शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

Radhanagari Dam: राधानगरी धरणावर आंतरराष्ट्रीय ग्रंथालय उभारू - मंत्री उदय सामंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 13:25 IST

राधानगरी धरण स्थळाच्या पायथ्याशी लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाचे ग्रंथालय उभारण्यात येणार असून या ग्रंथालयाचा बरोबरीनेच संशोधन केंद्रही सुरू करण्यात येईल

राधानगरी/कसबा तारळे : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचा वसा आणि वारसा त्यांचे कार्यकर्तृत्व खऱ्या अर्थाने नव्या पिढीला समजण्यासाठी फक्त घोषणा किंवा वल्गना करून चालणार नाही त्यासाठी कृतिशील कार्यक्रम आखला पाहिजे म्हणूनच राधानगरीधरण स्थळाच्या पायथ्याशी लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाचे ग्रंथालय उभारण्यात येणार असून या ग्रंथालयाचा बरोबरीनेच संशोधन केंद्रही सुरू करण्यात येईल. याद्वारे राजर्षी शाहूंनी बांधलेले धरण, विद्यार्थी वसतिगृह, दाजीपूर अभयारण्य आणि त्यांचे कार्य त्याचा अभ्यास करून नव्या पिढीला प्रेरणा मिळेल, असा विश्वास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.राधानगरी धरण स्थळावर उभारलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती केंद्र उद्घाटन समारंभ व कृतज्ञता सोहळा प्रसंगी ते बोलत होते. शाहू छत्रपती अध्यक्षस्थानी होते. माजी आमदार मालोजीराजे प्रमुख उपस्थित होते. मंत्री उदय सामंत म्हणाले, शासनाच्यावतीने सध्या न्यू एज्युकेशन पॉलिसी सुरू आहे याद्वारे विद्यार्थी वसतिगृह, सर्वाना मोफत शिक्षण, फीमध्ये सवलत, प्राथमिक शिक्षणासाह शासनाच्या विविध योजना सुरू आहेत. मात्र या सर्वच योजना राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी शंभर वर्षांपूर्वी सुरू केल्या असल्याचे सांगून त्यांनी भविष्यात बांधलेली धरणे शंभर वर्ष टिकवायची असतील तर शासनाने राधानगरी धरणाचा अभ्यास करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.यावेळी पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, देशाला समतेचा संदेश देण्याचे कार्य करणाऱ्या राजर्षी . शाहूंच्या या भूमीला इतिहास आहे आणि इतिहास असणारी भूमी भूगोल घडविते आणि इतिहासावरच भविष्यकाळातील भवितव्य घडत असते. भविष्यात राधानगरी पर्यटनाच्या दृष्टीने समृद्ध होईल पर्यटनवृद्धीसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्धं करणार असून पर्यटनाचे एक रोल मॉडेल तयार करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, शासनाने अभयारण्य विकास आराखड्यासाठी ११० कोटी रुपये निधी मंजूर केला असून यातील २५ कोटींच्या माध्यमातून विकासकामे सुरू असून उर्वरित कामासह · पर्यटनासाठी अडथळा ठरणाऱ्या सर्वच बाबींचा पाठपुरावा येणाऱ्या भविष्यकाळात राधानगरी पर्यटनदृष्ट्या व पर्यटनावर आधारित रोजगाराच्या दृष्टीने सक्षम करण्यासाठी प्रयत्न राहील.यावेळी खासदार धैर्यशील माने व खासदार संजय मंडलिक यांनीही मनोगत व्यक्त केले. दरम्यान, या उद्घाटन समारंभ व कृतज्ञता सोहळ्याच्या प्रारंभी नदीकाठावरील पन्नासहून अधिक गावांतून छत्रपती शाहू महाराज स्मृती ज्योत कार्यक्रमस्थळी आणण्यात आली कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, तहसीलदार मीना निंबाळकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, आदी उपस्थित होते.मागेल तेवढा निधी देणार

या कार्यक्रमासाठी पर्यटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे उपस्थित राहू शकले नाहीत, हाच धागा पकडून आपल्या भाषणात मंत्री उदय सामंत यांनी राधानगरी पर्यटन विकासासाठी मागील तेवढा निधी पर्यटन व पर्यावरणमंत्री ठाकरे देणार असल्याचा निरोप आपल्याकडे दिला असल्याचे सांगितले. प्रारंभी गोकुळचे संचालक व राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष अभिजित तायशेटे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपतीradhanagari-acराधानगरीDamधरणUday Samantउदय सामंत