शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

कोहळा मिळवण्यासाठीेच्या धक्काबुक्कीत तीन तरुण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 16:35 IST

करवीर निवासिनी श्री अंबाबाई व त्र्यंबोली देवीच्या भेटीच्या सोहळ्यावेळी कोहळा फोडण्याच्या विधीनंतर तो मिळवण्यासाठी झालेल्या धक्काबुक्कीत तीन तरुण जखमी झाले. तसेच धक्काबुक्की रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला.

कोल्हापूर: करवीर निवासिनी श्री अंबाबाई व त्र्यंबोली देवीच्या भेटीच्या सोहळ्यावेळी कोहळा फोडण्याच्या विधीनंतर तो मिळवण्यासाठी झालेल्या धक्काबुक्कीत तीन तरुण जखमी झाले. तसेच धक्काबुक्की रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. सुमारे अर्धा तास हा गोंधळ सुरू होता. कोहळ्याचे तुकडे घरी नेल्याने संपत्ती वाढते असा समज असल्याने तो मिळवण्यासाठी ही धडपड असते मात्र ही समजून अत्यंत चुकीची असून तिला धार्मिक आधार नसल्याचे तज्ञांनी सांगितले. अंबाबाई, तुळजाभवानी व गुरूमहाराजांची अशा तीन पालख्या   गुरूवारी सकाळी दहा वाजता त्र्यंबोली टेकडीला निघाल्या.

दरम्यान खासदार संभाजीराजे, माजी आमदार मालोजीराजे व शहाजीराजे यांचेही मंदिर परिसरात आगमन झाले. त्यांच्या हस्ते गुरव कुटूंबातील सलोनी विनायक गुरव या कुमारिकेचे पूजन झाले. तिच्या हस्ते कोहळ््याला त्रिशुळ लावताच कोहळा मिळवण्यासाठी हुल्लजबाजीला सुरूवात झाली. दरवर्षी ठरावीक तरुणांकडून हे प्रकार केले जाते. यंदा त्यात तृतीयपंथियांनीही सहभाग घेतला होता. मंदिराभोवतीने सुमारे अर्धा तास हा गोंधळ सुरू होता. कोहळा मिळालेल्या तरुणामागे सगळे धावत सुटल्याने सोहळा पाहण्यासाठी आलेल्या महिला, बालके यांच्यासह भाविकांचीही पळापळ होत होती, भीतीदायक वातावरण होते.

पोलिसांनी लाठीमार करून गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनाही हे शक्य झाले नाही.  काहीही करुन कोहळा मिळवायचाच या तयारीने हे तरुण आले होते. या सगळ््या झाटपटीत दोन तरुण जखमी झाले. त्यानंतर बाहेर मात्र पोलिसांनी बघ्याचीच भूमिका घेण स्विकारले. त्यातच कोहळयाचा एक भाग अंबाबाईच्या पालखीत पडला. कोहळा पालखीत पडल्यानंतर त्यातला अर्धा भाग तरुणांना दिल्यानंतर वातावरण निवळले. दिडच्या दरम्यान तीनही पालख्या परतीच्या मार्गाला निघाल्या. 

सोहळ्याची पार्श्वभूमी-

शारदीय नवरात्रौत्सवात ललिता पंचमीला कोल्हापुरची अंबाबाई आपली प्रिय सखी त्र्यंबोली देवीच्या भेटीला जाते. अंबाबाईने कोल्हासुराचा अंत केल्यानंतर साजरा करण्यात आलेल्या विजयोत्सवात त्र्यंबोली देवीचा बोलवायचे राहिल्याने ती रुसून अंबाबाईकडे पाठ फिरवून बसली. हे लक्षात आल्यानंतर अंबाबाई स्वत: आपल्या लव्याजम्यानिशी त्र्यंबोली देवीच्या भेटीला गेली. यावेळी त्र्यंबोली देवीने अंबाबाईला तू कोल्हासुराचा वध कसा केलास ते दाखव अशी विनंती केली. ही मान्य करत अंबाबाईने राक्षसाचे प्रतिक म्हणून कोहळ््याचा वध करून दाखवला. त्यामुळे या दिवशी गुरव घराण्यातील मुलीच्या हस्ते त्रिशुळाने कोहळा फोडला जातो. कोहळा फुटुच दिला नाही-

सोहळा सुरू होण्यापूर्वी मंदिराशी संबंधित यंत्रणेने या सोहळ््याभोवती बॅरीकेटींग करण्याची सुचना पोलिसांना केली होती. मात्र ते पोलिसांनी केले नाही.  ज्यासाठी ही यात्रा होते तो कोहळाच यंदा फुटू दिला गेला नाही. गुरव कुटूंबातील मुलीने कोहळ््याला त्रिशुळ लावताच तो अख्खा पळवण्यात आला. कोहळा राक्षसाचे प्रतिक असल्याचे लोंकांना ते समजावे व तो मिळवण्यासाठी हुल्लडबाजी होवू नये म्हणून त्यावर राक्षसाचे चित्रही काढण्यात आले होते. तरी हा प्रकार थांबला नाही. कोहळा फोडण्याचा घरी नेण्याच्या या प्रकाराला कोणतेही धार्मिक संकेत नाहीत. राक्षस म्हणून कोहळ्याचा वध केला जातो. तो घरी नेणे म्हणजे राक्षसाच्या अवयवयाचे तुकडेच घरी नेण्याचा प्रकार आहे. त्यामुळे तो मिळवण्यासाठी केली जाणारी हुल्लडबाजी बंद व्हावी.अ‍ॅड. प्रसन्न मालेकर (मंदिर अभ्यासक)

टॅग्स :Navratriनवरात्रीkolhapurकोल्हापूरPoliceपोलिस