेंढी दर राहिला आहे.

ठळक मुद्देतोतापुरी, लालबाग आंब्याची आवकडाळी कडाडल्या : मेथी, कोथिंबीर २० रुपये पेंढी

कोल्हापूर : तोतापुरी आंब्यांची आवक सुरू झाली असून, किरकोळ बाजारात नगाचा दर १५ ते २० रुपये राहिला आहे. हापूसबरोबरच लालबाग आंब्याची आवक चांगली आहे. डाळींसह कडधान्यांच्या दरांत वाढ झाली असून, पाणीटंचाईमुळे भाजीपाल्याचे दर काहीसे वधारले आहेत. मेथी व कोथिंबीर २० रुपये पेंढी दर राहिला आहे.सध्या बाजारात हापूस आंब्यांची रेलचेल सुरू आहे. त्यात कोकणातील हापूसची आवक काहीशी मंदावली असून, मद्रास हापूस मात्र जोेरात आहे. दोन्ही आंबे दिसायला सारखेच असले तरी चवीत थोडा फरक जाणवतो. कोकण हापूसची पेटी सरासरी १२५० रुपये, तर २२५ रुपये बॉक्सचा दर आहे. त्या तुलनेत मद्रास हापूसची पेटी ९०० रुपये, तर २०० रुपये बॉक्सचा दर राहिला आहे. त्याशिवाय मद्रास पायरीचीही आवक सुरू झाली असून, त्याचा दर हापूसच्या तुलनेत पेटीमागे २०० रुपयांनी कमी आहे.

हापूसचा दर अद्यापही थोडा तेजीत असला तरी सामान्य ग्राहकांना लालबाग आंब्याने दिलासा दिला आहे. (छाया- आदित्य वेल्हाळ)

यंदा हापूस बाजारात असतानाच तोतापुरी आंब्याची आवक सुरू झाली आहे. तोतापुरीची आवक कमी असली तरी दर मात्र आवाक्यात आहे. किरकोळ बाजारात १५ ते २० रुपये नगाचा दर आहे. लालबागचा आंबाही आवाक्यात असून ६० रुपये किलोपर्यंत दर राहिला आहे.कडक उन्हाळ्यामुळे भाजीपाल्याच्या आवकेवर परिणाम झाला आहे. विशेष करून पालेभाज्यांची आवक मंदावल्याने दर चांगलेच भडकले आहेत. किरकोळ बाजारात मेथी २० रुपये, तर कोथिंबिरीचे दरही त्याच्या जवळपासच आहेत. वांग्यांच्या दरात थोडी वाढ झाली असून, टोमॅटोही २० रुपये किलोपर्यंत आहे. ढबू, कारली, दोडक्याच्या दरांत थोडी वाढ झाली आहे. ओला वाटाणा पुन्हा बाजारात दिसत असून दर मात्र ८० रुपये किलो आहे.वर्षभर स्थिर असणाऱ्या कडधान्यांच्या दरांत वाढ होऊ लागली आहे. तूरडाळ ९० रुपये, हरभराडाळ ७०, मूगडाळ १००, मटकी १२० रुपये किलोपर्यंत पोहोचली आहे. ऐन चटणीच्या हंगामात मिरचीसह खोबरे व मसाल्याच्या दरांत मोठी वाढ झाली आहे. ब्याडगी १६०, गुंटूर १४० रुपये किलो आहे. शाबूने तर शंभरी गाठली असून, साखर व सरकी तेल मात्र स्थिर आहे.मक्याला दोन वर्षांतील उच्चांकी दरमक्याचे उत्पादन घटल्याने दरात मोठी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात गेल्या वर्षी १० ते १२ रुपये किलोचा दर होता. या वर्षी १८ ते २० रुपयांपर्यंत वाढ झाली असून, आगामी महिन्याभरात २२ रुपयांपर्यंत जाईल, असा अंदाज आहे.

कांदा-बटाटा स्थिरकांद्याची आवक थोडी वाढली आहे. घाऊक बाजारात कांदा ११ रुपये, तर बटाटा १६ रुपये किलोपर्यंत आहे. लसणाने मात्र थोडी उसळी घेतली आहे. 

 

टॅग्स :Marketबाजारkolhapurकोल्हापूर